शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; दोन ठार, दहिवद उड्डाणपुलावरील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: December 9, 2022 22:30 IST

भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसली.

शिरपूर: भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा उड्डाणपुलावरून खाली काेसळल्याने गंभीर जखमी होऊन रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शिरपूर तालुक्यातील दहिवद उड्डाणपुलावर शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. 

सुनील धनराज पाटील (४०, रा. दहिवद, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) आणि रवींद्र दौलत पाटील (४०, रा. चिंचगव्हाण) असे मृतांची नावे आहेत. मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील दहिवद गावाजवळील उड्डाणपुलावर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाची दुचाकीला (क्र.एमएच १९सीए २४०९) धडक बसली. अपघाताची ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यात सुनील धनराज पाटील (४०, रा. दहिवद, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

अपघाताला जबाबदार असणाऱ्या वाहनचालकाने घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. त्याचवेळेस मयत सुनील पाटील यांचा मोबाइल वाजत असल्याने तो एकाने उचलला. तिकडून त्याचे काका बोलत होते. त्यामुळे दुचाकीवरून एक नाही तर दोनजण जात असल्याचे समोर आले. दुसरा कुठे गेला याचा शोध घेतला असता तो उड्डाणपुलावरून खाली कोसळल्याचे समोर आले. तो गंभीर अवस्थेत पडलेला होता. त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली होती. रवींद्र दौलत पाटील (४०, रा. चिंचगव्हाण) असे त्याचे नाव आहे. तातडीने त्या दोघांना शिरपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी दाेघांना मयत घोषित केले. शिरपूर तालुका पोलिसात अपघाताची नोंद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :AccidentअपघातDhuleधुळे