शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सकाळची, वेळ मात्र गैर सोयीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 11:36 IST

जिल्हा परिषद : शाळेचीवेळ सकाळी ११.३० पर्यंत करण्याच्या मागणीकडे शिक्षण विभागाने केले दुर्लक्ष

ठळक मुद्देजिल्ह्यात जि.प.च्या ११०३ शाळाशाळेची वेळ सकाळी ७ ते १२ केलीमात्र ही वेळ गैरसोयीची असल्याची तक्रार

आॅनलाइन लोकमतधुळे : गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागताच, जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळांच्या वेळेतही बदल केला आहे. १ मार्चपासून शाळा सकाळी ७ ते दुपारी १२ यावेळेत भरत आहेत. मात्र शाळेच्या वेळेत झालेला बदल हा गैरसोयीचा असून, शाळेची वेळ सकाळी ७ ते ११.३० अशी करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केला आहे.धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ११०३ शाळा असून, यात पहिली ते चौथीपर्यंत जवळपास ८० हजारापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असतात. जून ते फेबु्रवारीपर्यंत या शाळा सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत भरत असतात.मात्र जिल्ह्यात यावर्षी दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. तसेच दिवसेंदिवस तापमानाही वाढू लागलेले आहे. उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत अनेक विद्यार्थी आजारी पडतात आदी गोष्टींचा विचार करून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने १ मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळांच्यावेळेत बदल केलेला आहे.शाळा सकाळच्या सत्रात भरू लागल्या आहेत. शाळेची वेळ सकाळी ७.२० ते ११.३० करावी अशी शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून जि.प.ने ही वेळ सकाळी ७ ते दुपारी १२ अशी केलेली आहे. ही वेळ विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीची ठरत असल्याचे काही शिक्षकांचे म्हणणे आहे.अनेक शाळा टिनाच्याजिल्हा परिषदेच्या शाळा पूर्वी कौलारू होत्या. मात्र या कौलारूंची जागा आता टिन (पत्र्यांनी) घेतलेली आहे. नव्या शाळा स्लॅबच्या असल्या तरी आजही ७० टक्के शाळा या पत्र्याच्या खोलीतच भरत असतात. सकाळी १० वाजेपासूनच पत्रे तापायला सुरूवात होत असते. त्यामुळे विद्यार्थी या वर्गात जास्तवेळ बसू शकत नाही, अशी स्थिती आहे. अनेक ठिकाणी वर्गखोल्या या हवेशीर नाहीत. जिल्हा परिषद शाळांमध्ये पंख्याची सुविधा नाही. अशा असह्य उकाड्यामध्ये बसणे विद्यार्थ्यांना अशक्य होत असते.सद्यस्थितीत जिल्ह्यातील काही शाळांमध्ये पाणी टंचाई जाणवत असल्याने, विद्यार्थ्यांना घरूनच पाणी आणावे लागत असल्याचे चित्र आहे.शिवाय जिल्हा परिषद शाळांमध्ये सकाळी १० ते १०.३० वाजेच्या सुमारास शालेय पोषण आहार दिला जातो. आहारानंतर विद्यार्थी अनेकदा शाळेत थांबत नाही, अशीही स्थिती आहे.विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा सकाळच्या सत्रात केल्या असल्या तरी दुपारी १२च्या सुमारास उन्हाची तीव्रता प्रचंड असते. उन्हाचा फटका बसून, विद्यार्थी आजारी पडला तर त्यास जबाबदार कोण असाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे या शाळांची वेळ अर्धातास अगोदर करणे गरजेचे आहे, असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.सकाळी ११.३०पर्यंतची वेळ करावीजिल्हा परिषद शाळांमध्ये दररोज सहा तासिका होत असतात. शाळेची वेळ सकाळी ७.२० ते ११.३० अशी केली तरी सहा तासिका होऊ शकतात, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शाळेचीवेळ सकाळी ११.३० पर्यंत करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणDhuleधुळे