शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
3
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
4
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
5
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
6
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
7
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
8
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
9
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
10
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
11
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
12
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
13
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
14
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
16
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
17
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
18
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
19
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
20
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता लागताच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दीर्घ रजांवर निर्बंध - महापालिका आयुक्त

By देवेंद्र पाठक | Updated: March 17, 2024 16:31 IST

निवडणूक कामात दिरंगाई, हलगर्जीपणा खपवून घेणार नाही

धुळे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्यावर साेपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडावी. यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी सूचना महापालिका प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी बैठकीत दिली. दरम्यान, महापालिकेतील कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी दीर्घ रजेवर जाऊ नये. असे निर्बंध बैठकीतून लावण्यात आले. यावेळी अधिकारी उपस्थित होते.

लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी सायंकाळपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत महापालिकेची भूमिका नेमकी काय असेल, यासंदर्भात आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी त्यांच्या दालनात रविवारी सुटीचा दिवस असूनसुद्धा तातडीची बैठक बोलाविली होती. त्या वेळी त्या बोलत होत्या. लाेकसभा निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी करण्याकामी सोपविण्यात आलेली जबाबदारी यासंदर्भात आयुक्तांनी बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीत आयुक्तांनी अधिकारी अणि त्यांच्याकडे निवडणूक संदर्भात कोणती जबाबदारी सोपविली आहे, याबाबत अवगत करून देण्यात आले.

त्यात प्रामुख्याने कुठल्याही कामाचे नवीन कार्यादेश देऊ नये. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जे कार्यादेश निर्गमित केले आहे व त्यापैकी जे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे तीच कामे पुढे चालू ठेवता येतील. कार्यादेश दिला तथापि प्रत्यक्षात काम सुरू झाले नसल्यास ते काम सुरू करू नये. मतदान केंद्रावरील रॅम्प, फर्निचर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाईट व्यवस्था, शाळा डागडुजी, साफसफाई आदीबाबत कार्यवाही करणे. १९ मार्चपर्यंत मतदान केंद्र सुस्थितीत निर्माण करणे. लवकरात लवकर राजकीय बॅनर, फलक, कोनशिला, कुंपण भिंतीवरील फलक झाकण्यात यावे तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात सादर करावा.

आदर्श आचारसंहितेची काटेकाेरपणे अंमलबजावणी करावी. शिक्षण संस्थाचा शालेय कामकाजासाठीच वापर होईल याकडे लक्ष द्यावे. महापालिकेची वेबसाइट, सोशल मीडियावरील राजकीय व्यक्तीचे फोटो जाहिरात ताबडतोब काढण्यात यावी. महापालिकेतील १०९ क्रमांकाच्या दालनात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून, तेथे अधिकारी व काही कर्मचारी नियुक्त करण्यात आले. शिवाय टोल फ्री क्रमांकाची व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधीत कोणत्याही कर्मचाऱ्यास दीर्घ रजेवर सोडू नये. तसेच विभागप्रमुखांनीही दीर्घ रजेवर जाऊ नये. रजेवर जाणे खूपच आवश्यक असल्यास परवानगी घेणे महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना आता बंधनकारक करण्यात आले.