शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विश्वजित साळुंके याचे स्काॅलरशिप परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST

प्रधानमंत्री जनकल्याण योजनेची बैठक धुळे : प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान ४ हजार ६२ योजनेअंतर्गत या संघटनेची ...

प्रधानमंत्री जनकल्याण योजनेची बैठक

धुळे : प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान ४ हजार ६२ योजनेअंतर्गत या संघटनेची जिल्हास्तरीय बैठक नुकतीच प्रदेशाध्यक्ष भगवान बागुल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कार्यक्रमाचे आयोजक, जिल्हाध्यक्ष सतीष लोहालेकर, महिला प्रदेशाध्यक्ष सुलोचना चौधरी, प्रदेश सचिव शशिकांत भदाणे, उपाध्यक्ष संजय जाधव, महासचिव मनीषा चौधरी यांच्यासह उत्तर महाराष्ट्र सचिव राजेंद्र चौधरी, नीरज देसले व महिला जिल्हाध्यक्ष राखी उपाध्याय, उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष प्रथमेश गांधी व्यासपीठावर उपस्थित होते. गोरखनाथ गढरी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश लोहालेकर व मंजूषा लोहालेकर यांनी प्रयत्न केले.

नाफेडअंतर्गत तूर खरेदीसाठी नावनोंदणी

न्याहळोद : हंगाम २०२०- २१ मध्ये राज्यात आधारभूत खरेदी योजना नाफेड अंतर्गत तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नाव नोंदणी सुरू झाली आहे. नाफेड मार्फत आधारभूत, तूर हमीभावाने खरेदी करण्यासाठी धुळे-नंदुरबार जिल्ह्यांत सहा केंद्र निश्चित करण्यात आली आहे. मार्केटिंग फेडरेशनकडून तुरीला सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात येणार आहे. यासाठी २८ डिसेंबर २०२० पासून नाव नोंदणी सुरू झाली .

संभाव्य टंचाईसाठी ११० उपाययोजना

धुळे : जिल्ह्यात ७७ गावे आणि ३३ पाड्यांमध्ये टंचाई भासण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यासाठी ५४ लाख ५८ हजार रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला असून, त्यात ११० उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. विंधन विहिरींसाठी १ लाख ८० हजार, नळ योजना दुरुस्तीसाठी पाच लाख, खासगी विहीर अधिग्रहणासाठी ४२ लाख ४८ हजार, विहीर खोलीकरण आणि गाळ काढण्यासाठी २ लाख, टँकर सुरू करण्यासाठी ३ लाख ३० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

चोरीच्या घटना वाढल्या; नागरिकांमध्ये भीती

धुळे : शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना घडत असल्याने, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे अनेकजण बाहेरगावी जाण्यासही धजावत नाही. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

रिक्षाचे दर अनियंत्रित; लक्ष देण्याची गरज

धुळे : शहरात तीनचाकी रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यातून अनेकांना रोजगार मिळत असतो. मात्र, शहरात रिक्षांचे दर अनियंत्रित आहेत. थोड्या अंतराचेही जास्त पैसे घेतले जातात असा प्रवाशांचा अनुभव आहे. त्यामुळे रिक्षांच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यात यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.