शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

थाळनेर, सामोडेला पंचनाम्यांचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:04 IST

सामोडेत ३०० एकरवरील सोयाबीन पीक जमीनदोस्त : शिरपूरात आमदारांनी घेतली बैढक

थाळनेर/पिंपळनेर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर परिसरात व पिंपळनेर येथील सामोडे परिसरात नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात फडबागायत, सोयाबीन, मका, बाजरी आदी पिकांचे नुकसान झाले आहे.पिंपळनेरसामोडे परीसरात २ रोजी महसूल विभाग व कृषी विभाग यांचे संयुक्त पंचनामे करण्यात आले. परतीचा पाऊसामुळे सोयाबीन व मका बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावातील फडबागायत ३०० एकर जमीनीवर सोयाबीन पीक आहे. मात्र गेल्या १५ दिवसापासूनच्या पावसाने पिक जमिन दोस्त झाले. तोंडावर आलेल्या पिकांना कोंब फुटत आहेत. याबरोबरच चारा ही खराब झाला आहे. परिसरात पाहणीसाठी व पंचनाम्यासाठी कृषी अधिकारी नहिरे, हेमंत बाविस्कर, महसूल विभागाचे सर्कल प्रमोद राजपूत, तलाठी दिलीप चव्हाण, ग्राम विस्तार अधिकारी बी.डी. जगताप, दिपक भारूडे, दिलीप घरटे, विलास घरटे, फडबागायत चेअरमन काशिनाथ घरटे आदींनी शेतकरी बंधुना बरोबर घेऊन पाहणी केली आणि पंचनामे केले.शासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाने त्वरित भरपाई जाहीर करावी अशी मागणी भाजपाचे दिलीप घरटे, विलास घरटे व सामोडे भाजप कार्यकर्ते यांनी केली आहे. शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा आणि या पुढे शेतकºयाला भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सामोडे परीसरातील शेतकºयांनी केली आहे.थाळनेरथाळनेर - परिसरात परतीच्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी,ज्वारी,मका,कापूस व अन्य सर्व पिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याने या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असून थाळनेर येथील तलाठी एस.के. मराठे यांच्यासह कोतवाल बाबाजी शिरसाठ, शेतकरी महेश सोनवणे, नंदकिशोर जमादार, वसंत वारूळे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावर्षी खरीप हंगामातील परतीच्या अवकाळी पावसाने मका, बाजरी, कापूस,ज्वारी यांच्यासह अन्य पिकांना चांगलेच झोडपून काढल्याने मळणीस आलेल्या मका, बाजरी व ज्वारी पिकांची चांगली दैना उडाल्याने या पिकांनी शेतातच अंकुर काढल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. गेल्या दोन ते तीन वर्षाच्या दुष्काळ अवर्षण प्रणव स्थितीचा सामना करीत असलेला परिसरातील शेतकरी यंदाच्या अवकाळी पावसाने पुन्हा देशोधडीला लागला आहे.थाळनेर, भोरटेक, मांजरोद, पिलोदा, सहपरिसरात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतकº्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी पूर्णत: आर्थिक संकटात सापडला आहे. शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांनी शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन यांच्या कार्यालयात अधिकारी व कर्मचाºयांची तात्काळ आढावा बैठक घेऊन तालुक्यात सरसकट पंचनामा करण्याचे निर्देश अधिकाºयांना दिलेत.

टॅग्स :Dhuleधुळे