शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

महामार्गावर चक्क मातीचा भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 22:37 IST

अपघाताचे वाढते प्रमाण : थातूरमातूर अजब उपायांमुळे वाहनधारकांच्या तीव्र प्रतिक्रिया

नेर : सुरत- नागपुर या राष्टÑीय महामार्ग क्र.६ वर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे चालकांना अक्षरश: कसरत करीत वाहन चालवावे लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे महामार्गाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे संबंधित विभागाकडून महामार्गावर मातीचा भराव टाकून थातूरमातूर दुरुस्ती केली जात आहे. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.राष्टÑीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी वारंवार निवेदने देऊन आंदोलने होत आहेत. या कामाची दखल घेत भारतीय महामार्ग प्राधिकरण विभागाने नुकतीच महामार्गावरील खड्डे दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये खर्चाची निविदा काढली होती. सदर कामाला सुरुवात कधी होईल, याची सर्वांनाच प्रतीक्षा लागून आहे. मात्र, विविध कारणे सांगून हे काम थांबविण्यात आले असून राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.दरम्यान, महामार्गावरील खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवून रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकेदायक साईडपट्ट्यांची दुरुस्ती करणे जरुरीचे आहे.वाहनचालकांमध्ये होतात वादवाहन चालकांना खड्डे टाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. मातीचा भराव टाकल्याने वाहनचालकांचा अंदाज चुकतो खड्डे टाळतांना समोरासमोर वाहने येऊन चालकांमध्ये वादविवाद होऊन प्रसंगी हाणामारीच्या घटनाही घडतात. अपघातात दुर्घटना झाल्यास तर त्याला जबाबदार कोण, असा सवालव् वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. परंतू संबंधित विभागास याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.सुरत-नागपूर या महामार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. यात लोकप्रतिनीधी, शासकिय अधिकारी यांच्या वाहनासह अवजड वाहने, एस.टी. बस, प्रवासी वाहनांची मोठी वर्दळ असते. हा महामार्ग मध्यवर्ती ठिकाण असल्याने औरंगाबाद, जळगाव, नागपूर, अमरावती, सुरत, अहमदाबाद आदी महत्त्वाच्या ठिकाणांहून अवजड वाहने धावत असतात. तसेच हा महामार्ग महाराष्ट्र गुजरात राज्याला जोडणारा असल्याने व्यापार व अन्य कामांसाठी प्रवासी या महामार्गावरून प्रवास करतात. खड्ड्यांमुळे येथे धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने अनेकांना श्वसनाचे आजार जडत आहेत.त्यात महामार्गावरील खड्डयांवर मातीचा भराव टाकण्यात आल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या महामार्गाची व धोकेदायक साईडपट्ट्यांची योग्य रितीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे