शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

...तर 15 वर्षात पूर्ण होईल 100 टक्के कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 11:21 IST

२६ दिवसात फक्त ९ हजार २०० जणांनी घेतली लस

धुळे : जिल्ह्याने कोरोना लसीकरणात आघाडी घेतली आहे. मात्र लसीकरणासाठी एवढीच कुमक असली व याच वेगाने लसीकरण होत राहिले तर जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हायलाकिमान १५ वर्षांचा कालावधी लागेल. त्यामुळे लसीकरण पूर्ण करायचे असेल तर खासगी रुग्णालयांची मदत महत्त्वाची ठरणार आहे.जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. मागील २६ दिवसात ९ हजार २०० जणांना लस टोचण्यात आली आहे. प्राप्त उद्दिष्टापैकी ५३ टक्के लसीकरण पूर्ण करीत जिल्हा राज्यात आघाडीवर आला आहे. एका दिवसात सरासरी ३५४ जणांना लस टोचण्यात आली आहे. जिल्ह्यातील २० लाख लोकांचे लसीकरण करायचे असेल तर सद्याच्या लसीकरणाच्या वेगानुसार १५ वर्षे लागतील. जर वेगात लसीकरण पूर्ण करायचे असेल तर खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी लागणार आहे. तसेच लसीकरणाचे केंद्रे वाढवावी लागतील.सहा केंद्रांवर लसीकरण -जिल्ह्यात सहा ठिकाणी कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. त्यात धुळे शहरात तीन केंद्रे आहेत. धुळे शहरातील केंद्रांमध्ये जिल्हा रुग्णालय, महानगरपालिकेचे प्रभातनगर आरोग्य केंद्र व मच्छीबाजार परिसरातील आरोग्य केंद्राचा समावेश आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय शिरपूर, ग्रामीण रुग्णालय साक्री व उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा याठिकाणी कोरोनाची लस टोचण्यात येत आहे.९ हजार २०० जणांनी घेतली लसजिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार २०० जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शासकीय व खासगी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतली आहे. लसीकरणाच्या एकूण लक्ष्यापैकी ५३ टक्के लक्ष पूर्ण केले असून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पोलीस कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात येणार आहे. ५ हजार ५०० कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे.आयएमएचे पंतप्रधानांना पत्रलसीकरण पूर्ण करायचे असेल तर खाजगी रुग्णालयांची मदत घ्यावी लागणार आहे.त्यासाठी आयएमएच्या राष्ट्रीय संघटनेने पुढाकार घेतला आहे. लसीकरण मोहिमेत खाजगी रुग्णालयांचाही सहभाग करून घ्यावा अशी विनंती शासनाला केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना याबाबत पत्रही लिहिले आहे. मात्र त्यांना अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली तर कमी वेळेत अधिक नागरिकांना लस टोचण्यास मदत होईल.