शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

महामार्गावर चक्क मातीचा भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 22:37 IST

अपघाताचे वाढते प्रमाण : थातूरमातूर अजब उपायांमुळे वाहनधारकांच्या तीव्र प्रतिक्रिया

नेर : सुरत- नागपुर या राष्टÑीय महामार्ग क्र.६ वर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे चालकांना अक्षरश: कसरत करीत वाहन चालवावे लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे महामार्गाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे संबंधित विभागाकडून महामार्गावर मातीचा भराव टाकून थातूरमातूर दुरुस्ती केली जात आहे. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.राष्टÑीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी वारंवार निवेदने देऊन आंदोलने होत आहेत. या कामाची दखल घेत भारतीय महामार्ग प्राधिकरण विभागाने नुकतीच महामार्गावरील खड्डे दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये खर्चाची निविदा काढली होती. सदर कामाला सुरुवात कधी होईल, याची सर्वांनाच प्रतीक्षा लागून आहे. मात्र, विविध कारणे सांगून हे काम थांबविण्यात आले असून राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.दरम्यान, महामार्गावरील खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवून रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकेदायक साईडपट्ट्यांची दुरुस्ती करणे जरुरीचे आहे.वाहनचालकांमध्ये होतात वादवाहन चालकांना खड्डे टाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. मातीचा भराव टाकल्याने वाहनचालकांचा अंदाज चुकतो खड्डे टाळतांना समोरासमोर वाहने येऊन चालकांमध्ये वादविवाद होऊन प्रसंगी हाणामारीच्या घटनाही घडतात. अपघातात दुर्घटना झाल्यास तर त्याला जबाबदार कोण, असा सवालव् वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. परंतू संबंधित विभागास याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.सुरत-नागपूर या महामार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. यात लोकप्रतिनीधी, शासकिय अधिकारी यांच्या वाहनासह अवजड वाहने, एस.टी. बस, प्रवासी वाहनांची मोठी वर्दळ असते. हा महामार्ग मध्यवर्ती ठिकाण असल्याने औरंगाबाद, जळगाव, नागपूर, अमरावती, सुरत, अहमदाबाद आदी महत्त्वाच्या ठिकाणांहून अवजड वाहने धावत असतात. तसेच हा महामार्ग महाराष्ट्र गुजरात राज्याला जोडणारा असल्याने व्यापार व अन्य कामांसाठी प्रवासी या महामार्गावरून प्रवास करतात. खड्ड्यांमुळे येथे धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने अनेकांना श्वसनाचे आजार जडत आहेत.त्यात महामार्गावरील खड्डयांवर मातीचा भराव टाकण्यात आल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या महामार्गाची व धोकेदायक साईडपट्ट्यांची योग्य रितीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे