शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर चक्क मातीचा भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 22:37 IST

अपघाताचे वाढते प्रमाण : थातूरमातूर अजब उपायांमुळे वाहनधारकांच्या तीव्र प्रतिक्रिया

नेर : सुरत- नागपुर या राष्टÑीय महामार्ग क्र.६ वर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे चालकांना अक्षरश: कसरत करीत वाहन चालवावे लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे महामार्गाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे संबंधित विभागाकडून महामार्गावर मातीचा भराव टाकून थातूरमातूर दुरुस्ती केली जात आहे. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.राष्टÑीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी वारंवार निवेदने देऊन आंदोलने होत आहेत. या कामाची दखल घेत भारतीय महामार्ग प्राधिकरण विभागाने नुकतीच महामार्गावरील खड्डे दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये खर्चाची निविदा काढली होती. सदर कामाला सुरुवात कधी होईल, याची सर्वांनाच प्रतीक्षा लागून आहे. मात्र, विविध कारणे सांगून हे काम थांबविण्यात आले असून राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.दरम्यान, महामार्गावरील खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवून रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकेदायक साईडपट्ट्यांची दुरुस्ती करणे जरुरीचे आहे.वाहनचालकांमध्ये होतात वादवाहन चालकांना खड्डे टाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. मातीचा भराव टाकल्याने वाहनचालकांचा अंदाज चुकतो खड्डे टाळतांना समोरासमोर वाहने येऊन चालकांमध्ये वादविवाद होऊन प्रसंगी हाणामारीच्या घटनाही घडतात. अपघातात दुर्घटना झाल्यास तर त्याला जबाबदार कोण, असा सवालव् वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. परंतू संबंधित विभागास याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.सुरत-नागपूर या महामार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. यात लोकप्रतिनीधी, शासकिय अधिकारी यांच्या वाहनासह अवजड वाहने, एस.टी. बस, प्रवासी वाहनांची मोठी वर्दळ असते. हा महामार्ग मध्यवर्ती ठिकाण असल्याने औरंगाबाद, जळगाव, नागपूर, अमरावती, सुरत, अहमदाबाद आदी महत्त्वाच्या ठिकाणांहून अवजड वाहने धावत असतात. तसेच हा महामार्ग महाराष्ट्र गुजरात राज्याला जोडणारा असल्याने व्यापार व अन्य कामांसाठी प्रवासी या महामार्गावरून प्रवास करतात. खड्ड्यांमुळे येथे धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने अनेकांना श्वसनाचे आजार जडत आहेत.त्यात महामार्गावरील खड्डयांवर मातीचा भराव टाकण्यात आल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या महामार्गाची व धोकेदायक साईडपट्ट्यांची योग्य रितीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे