शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

२९ हजार विद्यार्थ्यांनी दिली कलचाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:23 IST

धुळे जिल्हा : २७ डिसेंबरपासून चाचणीला सुरूवात, चाचणी देण्याची आज शेवटची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दहावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्राची सर्वाधिक आवड आहे, याविषयीचा विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मोबाईलद्वारे कल चाचणी घेण्यात येत आहे. एका महिन्यात धुळे जिल्ह्यात ४६७ नोंदणीकृत शाळांमधील २९ हजार १५० पैकी २९ हजार ४३ विद्यार्थ्यांनी कल चाचणी दिली. त्याची टक्केवारी ९९.६३ एवढी असल्याची माहिती कल चाचणीच्या जिल्हा समन्वयक जयश्री पाटील यांनी दिली आहे.भविष्यातील करिअरच्या वाटा निवडताना तसेच शिक्षणासाठी कोणते क्षेत्र निवडावे यासाठी महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह श्यामची आई फाउंडेशन व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागामार्फत दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे.दहावीनंतर कुठले क्षेत्र निवडायचे, याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. त्यासाठी ही कल चाचणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या कलमापन चाचणीमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळण्यास तसेच त्यांची आवड कोणत्या क्षेत्रात आहे, हे कळण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.चाचणी घेण्यास मुदतवाढजिल्ह्यात २७ डिसेंबर २०१९ पासून कलमापन चाचणी घेण्याचा उपक्रम सुरू झालेला आहे. त्यासाठी मोबाईल अ‍ॅपचा तसेच संगणकाचा वापर करण्यात येत आहे. ही चाचणी १८ जानेवारी २०२० पर्यंत घेण्याचे आदेश होते. मात्र आता कलचाचणी घेण्यास मुदतवाढ मिळालेली असून, ३१ जानेवारीपर्यंत ही चाचणी घेतली जाणार आहे.जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास २९ हजार १५० एवढी आहे. २८ जानेवारी अखेरपर्यंत २९ हजार ४३ विद्यार्थ्यांनी कल चाचणी दिलेली आहे.जिल्ह्यात कल चाचणीचे प्रमाण ९९.६३ टक्के एवढे असल्याचे सांगण्यात आले. यात धुळे ग्रामीणमध्ये ६ हजार ४७३, धुळे शहरात ६ हजार ६३४,साक्री तालुक्यातील ६ हजार २५४, शिंदखेडा तालुक्यातील ४ हजार ६३०, शिरपूर तालुक्यातील ५ हजार ५२ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कल चाचणी दिलेली आहे.यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्या डॉ. विद्या पाटील, तसेच कलचाचणीच्या जिल्हा समन्वयक तथा डायटच्या वरिष्ठ अधिव्याख्याता जयश्री पाटील, समुपदेशक डी.बी.पाटील यांचे सहकार्य लाभत आहे त.उर्वरित शाळांनी चाचणी पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे.संगणकाचाही करण्यात आला वापर४यापूर्वी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी, अधिक्षमता चाचणी कॉम्युटरद्वारे घेण्यात येत होती. मात्र अनेक शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात संगणक उपलब्ध नसणे, ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा नसणे आदी तांत्रिक कारणामुळे ही चाचणी घेण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या.यावर पर्याय म्हणून मोबाईल अ‍ॅपद्वारे कलचाचणी, अधिक्षमता चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यावर्षी मोबाईलसह संगणकाचाही वापर करण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना देण्यात आला होता.

टॅग्स :Dhuleधुळे