शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

विद्यार्थ्यांनी कलागुण सादर करून यश मिळवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 23:27 IST

संजय बागूल : जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवास सुरूवात, उद्या होणार समारोप

धुळे : स्पर्धेत जय-पराजय हा होत असतो. त्यामुळे पराजय झाला तरी विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुढे येणाऱ्या स्पर्धेत जिंकण्याची जिद्द ठेवावी. विद्यार्थ्यांनी कलागुण सादर करून यश मिळवावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल यांनी येथे केले.जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारात तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवास बुधवारपासून प्रारंभ झाला. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) के.एफ.राठोड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जी.एन.शिंपी उपस्थित होते.या महोत्सवात धुळ्यातील मुलांचे, मुलींचे बालनिरीक्षण गृह, कलमाबाई अजमेरा बालनिरीक्षणगृह, जिजामाता बालनिरीक्षण गृह तसेच शिवाजी विद्यालय, नूतन पाडवी विद्यालय, कमलाबाई अजमेरा विद्यालय, व कमलाबाई कन्या शाळेतील एकूण ४०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. महोत्सवाचे हे सातवे वर्ष आहे.बालकल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय, स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी महोत्सवाचे आयोजन केले जाते. प्रास्ताविक जी.एन. शिंपी यांनी तर सूत्रसंचालन एम.एम.बागूल यांनी केले. आभार अर्चना पाटील यांनी मानले.यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित दुसाणे, बाल न्याय मंडळाचे सदस्य यशवंत हरणे, अ‍ॅड. अनिता भांबेरे, प्रा.डॉ.सुदाम राठोड, प्रा. वैशाली पाटील, आदी उपस्थित होते.दरम्यान या स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाºया विद्यार्थ्याची विभागीय महोत्सवासाठी निवड करण्यात येणार आहे.गायन स्पर्धा प्रथमच तीन स्तरावरदरम्यान यावर्षापासून प्रथमच गायन स्पर्धा जिल्हा, विभागीय व राज्यस्तरावर होणार असल्याचे जी.एन. शिंपी यांनी सांगितले.बुधवारी दिवसभरात मैदानी स्पर्धा झाल्या. गुरुवारी नृत्य, फॅन्सी ड्रेस, नाटक व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांवर आधारित स्पर्धा होणार आहे. तर १३ डिसेंबर रोजी या जिल्हास्तरीय महोत्सवाचा समारोप होऊन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरीत केले जाणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे