शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
3
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
4
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
5
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
6
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
7
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
8
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
9
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
10
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
11
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
12
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
13
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
14
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
15
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
16
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
17
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
18
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
19
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
20
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दुप्पटीने कोसळलेल्या पावसाने उडविली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 22:59 IST

२००७ नंतरचा उच्चांक : जिल्ह्यात ६ नोब्हेेंबरपर्यत ८६०.७ मिलिमीटर पावसाची नोंद; धरणासह नदीनाले तुडुंब

ठळक मुद्देनकाणे, डेडरगाव, हरण्यामाळ तलाव ‘ओव्हरफ्लोजिल्ह्यात ५७० मि.मी. सरासरी असून ८६०.७ मि.मी. पाऊस चारही तालुक्यातील खरीपाच्या एकूण ४ लाख २९ हजार हेक्टरपैकी ३ लाख ६९ हजार २१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसानयंदाचा पाऊस हा २००७ नंतरचा सर्वाधिक ठरलाशेतकºयांवर पुन्हा संकटतब्बल १२ वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर यंदा जून महिन्यात सुरू झालेला पाऊस

चंद्रकांत सोनार ।धुळे : तब्बल १२ वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर यंदा जून महिन्यात सुरू झालेला पाऊस नोव्हेंबर महिन्यापर्यंत थांबण्याचं नाव घेत नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचाही घास हिरावून घेतला आहे़ यंदाचा पाऊस हा २००७ नंतरचा सर्वाधिक ठरला आहे़जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतत चार वर्ष दुष्काळी संकटाला सामोरे जावे लागले होते़ यंदा मात्र पावसाने चार वर्षाची भर काढत सरासरीपेक्षा सर्वाधिक पाऊस झाला़ जिल्ह्यात चारही तालुक्यातील खरीपाच्या एकूण ४ लाख २९ हजार हेक्टरपैकी ३ लाख ६९ हजार २१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे़ त्यात ६२३ बाधीत गावातील २ लाख ६० हजार ७७६ शेतकºयांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्यावर्षी अल्प पाऊस झाल्याने शेतकºयांना नोव्हेंबर महिन्यापासून चारा व पाणीटंचाई जाणवत होती़ त्यासाठी प्रशासनाकडून तब्बल ८९ टँकरव्दारे नागरिकांची तहान भागवावी लागली होती़ टंचाईपासून एकही तालुका दूर राहिला नव्हता़ तर चारा टंचाईमुळे शेतकºयांनी पशूधन देखील विक्रीला काढले होते़ यंदा सर्वत्र जोरदार पावसाने शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे़ गेल्यावर्षी कोरड्या दुष्काळाला तोंड देणाºया शेतकºयांना यंदा ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे़ जून महिन्यापासून हजेरी लावलेल्या पावसाने नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यापर्यंत दमदार हजेरी लावली़ त्यामुळे अवकाळीचा फटका चारही तालुक्यातील शेतकºयांना बसला़ कापूस, कांदा, सोयाबिन, मका अशा पिकांसाठी शेतकºयांनी टाकलेले भांडवल देखील शेतकºयांना यंदाच्या हंगामात काढता आलेले नाही़शेतकºयांवर पुन्हा संकटअरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा चक्रीवादळामुळे धुळे, जळगाव, नंदुरबार, पालघर, नाशिक, ठाणे जिल्ह्यात ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत वादळी वाºयासह अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता हवामान खात्यानी वर्तविली आहे़ त्यामुळे पुन्हा शेतकºयांना निर्सगाच्या लहरीपणामुळे संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे़ त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.कापूस, कांदे, भाजीपाला, मका, सोयाबिन पिकांना बसला फटकाजिल्ह्यात यंदा अवकाळी झालेल्या पावसाने शेतकºयांच्या कापूस, कांदा, सोयाबिन, मका, ज्वारी, बाजरी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे़ त्यातच शिंदखेडा तालुक्यातील कापडणे, मालपूर, तसेच साक्री व शिरपूर तालुक्यातील शेतकरी बाराही महिने भाजीपाला उत्पादन घेतात़ मात्र, यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने टमाटे, वांगी, गिलके, दोडके, कोथिंबीर सडून गेले आहेत़ भाजीपाला पिकांच्या उत्पादनावर येथील शेतकºयांचा चरितार्थ चालतो. पण आता परिस्थिती विपरित झाली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे़ यामुळे शेतकरी चितांतूर झाला आहे़ या पार्श्वभुमीवर शासनाने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्याकडून नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. मात्र, शेतकºयांना आता तातडीने नुकसान भरपाईची गरज आहे.तालुकानिहाय पाऊसधुळे जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस कोसळला आहे़ त्यात ६ नोव्हेंबरपर्यंत धुळे तालुक्यात सरासरी ६००.९ पावसाची नोंद आहे. यंदा ७५८ मिलीमिटर पाऊस पडला असून सरासरी ओलांडली आहे.साक्री तालुक्यात सरासरी ४५४ मि.मी. असून आतापर्यंत ९७३.५ मि.मी. पाऊस झाला आहे. शिरपूर तालुक्यात सरासरी ६७९.४ मि.मी. असून ९४६.१ मि.मी. पाऊस झाला आहे. तर शिंदखेडा तालुक्यात सरासरी ५४५.८ मि.मी.असून ८१२.३ पावसाची नोंद झाली आहे़ जिल्ह्यात ५७० मि.मी. सरासरी असून ८६०.७ मि.मी. पाऊस झाला आहे़ यंदा पावसाने नदीनाल्यांना देखील पुल आला आहे़ तर धुळे शहराला पाणीपुरवठा करणारे नकाणे, डेडरगाव, हरण्यामाळ तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाले आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे