शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 11:37 IST

पाणी टंचाई निवारण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना

ठळक मुद्देजिल्ह्यात अनेक गावांना पाणी टंचाईटॅँकर भरण्यासाठी पाणी नाहीआतापासूनच उपाययोजना करण्याची गरज

आॅनलाइन लोकमतधुळे- जिल्ह्यात यावर्षी झालेल्या असमाधानकारक पावसामुळे खरीपाचे उत्पन्न हातचे गेले आहे. आतापासूनच अनेक ठिकाणी पाणी,चारा टंचाई भेडसावू लागली आहे. दुष्काळी तालुक्यात फक्त धुळे, शिंदखेडा तालुक्याचाच समावेश केलेला आहे. मात्र संपूर्ण जिल्ह्यात  परिस्थिती गंभीर असल्याने, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सदस्यांनी केल्याने, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. दरम्यान शिक्षण विभागातील ९ सेवानिवृत्त कर्मचाºयांचे प्रवास देयके जि.प.फंडातून देण्याचा विषय तूर्त तहकूब करण्यात आला.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा  कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, शिक्षण सभापती नूतन निकुंभ, पशुसंवर्धन सभापती लिला बेडसे, उपस्थित होत्या. जिल्ह्यात यावर्षी असमाधानकारक पाऊस झालेला आहे. अनेक गावांना पाणी टंचाई भेडसावू लागलेली आहे. चाºयाचाही प्रश्न गंभीर झालेला आहे. एवढी भीषण स्थिती असतांना प्रशासनातर्फे फक्त धुळे, शिंदखेडा तालुक्यातच दुष्काळ असल्याचे सांगण्यात येते. मात्र शिरपूर, साक्री तालुक्यातही अनेक गावांमध्ये पाणी, चारा टंचाई आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. कृती आराखडा तयार करावाबैठकीत मधुकर गर्दे यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. जिल्ह्यात अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. आगामी काळात पाण्याचा टॅँकर कुठून भरावा, कोणती विहिर अधिग्रहित करावी असा प्रश्न निर्माण होऊ शकेल. त्यामुळे आतापासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यावर शिवाजी दहिते यांनी अधिकाºयांना तालुकानिहा बैठका घेऊन कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या. साक्री तालुक्यातील म्हसदी येथेही २०-२५ दिवसानंतर पाणी मिळते. येथील पाणी प्रश्नावरही चर्चा झाली. गुरांच्या संख्येनुसार टॅँकर वाढवावेजिल्ह्यात ज्या ठिकाणी टॅँकर सुरू आहे, ते केवळ दरडोईच्या हिशोबानुसारच आहे. मात्र जिल्हयात गुरांच्या चाºयाबरोबरच गुरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झालेला आहे.त्यामुळे गुरांच्या संख्येनुसारच टॅँकर वाढवावे अशी सूचना सदस्यांनी केली. दरम्यान पाणी टंचाई असल्याने विटाई गावात केवळ एकचवेळ जनावरांना पाणी पाजले जाते असेही सांगण्यात आले.  

टॅग्स :Dhuleधुळे