शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

आचारसंहिता लागताच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दीर्घ रजांवर निर्बंध - महापालिका आयुक्त

By देवेंद्र पाठक | Updated: March 17, 2024 16:31 IST

निवडणूक कामात दिरंगाई, हलगर्जीपणा खपवून घेणार नाही

धुळे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्यावर साेपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडावी. यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी सूचना महापालिका प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी बैठकीत दिली. दरम्यान, महापालिकेतील कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी दीर्घ रजेवर जाऊ नये. असे निर्बंध बैठकीतून लावण्यात आले. यावेळी अधिकारी उपस्थित होते.

लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी सायंकाळपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत महापालिकेची भूमिका नेमकी काय असेल, यासंदर्भात आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी त्यांच्या दालनात रविवारी सुटीचा दिवस असूनसुद्धा तातडीची बैठक बोलाविली होती. त्या वेळी त्या बोलत होत्या. लाेकसभा निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी करण्याकामी सोपविण्यात आलेली जबाबदारी यासंदर्भात आयुक्तांनी बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीत आयुक्तांनी अधिकारी अणि त्यांच्याकडे निवडणूक संदर्भात कोणती जबाबदारी सोपविली आहे, याबाबत अवगत करून देण्यात आले.

त्यात प्रामुख्याने कुठल्याही कामाचे नवीन कार्यादेश देऊ नये. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जे कार्यादेश निर्गमित केले आहे व त्यापैकी जे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे तीच कामे पुढे चालू ठेवता येतील. कार्यादेश दिला तथापि प्रत्यक्षात काम सुरू झाले नसल्यास ते काम सुरू करू नये. मतदान केंद्रावरील रॅम्प, फर्निचर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाईट व्यवस्था, शाळा डागडुजी, साफसफाई आदीबाबत कार्यवाही करणे. १९ मार्चपर्यंत मतदान केंद्र सुस्थितीत निर्माण करणे. लवकरात लवकर राजकीय बॅनर, फलक, कोनशिला, कुंपण भिंतीवरील फलक झाकण्यात यावे तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात सादर करावा.

आदर्श आचारसंहितेची काटेकाेरपणे अंमलबजावणी करावी. शिक्षण संस्थाचा शालेय कामकाजासाठीच वापर होईल याकडे लक्ष द्यावे. महापालिकेची वेबसाइट, सोशल मीडियावरील राजकीय व्यक्तीचे फोटो जाहिरात ताबडतोब काढण्यात यावी. महापालिकेतील १०९ क्रमांकाच्या दालनात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून, तेथे अधिकारी व काही कर्मचारी नियुक्त करण्यात आले. शिवाय टोल फ्री क्रमांकाची व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधीत कोणत्याही कर्मचाऱ्यास दीर्घ रजेवर सोडू नये. तसेच विभागप्रमुखांनीही दीर्घ रजेवर जाऊ नये. रजेवर जाणे खूपच आवश्यक असल्यास परवानगी घेणे महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना आता बंधनकारक करण्यात आले.