शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 11:37 IST

पाणी टंचाई निवारण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना

ठळक मुद्देजिल्ह्यात अनेक गावांना पाणी टंचाईटॅँकर भरण्यासाठी पाणी नाहीआतापासूनच उपाययोजना करण्याची गरज

आॅनलाइन लोकमतधुळे- जिल्ह्यात यावर्षी झालेल्या असमाधानकारक पावसामुळे खरीपाचे उत्पन्न हातचे गेले आहे. आतापासूनच अनेक ठिकाणी पाणी,चारा टंचाई भेडसावू लागली आहे. दुष्काळी तालुक्यात फक्त धुळे, शिंदखेडा तालुक्याचाच समावेश केलेला आहे. मात्र संपूर्ण जिल्ह्यात  परिस्थिती गंभीर असल्याने, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सदस्यांनी केल्याने, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. दरम्यान शिक्षण विभागातील ९ सेवानिवृत्त कर्मचाºयांचे प्रवास देयके जि.प.फंडातून देण्याचा विषय तूर्त तहकूब करण्यात आला.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा  कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, शिक्षण सभापती नूतन निकुंभ, पशुसंवर्धन सभापती लिला बेडसे, उपस्थित होत्या. जिल्ह्यात यावर्षी असमाधानकारक पाऊस झालेला आहे. अनेक गावांना पाणी टंचाई भेडसावू लागलेली आहे. चाºयाचाही प्रश्न गंभीर झालेला आहे. एवढी भीषण स्थिती असतांना प्रशासनातर्फे फक्त धुळे, शिंदखेडा तालुक्यातच दुष्काळ असल्याचे सांगण्यात येते. मात्र शिरपूर, साक्री तालुक्यातही अनेक गावांमध्ये पाणी, चारा टंचाई आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. कृती आराखडा तयार करावाबैठकीत मधुकर गर्दे यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. जिल्ह्यात अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. आगामी काळात पाण्याचा टॅँकर कुठून भरावा, कोणती विहिर अधिग्रहित करावी असा प्रश्न निर्माण होऊ शकेल. त्यामुळे आतापासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यावर शिवाजी दहिते यांनी अधिकाºयांना तालुकानिहा बैठका घेऊन कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या. साक्री तालुक्यातील म्हसदी येथेही २०-२५ दिवसानंतर पाणी मिळते. येथील पाणी प्रश्नावरही चर्चा झाली. गुरांच्या संख्येनुसार टॅँकर वाढवावेजिल्ह्यात ज्या ठिकाणी टॅँकर सुरू आहे, ते केवळ दरडोईच्या हिशोबानुसारच आहे. मात्र जिल्हयात गुरांच्या चाºयाबरोबरच गुरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झालेला आहे.त्यामुळे गुरांच्या संख्येनुसारच टॅँकर वाढवावे अशी सूचना सदस्यांनी केली. दरम्यान पाणी टंचाई असल्याने विटाई गावात केवळ एकचवेळ जनावरांना पाणी पाजले जाते असेही सांगण्यात आले.  

टॅग्स :Dhuleधुळे