कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य छगन राऊत होते. त्यांनी मार्गदर्शन करतेवेळी, आदिवासी समाजातील लोकांमध्ये असलेले कोरोना आजरा संदर्भात असलेले, प्रथम मतभेद दूर करावे. ज्यांना ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी ही लक्षणे असल्यास ताबडतोब जवळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात यावे असे, अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. ज्या गावांमध्ये करोना आजाराचे जास्त रुग्ण आहेत, त्या गावामध्ये ‘कोविड-१९’ चाचणी शिबिर आयोजित करावे. तसेच जास्त रुग्ण सापडले तर, गाव काही दिवसांसाठी बंद करा. कोरोना आजारावर आलेली लस ही सगळ्यांनी घेतली पाहिजे, त्यांचे महत्त्व व फायदे काय आहेत आणि जे काही अफवा आहेत म्हणून लोकांना ५० वर्षापूर्वी आलेल्या ‘दैवी’ आजाराचे उदाहरण द्या. जेणकरून लोकांचे परिवर्तन होईल. काही जणांना लक्षणे आहेत, तरी दवाखान्यात जात नाही, असे रुग्ण निदर्शनास आले. तर आशासेविका यांनी स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात यावे. स्वच्छता, आरोग्य, तपासणी, लसीकरण, मास्क इ. महत्त्व समजावून दिले आणि ‘माणसात अंतर ठेवा माणुसकीत नको’ हा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
यावेळी जि.प. सदस्य. छगन राऊत, डॉ. प्रताप गावीत, आनंदाशेठ सूर्यवंशी, सरपंच सचिन राऊत, अनिल कुवर, अविनाश कुवर व पोलीस पाटील, परिचारिका, आशासेविका ग्रामस्थ आदी उपस्थित होते.