शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी अथक प्रयत्न - भाजपा नेते कैलास विजयवर्गीय

By देवेंद्र पाठक | Updated: June 5, 2023 17:10 IST

देशाच्या सुरक्षासंदर्भात भारत देश तिसऱ्यास्थानी असून अर्थ व्यवस्थेत पाचव्यास्थानी आहे असं कैलास विजयवर्गीय म्हणाले.

धुळे - संपूर्ण देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी गेल्या ९ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अथक प्रयत्न केले. विविध क्षेत्रांत केलेली कामगिरी ही संपूर्ण जगात उल्लेखनीय ठरली. सामान्यांना जी आश्वासने दिली ती जवळपास पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारने केला असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी पत्रकार परिषदेत केला.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला तब्बल ९ वर्षे झाले आहेत. या ९ वर्षांत केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा सादर करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विजयवर्गीय धुळ्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. प्रदेश सरचिटणीस विजय चाैधरी, खा. डाॅ. सुभाष भामरे, आ. जयकुमार रावल, महापौर प्रतिभा चौधरी, शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, प्रदीप कर्पे, यशवंत येवलेकर आदी उपस्थित होते.

विजयवर्गीय म्हणाले, कोरोनाच्या कार्यकाळात संकटावर मात करत असतानाच मंदीच्या लाटेत सक्षमपणे उभे राहण्याचा प्रयत्न केला. उद्योग, उत्पादन आणि इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये सहभाग नोंदविला. भारताचा जीडीपी उंचाविण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक क्षेत्रात विकासासाठी प्रयत्न केले. २०१४ पूर्वी देशाच्या सुरक्षेसंदर्भात आयात केले जात होते. पण त्याच बाबी आपण निर्यात करत आहोत. कोरोना काळात आपण स्वत: व्हॅक्सिन बनविले. आपण ते शंभर देशात निर्यातदेखील केले. गरीब कल्याणाच्या विविध योजना राबवून त्यांचे जीवनमान उंचाविले. दलाल संस्कृती संपुष्टात आणल्यामुळे योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत मिळू लागला. भ्रष्टाचार रोखला. भ्रष्टाचार होऊ दिला नाही. राममंदिराचा प्रश्न तडीस नेला. जानेवारी २०२४ मध्ये रामाचे दर्शन प्रत्येक भारतीय घेऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशाच्या सुरक्षासंदर्भात भारत देश तिसऱ्यास्थानी असून अर्थ व्यवस्थेत पाचव्यास्थानी आहे. भारताने संपूर्ण देशात आपले स्थान अबाधित ठेवले आहे. संपूर्ण जगात भारत देशाने आपले स्थान उंचावले आहे. निवडणुकीच्या काळात जी आश्वासने नागरिकांना दिली होती. ती जवळपास पूर्ण करण्याचा प्रयत्न मोदी सरकारन केलेला आहे, असेही कैलास विजयवर्गीय यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :BJPभाजपा