शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

आचारसंहिता लागताच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दीर्घ रजांवर निर्बंध - महापालिका आयुक्त

By देवेंद्र पाठक | Updated: March 17, 2024 16:31 IST

निवडणूक कामात दिरंगाई, हलगर्जीपणा खपवून घेणार नाही

धुळे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्यावर साेपविण्यात आलेली जबाबदारी पार पाडावी. यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी सूचना महापालिका प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी बैठकीत दिली. दरम्यान, महापालिकेतील कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी दीर्घ रजेवर जाऊ नये. असे निर्बंध बैठकीतून लावण्यात आले. यावेळी अधिकारी उपस्थित होते.

लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी सायंकाळपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत महापालिकेची भूमिका नेमकी काय असेल, यासंदर्भात आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी त्यांच्या दालनात रविवारी सुटीचा दिवस असूनसुद्धा तातडीची बैठक बोलाविली होती. त्या वेळी त्या बोलत होत्या. लाेकसभा निवडणूक २०२४ आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी करण्याकामी सोपविण्यात आलेली जबाबदारी यासंदर्भात आयुक्तांनी बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीत आयुक्तांनी अधिकारी अणि त्यांच्याकडे निवडणूक संदर्भात कोणती जबाबदारी सोपविली आहे, याबाबत अवगत करून देण्यात आले.

त्यात प्रामुख्याने कुठल्याही कामाचे नवीन कार्यादेश देऊ नये. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जे कार्यादेश निर्गमित केले आहे व त्यापैकी जे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे तीच कामे पुढे चालू ठेवता येतील. कार्यादेश दिला तथापि प्रत्यक्षात काम सुरू झाले नसल्यास ते काम सुरू करू नये. मतदान केंद्रावरील रॅम्प, फर्निचर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाईट व्यवस्था, शाळा डागडुजी, साफसफाई आदीबाबत कार्यवाही करणे. १९ मार्चपर्यंत मतदान केंद्र सुस्थितीत निर्माण करणे. लवकरात लवकर राजकीय बॅनर, फलक, कोनशिला, कुंपण भिंतीवरील फलक झाकण्यात यावे तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात सादर करावा.

आदर्श आचारसंहितेची काटेकाेरपणे अंमलबजावणी करावी. शिक्षण संस्थाचा शालेय कामकाजासाठीच वापर होईल याकडे लक्ष द्यावे. महापालिकेची वेबसाइट, सोशल मीडियावरील राजकीय व्यक्तीचे फोटो जाहिरात ताबडतोब काढण्यात यावी. महापालिकेतील १०९ क्रमांकाच्या दालनात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून, तेथे अधिकारी व काही कर्मचारी नियुक्त करण्यात आले. शिवाय टोल फ्री क्रमांकाची व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधीत कोणत्याही कर्मचाऱ्यास दीर्घ रजेवर सोडू नये. तसेच विभागप्रमुखांनीही दीर्घ रजेवर जाऊ नये. रजेवर जाणे खूपच आवश्यक असल्यास परवानगी घेणे महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना आता बंधनकारक करण्यात आले.