शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

दुप्पटीने कोसळलेल्या पावसाने उडविली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 22:59 IST

२००७ नंतरचा उच्चांक : जिल्ह्यात ६ नोब्हेेंबरपर्यत ८६०.७ मिलिमीटर पावसाची नोंद; धरणासह नदीनाले तुडुंब

ठळक मुद्देनकाणे, डेडरगाव, हरण्यामाळ तलाव ‘ओव्हरफ्लोजिल्ह्यात ५७० मि.मी. सरासरी असून ८६०.७ मि.मी. पाऊस चारही तालुक्यातील खरीपाच्या एकूण ४ लाख २९ हजार हेक्टरपैकी ३ लाख ६९ हजार २१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसानयंदाचा पाऊस हा २००७ नंतरचा सर्वाधिक ठरलाशेतकºयांवर पुन्हा संकटतब्बल १२ वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर यंदा जून महिन्यात सुरू झालेला पाऊस

चंद्रकांत सोनार ।धुळे : तब्बल १२ वर्षाच्या प्रदिर्घ कालावधीनंतर यंदा जून महिन्यात सुरू झालेला पाऊस नोव्हेंबर महिन्यापर्यंत थांबण्याचं नाव घेत नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचाही घास हिरावून घेतला आहे़ यंदाचा पाऊस हा २००७ नंतरचा सर्वाधिक ठरला आहे़जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतत चार वर्ष दुष्काळी संकटाला सामोरे जावे लागले होते़ यंदा मात्र पावसाने चार वर्षाची भर काढत सरासरीपेक्षा सर्वाधिक पाऊस झाला़ जिल्ह्यात चारही तालुक्यातील खरीपाच्या एकूण ४ लाख २९ हजार हेक्टरपैकी ३ लाख ६९ हजार २१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे़ त्यात ६२३ बाधीत गावातील २ लाख ६० हजार ७७६ शेतकºयांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्यावर्षी अल्प पाऊस झाल्याने शेतकºयांना नोव्हेंबर महिन्यापासून चारा व पाणीटंचाई जाणवत होती़ त्यासाठी प्रशासनाकडून तब्बल ८९ टँकरव्दारे नागरिकांची तहान भागवावी लागली होती़ टंचाईपासून एकही तालुका दूर राहिला नव्हता़ तर चारा टंचाईमुळे शेतकºयांनी पशूधन देखील विक्रीला काढले होते़ यंदा सर्वत्र जोरदार पावसाने शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे़ गेल्यावर्षी कोरड्या दुष्काळाला तोंड देणाºया शेतकºयांना यंदा ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे़ जून महिन्यापासून हजेरी लावलेल्या पावसाने नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यापर्यंत दमदार हजेरी लावली़ त्यामुळे अवकाळीचा फटका चारही तालुक्यातील शेतकºयांना बसला़ कापूस, कांदा, सोयाबिन, मका अशा पिकांसाठी शेतकºयांनी टाकलेले भांडवल देखील शेतकºयांना यंदाच्या हंगामात काढता आलेले नाही़शेतकºयांवर पुन्हा संकटअरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा चक्रीवादळामुळे धुळे, जळगाव, नंदुरबार, पालघर, नाशिक, ठाणे जिल्ह्यात ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत वादळी वाºयासह अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता हवामान खात्यानी वर्तविली आहे़ त्यामुळे पुन्हा शेतकºयांना निर्सगाच्या लहरीपणामुळे संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे़ त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.कापूस, कांदे, भाजीपाला, मका, सोयाबिन पिकांना बसला फटकाजिल्ह्यात यंदा अवकाळी झालेल्या पावसाने शेतकºयांच्या कापूस, कांदा, सोयाबिन, मका, ज्वारी, बाजरी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे़ त्यातच शिंदखेडा तालुक्यातील कापडणे, मालपूर, तसेच साक्री व शिरपूर तालुक्यातील शेतकरी बाराही महिने भाजीपाला उत्पादन घेतात़ मात्र, यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने टमाटे, वांगी, गिलके, दोडके, कोथिंबीर सडून गेले आहेत़ भाजीपाला पिकांच्या उत्पादनावर येथील शेतकºयांचा चरितार्थ चालतो. पण आता परिस्थिती विपरित झाली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे़ यामुळे शेतकरी चितांतूर झाला आहे़ या पार्श्वभुमीवर शासनाने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्याकडून नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. मात्र, शेतकºयांना आता तातडीने नुकसान भरपाईची गरज आहे.तालुकानिहाय पाऊसधुळे जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस कोसळला आहे़ त्यात ६ नोव्हेंबरपर्यंत धुळे तालुक्यात सरासरी ६००.९ पावसाची नोंद आहे. यंदा ७५८ मिलीमिटर पाऊस पडला असून सरासरी ओलांडली आहे.साक्री तालुक्यात सरासरी ४५४ मि.मी. असून आतापर्यंत ९७३.५ मि.मी. पाऊस झाला आहे. शिरपूर तालुक्यात सरासरी ६७९.४ मि.मी. असून ९४६.१ मि.मी. पाऊस झाला आहे. तर शिंदखेडा तालुक्यात सरासरी ५४५.८ मि.मी.असून ८१२.३ पावसाची नोंद झाली आहे़ जिल्ह्यात ५७० मि.मी. सरासरी असून ८६०.७ मि.मी. पाऊस झाला आहे़ यंदा पावसाने नदीनाल्यांना देखील पुल आला आहे़ तर धुळे शहराला पाणीपुरवठा करणारे नकाणे, डेडरगाव, हरण्यामाळ तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाले आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे