शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

शरद पवार यांनी नेत्यांना दिला ‘एकी’चा कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 13:51 IST

जि.प, पं.स. आणि महापालिका निवडणूक : काँग्रेस - राष्टÑवादीची आघाडी स्थापन होण्यावर शिक्कामोर्तब  

ठळक मुद्देखासदार शरद पवार यांनी सर्व नेत्यांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन केले. त्याला उपस्थित सर्वच नेतेमंडळींनी होकारही दिला. महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीने लढविली जाईल, हे ही निश्चित झाल्याचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आनंदहपरंतू पक्षातील गटा-तटाच्या राजकारणाचे काय, असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. कारण या गटा-तटाच्या राजकारणामुळे पक्षातील भल्या - भल्यांना पराभव पत्करावा लागला आहे. या पाडापाडीच्या राजकारणाचा फटका दोन्ही पक्षांना अनेकदा बसला आहे.त्यामुळे आघाडी स्थापन झाल्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांनी शरद पवारांनी आवाहन केल्याप्रमाणे गट-तट विसरुन आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी एकदिलाने काम केले पाहिजे, अशी प्रामाणिक अपेक्षा सर्वसामान्य पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.  

राजेंद्र शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  राष्टÑवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी रविवारी धुळ्यात दिलेल्या आपल्या  ९ मिनिटाच्या भाषणात व्यासपीठावर उपस्थित  काँग्रेस व राष्टÑवादीच्या पदाधिकारी आणि आमदारांना  एकत्र येण्याचा कानमंत्र दिला. त्यामुळे आगामी मनपा आणि जि.प., पं.स. निवडणूक काँग्रेस - राष्टÑवादी एकत्र लढतील, यावर   शिक्कामोर्तब झाल्याने सर्वसामान्य कार्यकर्ता आनंदीत झाला आहे. काँग्रेस - राष्टÑवादी आघाडी स्थापनेसंदर्भात ‘लोकमत’ने दिलेले वृत्त खरे ठरले.महापालिकेच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पाच वर्षानंतर खासदार शरद पवार हे धुळ्यात आले. त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने     धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार अमरिशभाई पटेल, आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार कुणाल पाटील, आमदार डी.एस. अहिरे  यांच्यासह  काँग्रेस - राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष, धुळे महानगर अध्यक्ष  बºयाच दिवसानंतर एकाच व्यासपीठावर दिसले.  गेल्या महापालिका  आणि जि.प. निवडणुकीत शिंदखेडा तालुका वगळता  काँग्रेस आणि राष्टÑवादी एकमेकाच्या विरोधात उभे होते. यंदाच्या निवडणुकीत गेल्यावेळेपेक्षा परिस्थिती वेगळी आहे. महापालिकेत राष्टÑवादीची सत्ता आहे. परंतु पाच वर्षात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाºयांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर मंगळवारी राष्टÑवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्टÑवादी अडचणीत आले आहे. राष्टÑवादीला यंदाच्या मनपा निवडणुकीत भाजपात गेलेल्या नगरसेवकाच्या जागी किंवा त्यांच्यासमोर त्याच तुल्यबळाचे उमेदवार उभे करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत, हद्दवाढीत महानगरात समाविष्ट झालेल्या गावांच्या  जागा आणि मुस्लिम बहुल भागात ज्याठिकाणी काँग्रेसचा प्रभाव आहे, त्या जागा काँग्रेसला दिल्यातर दोघांना त्याचा फायदा होऊ शकतो. काँग्रेसची शहरात परिस्थिती काय हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे काँग्रेसला राष्टÑवादीची साथ मिळाली तर चांगला रिझल्ट मिळू शकतो, हे दोन्ही पक्ष जाणतात. जिल्हा परिषदेतसुद्धा मताची विभागणी  आणि ग्रामीण भागात भाजपाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी   काँग्रेस - राष्टÑवादीला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, हे सर्व नेते जाणून आहे.राष्टÑवादीचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यक्रमात दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि आमदारांनी आवर्जून उपस्थिती देऊन आघाडीस एकप्रकारे संमती  दर्शविली आहे. तर धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी आगामी दोन्ही निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढवतील, अशी ग्वाही  आपल्या भाषणातून दिली. हाच धाग पकडून मनपा आणि जि.प.चे निकाल चांगले लागले तर  येणाºया लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याचा निश्चितच फायदा मिळेल. म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काम  करावे. त्यामुळे  शहर, जिल्ह्याचा आणि पुढे राज्याचाही विकास होईल, असा कानमंत्र खासदार शरद पवार यांनी आपल्या शैलीत जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांना दिला. आपल्या भाषणातून त्यांनी आगामी  दोन्ही निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढतील, हे सर्वांना स्पष्ट करुन दिले आहे. त्यांचा हा निर्णय दोन्ही पक्षांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

टॅग्स :DhuleधुळेSharad Pawarशरद पवार