शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

शाळकरी मुलांचा रंगतोय गोट्यांचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST

वर्षभरापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. जीवनमरणाचा खेळ सुरू आहे. शाळा, कॉलेज सर्व ...

वर्षभरापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. जीवनमरणाचा खेळ सुरू आहे. शाळा, कॉलेज सर्व बद झाले आहे. मधल्या काळात विद्यार्थ्यांना मोबाईलद्वारे शिक्षणाचे धडे मिळत होते; परंतु ग्रामीण भागातील गोरगरीब मुलांकडे महागडे मोबाईल नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले. त्यामुळे अभ्यासाचा ताण कमी झाला आहे. शाळा बंद, अभ्यास बंद असल्यामुळे मुलांपुढे टीव्ही पाहणे किवा खेळण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊन अभ्यासावरचे लक्ष विचलित होत आहे. गेल्या वर्षभरापासून शाळा बंद असल्यामुळे शाळेचे पटांगण मुलांसाठी खेळण्याचे ठिकाण झाले आहे. अभ्यास नसल्यामुळे वडजाई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पटांगणात गोट्या-गोट्यांचा डाव रंगत आहे. हा डाव पाहून मोठी मंडळीही हाैस भागवून घेत आहेत.

कालबाह्य झालेले जुने खेळ कोरोनामुळे खेळताना लहान विद्यार्थी दिसून येत आहेत. लहान मुलांमध्ये सर्वांत प्रिय असलेला विटीदांडू, गोट्या-गोट्या, लगोरी, कबड्डी, आदी खेळ खेळले जात आहेत.

कालबाह्य झालेले खेळ खेळले जात असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांना त्यांचे विशेष आकर्षण आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे बालपणाचे दिवस आठवू लागले आहेत. मुलांचे शाळा आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असले तरी या बिकट प्रसंगात ते तरी काय करणार, असा प्रश्न आहे. पालकांना मुलांच्या अभ्यासाची चिंता असली तरी हे त्यांचे खेळण्याचे वय आहे.