शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
3
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
4
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
5
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
6
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
7
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
8
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
9
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
10
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
11
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
12
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
13
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
14
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
15
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
16
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
17
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
18
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
19
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
20
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी एक; तानसा तलाव भरून वाहू लागला!

मनपा क्षेत्रातील शाळा १४ पर्यंत बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:33 IST

महापालिका क्षेत्रातील २११ शाळा ७ मार्चपर्यंत बंद महापालिकेच्या ९वी ते १२वीच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये १४ डिसेंबर २० व पाचवी ...

महापालिका क्षेत्रातील २११ शाळा ७ मार्चपर्यंत बंद

महापालिकेच्या ९वी ते १२वीच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये १४ डिसेंबर २० व पाचवी ते आठवीच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा २७ जानेवारी २०२१पासून ५० टक्के उपस्थितीनुसार सुरू झाल्या होत्या. मनपा क्षेत्रात एकूण २११शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत.

मात्र शहरातील काही शाळांमधील शिक्षकांना कोराेनाची लागण झाल्याने, मुख्याध्यापकांची तातडीची बैठक घेण्यात आली. त्यात ज्या शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी कोरोना पॅाझिटिव्ह आले असतील त्या शाळांमधील इयत्ता पाचवी ते १२वीपर्यंतचे सर्व वर्ग तसेच ज्या शाळांमध्ये कर्मचारी विद्यार्थी पॅाझिटिव्ह आढळले नसतील त्या शाळांमध्ये दहावी व बारावीचे वर्ग वगळून पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून २६ फेब्रुवारीपासून ७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. मात्र शहरात कोरोनाचा कहर कमी होण्याचे प्रमाण दिसत नाही. उलट गेल्या आठवड्यात काही शाळांमधील दहावीला शिकविणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे शाळा बंदच्या निर्णयात अजून वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता मनपा क्षेत्रातील शाळा १४ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत, असे सोनवणे यांनी सांगितले.