शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

वाळू माफियांचा हैदोस सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 11:19 IST

भल्या पहाटे होतो उपसा : धोबी धवन बंधारा सोडून आता अमरावती नदी पात्रात वळविला मोर्चा

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील दोंडाईचा साक्री रस्त्यालगत धोबी धवन बंधारा सोडून रात्री, भल्या पहाटे पासून अमरावती नदी पात्रातून वाळुचा अवैध उपसा होत असुन यांना कोणाचा धाक उरला नसल्याचे स्पष्ट होते. येथे अक्षरश: या माफियांनी हैदोस घातला असुन महसूल विभागाचा आशीर्वाद असून याला अर्थकारण जबाबदार असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. याबाबत तक्रार करुन देखील पाठिशी घातले जात आहे.येथे वाळु माफियांनी प्रचंड हैदोस घातला असून भल्या पहाटे रात्रीतून उपशाला सुरुवात होत असते. ही वाळुची दोंडाईचा शहरांच्या दिसेने वाहतूक होते. यामुळे दोंडाईचा-मालपूर रस्त्याची देखील दुरवस्था होण्यास वेळ लागणार नाही. मात्र याकडे महसूल विभाग पध्दतशीर डोळे झाक करत आहे . या वाळुची दोंडाईचाहून लांब दिशेने प्रवास होत असल्याचे दबक्या आवाजात सांगितले जाते. यामुळे ट्रॅक्टरधारक देखील लाखोंचा शासनाचा महसूल बुडवित असेल तर याला जबाबदार कोण? यासंदर्भात ‘लोकमत’मधुन वृत्त प्रसारित झाल्यानंतर या वाळु तस्करांनी धोबी धवन बंधारा सोडून अमरावती नदी पात्र निवडले आहे. याकडे कोणी बोट दाखवला त्याचा शोध घ्यावा, असे तेथील शेतकरी भटु रावल यांनी मागणी केली आहे.यापूर्वी देखील अमरावती मध्यम प्रकल्पातून राजरोसपणे अवैध वाळुचा उपसा होत होता. मात्र हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे या वाळु माफियांनी त्यांचा मोर्चा आता अमरावती नदी पात्र, धोबी धवन बंधारा परिसर तसेच शेतशिवारातील लहान मोठे लवण याकडे वळवला आहे. याआधी सुराय ग्रामस्थांनी त्यांच्या शिवारामधुन काही ट्रॅक्टर पकडून महसूल अधिकाऱ्यांकडे सोपविले होते. मात्र थातुरमाथुर कार्यवाही करुन सोडून दिल्याचे समजते. यामुळे गावकरी आता रिस्क घेण्याचे टाळतात. यामुळे वाळु माफिया फोफावतांना दिसून येत आहेत.यावर्षी प्रचंड पाऊस झाल्याने अमरावती प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. दोन वेळेस पुन्हा भरला असता एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळुचा साठा असून अतिशय चांगल्या प्रकारची वाळु असल्यामुळे तिला मोठी मागणी आहे. यामुळे वाळू माफियांचे चांगलेच फावले आहे. येथे वाळुचा कुठल्याही प्रकारचा ठेका दिला नसून अवैध उपसा होत आहे. तरी याकडे महसूल विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन ही वाळु चोरी ताबडतोब थांबवावी, अशी मागणी गावातील ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच केलेल्या तक्रारीची दखल घ्यावी.

टॅग्स :Dhuleधुळे