शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी अथक प्रयत्न - भाजपा नेते कैलास विजयवर्गीय

By देवेंद्र पाठक | Updated: June 5, 2023 17:10 IST

देशाच्या सुरक्षासंदर्भात भारत देश तिसऱ्यास्थानी असून अर्थ व्यवस्थेत पाचव्यास्थानी आहे असं कैलास विजयवर्गीय म्हणाले.

धुळे - संपूर्ण देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी गेल्या ९ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अथक प्रयत्न केले. विविध क्षेत्रांत केलेली कामगिरी ही संपूर्ण जगात उल्लेखनीय ठरली. सामान्यांना जी आश्वासने दिली ती जवळपास पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारने केला असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी पत्रकार परिषदेत केला.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला तब्बल ९ वर्षे झाले आहेत. या ९ वर्षांत केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा सादर करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विजयवर्गीय धुळ्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. प्रदेश सरचिटणीस विजय चाैधरी, खा. डाॅ. सुभाष भामरे, आ. जयकुमार रावल, महापौर प्रतिभा चौधरी, शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, प्रदीप कर्पे, यशवंत येवलेकर आदी उपस्थित होते.

विजयवर्गीय म्हणाले, कोरोनाच्या कार्यकाळात संकटावर मात करत असतानाच मंदीच्या लाटेत सक्षमपणे उभे राहण्याचा प्रयत्न केला. उद्योग, उत्पादन आणि इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये सहभाग नोंदविला. भारताचा जीडीपी उंचाविण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक क्षेत्रात विकासासाठी प्रयत्न केले. २०१४ पूर्वी देशाच्या सुरक्षेसंदर्भात आयात केले जात होते. पण त्याच बाबी आपण निर्यात करत आहोत. कोरोना काळात आपण स्वत: व्हॅक्सिन बनविले. आपण ते शंभर देशात निर्यातदेखील केले. गरीब कल्याणाच्या विविध योजना राबवून त्यांचे जीवनमान उंचाविले. दलाल संस्कृती संपुष्टात आणल्यामुळे योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत मिळू लागला. भ्रष्टाचार रोखला. भ्रष्टाचार होऊ दिला नाही. राममंदिराचा प्रश्न तडीस नेला. जानेवारी २०२४ मध्ये रामाचे दर्शन प्रत्येक भारतीय घेऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशाच्या सुरक्षासंदर्भात भारत देश तिसऱ्यास्थानी असून अर्थ व्यवस्थेत पाचव्यास्थानी आहे. भारताने संपूर्ण देशात आपले स्थान अबाधित ठेवले आहे. संपूर्ण जगात भारत देशाने आपले स्थान उंचावले आहे. निवडणुकीच्या काळात जी आश्वासने नागरिकांना दिली होती. ती जवळपास पूर्ण करण्याचा प्रयत्न मोदी सरकारन केलेला आहे, असेही कैलास विजयवर्गीय यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :BJPभाजपा