शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

शिक्षक समिती ‘समन्वय’मधून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 11:39 IST

बैठकीत ठराव : शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने घेतला निर्णय, आता स्वतंत्रपणे काम करणार

धुळे : शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे .शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याकडे जिल्हा समन्वय समितीचे दुर्लक्ष झाल्याने, जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने समन्वय समितीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय घेत तसा ठराव केला. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याची माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी एका पत्रकान्वये दिली.जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच एन.डी.पाटील माध्यमिक विद्यालय, देवपूर धुळे येथे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात वरील ठराव करण्यात आला.जिल्ह्यातील शिक्षकांच्या २१ संघटना एकत्रित येत त्यांनी २०१४ मध्ये जिल्हा समन्वय समितीची स्थापना केली होती. शिक्षकांचे प्रश्न एकत्रितरित्या प्रशासनासमोर मांडून ते सोडण्यासाठी प्रयत्न करावेत हा समन्वय समिती स्थापनेचा मुख्य उद्देश होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, ते सोडविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच स्वतंत्रपणे काम करण्यासाठी प्राथमिक शिक्षक समितीने ‘समन्वय’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीत पुढील तीन वर्षांसाठी जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र पाटील व सरचिटणीसपदी बापू पारधी यांच्या नावाचा ठराव मंजूर करण्यात आला.प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस बापू पारधी यांनी केले. यावेळी शिक्षक समितीच्या जिल्हा अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यावरही चर्चा झाली. बैठकीला राज्य प्रतिनिधी कैलास दाभाडे, सुरेश पाटील, धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे व्हा.चेअरमन सुभाष पगारे, संचालक आनंद पाटील, अनिल नहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष एकनाथ भामरे, जितेंद्र राजपूत, मनोज निकम, महेंद्र पाटील, रमेश पाटील, प्रमोद सोनवणे, अरूण खैरनार, रामचंद्र भलकारे, सुनील सोंजे, रमेश वाघ, ईश्वर वाघ, विजय भोई उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे