शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

विद्यार्थ्यांना शाळेत मिळणार पौष्टीक आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 11:18 IST

दुष्काळग्रस्त,टंचाईग्रस्त गावांसाठी आदेश

ठळक मुद्देदुष्काळग्रस्त गावांसाठी योजनाजिल्ह्यातील २ लाख ६८ हजार विद्यार्थ्यांना फायदादररोज किमान १० लाखांचा खर्च अपेक्षित

आॅनलाइन लोकमतधुळे :दुष्काळग्रस्त, टंचाईग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेंतर्गत पोषण आहारासोबतच पुरक पौष्टीक आहार देण्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस दूध, केळी किंवा अंडी यापैकी एकाचा पौष्टीक पोषक आहार दिला जाईल. जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या २ लाख ६८ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. व प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी मंजुरी दिली आहे.जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमध्ये शिकणाºया पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार दिला जातो.दरम्यान गेल्यावर्षी पावसाळा कमी झाला. त्यामुळे जिल्ह्यात अनेक गावांची पीक आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी जाहीर झाली. त्यामुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा तसेच साक्री तालुक्यातील ९ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ जाहीर झाल्याने, यावर्षी उन्हाळ्यातही दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात आला होता.दरम्यान दुष्काळग्रस्त व टंचाईसदृश्य गावातील पात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आठवड्यातून तीन दिवस पुरक आहार म्हणून दूध, केळी व अंडी देण्याचे शासनाचे आदेश आहेत. ही योजना महाराष्टÑात लागू करण्यात आलेली आहे.२ लाख ६८ हजार विद्यार्थीपोषण आहारासाठी जिल्ह्यात एकूण १६७६ शाळा पात्र आहेत. त्यात पहिली ते पाचवीपर्यंत १ लाख ७० हजार तर सहावी ते आठवीचे एकूण ९८ हजार विद्यार्थी आहे. अशा एकूण २ लाख ६८ हजार विद्यार्थ्यांना आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवारी दूध, केळी, अंडी यापैकी एक पुरक पोषण आहार देण्यात येणार आहे. यासाठी एका दिवसासाठी प्रतिविद्यार्थी पाच रूपये प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.शाकाहारीसाठी केळी, दूधही योजना राबवित असतांना शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्हीप्रकारचे भोजन घेणाºया विद्यार्थ्यांचा विचार करण्यात आलेला आहे. यात शाकाहारी भोजन करणाऱ्यांसाठी दूध किंवा दोन केळी तसेच मांसाहारी भोजन करणाºया विद्यार्थ्यांना उकळलेले एक अंड देण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत स्वयंपाकघर असल्याने, त्याचठिकाणी अंडी उकळण्यात येणार आहे.अनुदान प्राप्तया पुरक आहार योजनेसाठी जिल्हा परिषदेला अनुदान प्राप्त झाले असून, अपेक्षित वाढीव अनुदानाचीही मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.बौद्धिक क्षमता वाढणारविद्यार्थ्यांना दूध, केळी, अंडी यापैकी एक पुरक पोषण आहार दिल्यास विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढीस लागू शकते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण होऊ शकते असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.अंमलबजावणी सुरूया योजनेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी मंजूरी दिल्यानंतर शासनाच्या या निर्णयाची जिल्ह्यातील शाळांनी अमलबजावणी सुरू केल्याचे शिक्षकांनी सांगितले. 

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण