शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

शिवसेनेचा स्वबळाचा निर्णय फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:06 IST

शिवसेनेचा जागा मिळविण्याचा आलेख घसरता कायम

ठळक मुद्देशिवसेनेला ७४ जागांवर उमेदवार मिळाले नाहीत.मुस्लिम बहुल भागात शिवसेनेला उमेदवारच मिळाले नाही.२०१८च्या निवडणुकीत दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही.

अतुल जोशी। आॅनलाइन लोकमतधुळे : महापालिकेची निवडणूक प्रथमच स्वबळावर लढणाºया शिवसेनेला यावेळी दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही. त्यांचा स्बळाचा निर्णय फसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. तसेच  लोकसंग्राम पक्षाने पाठिंबा देवूनही त्याचा काहीच उपयोग झालेला नाही.  २००३ वगळता महापालिकेच्या चौथ्या निवडणुकीतही शिवसेनेचा जागा मिळविण्याचा आलेख घसरता कायम राहिला आहे.यापूर्वी झालेल्या महानगरपालिकेची निवडणूक शिवसेनेने भाजपासोबत युती करूनच लढविली. मात्र आगामी काळात होणाºया लोकसभा,विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने भाजपापासून फारकत घेत स्वबळावर निवडणूका लढण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्याच अंगलट आल्याचे स्पष्ट झाले.स्बळावर निवडणुकीला सामोरे जाणाºया शिवसेनेला ७४ जागांवर उमेदवार मिळाले नाहीत. त्यांना फक्त ४८ जागांवरच उमेदवार उभे करता आले. मुस्लिम बहुल भागात शिवसेनेला उमेदवारच मिळाले नाही. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ संपर्क प्रमुख के.पी.नाईक हे आठवडाभर शहरातच ठाण मांडून होते. तर उत्तर महाराष्टÑाचे संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत, पालकमंत्री दादा भुसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह अनेकजण शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरात दाखल झाले होते.  तसेच निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी महापौर हा शिवसेनेचाच असेल अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारीत शिवसेनेला वरचढ होऊ देण्याची संधीच मिळू दिली नाही. महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ही चौथी निवडणूक होती. २००३ मध्ये महापालिकेची स्थापना झाली. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने ३५ पेक्षा जास्त जागा जिंकून प्रथम महापौरपद मिळविण्याचा बहुमान शिवसेनेला मिळाला होता. मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला हे यश कायम राखता आले नाही. २००८ मध्ये १६ तर २०१३ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला ११ जागांवर समाधान मिळाले होते. यावेळी स्बळाचा नारा देवून निवडणूक रिंगणात उतरलेल्या शिवसेनेला २०१८च्या निवडणुकीत दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत शिवसेना व लोकसंग्राम पक्षांनी एकमेकांना पाठिंबा देवून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.मात्र त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. तसेच शिवसेनेने ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेस, अपक्ष विद्यमान नगरसेवकांनाही पक्षात प्रवेश देवून ऐनवेळी उमेदवारी दिली होती. मात्र त्याचा पक्षाला काहीच उपयोग झालेला नाही. या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या जागावरून शहरात त्यांना किती समर्थन आहे, हे स्पष्ट झालेले आहे. दरम्यान महापालिकेसोबत शिवसेना विधानसभा, लोकसभेची निवडणूकही स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी त्यांना अजून किती तयारी करावी लागेल हे स्पष्ट होते आहे. 

 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक