शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी अथक प्रयत्न - भाजपा नेते कैलास विजयवर्गीय

By देवेंद्र पाठक | Updated: June 5, 2023 17:10 IST

देशाच्या सुरक्षासंदर्भात भारत देश तिसऱ्यास्थानी असून अर्थ व्यवस्थेत पाचव्यास्थानी आहे असं कैलास विजयवर्गीय म्हणाले.

धुळे - संपूर्ण देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी गेल्या ९ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अथक प्रयत्न केले. विविध क्षेत्रांत केलेली कामगिरी ही संपूर्ण जगात उल्लेखनीय ठरली. सामान्यांना जी आश्वासने दिली ती जवळपास पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारने केला असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी पत्रकार परिषदेत केला.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला तब्बल ९ वर्षे झाले आहेत. या ९ वर्षांत केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा सादर करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विजयवर्गीय धुळ्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. प्रदेश सरचिटणीस विजय चाैधरी, खा. डाॅ. सुभाष भामरे, आ. जयकुमार रावल, महापौर प्रतिभा चौधरी, शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, प्रदीप कर्पे, यशवंत येवलेकर आदी उपस्थित होते.

विजयवर्गीय म्हणाले, कोरोनाच्या कार्यकाळात संकटावर मात करत असतानाच मंदीच्या लाटेत सक्षमपणे उभे राहण्याचा प्रयत्न केला. उद्योग, उत्पादन आणि इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये सहभाग नोंदविला. भारताचा जीडीपी उंचाविण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक क्षेत्रात विकासासाठी प्रयत्न केले. २०१४ पूर्वी देशाच्या सुरक्षेसंदर्भात आयात केले जात होते. पण त्याच बाबी आपण निर्यात करत आहोत. कोरोना काळात आपण स्वत: व्हॅक्सिन बनविले. आपण ते शंभर देशात निर्यातदेखील केले. गरीब कल्याणाच्या विविध योजना राबवून त्यांचे जीवनमान उंचाविले. दलाल संस्कृती संपुष्टात आणल्यामुळे योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत मिळू लागला. भ्रष्टाचार रोखला. भ्रष्टाचार होऊ दिला नाही. राममंदिराचा प्रश्न तडीस नेला. जानेवारी २०२४ मध्ये रामाचे दर्शन प्रत्येक भारतीय घेऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशाच्या सुरक्षासंदर्भात भारत देश तिसऱ्यास्थानी असून अर्थ व्यवस्थेत पाचव्यास्थानी आहे. भारताने संपूर्ण देशात आपले स्थान अबाधित ठेवले आहे. संपूर्ण जगात भारत देशाने आपले स्थान उंचावले आहे. निवडणुकीच्या काळात जी आश्वासने नागरिकांना दिली होती. ती जवळपास पूर्ण करण्याचा प्रयत्न मोदी सरकारन केलेला आहे, असेही कैलास विजयवर्गीय यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :BJPभाजपा