शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

रमाई घरकुल योजनेची कासवाच्या गतीने वाटचाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:16 IST

३१ टक्के घरकुल पूर्णत्वास: धुळे तालुका अव्वल : आठशे लाभार्थ्यांना मिळाले हक्कांचे घर

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : ग्रामीण भागातील दलित वस्त्यांचा कायापालट करून त्याला नवे रूप देण्यासाठी शासनाने रमाई आवास योजनेंतर्गत नाविन्यपूर्ण घरकुल योजने सुरू केली आहे़ मात्र या योजनेची वाटचाल कासव गतीने होत असल्याने आतापर्यत तीन वर्षात  ८७९ लाभार्थ्यांना हक्कांचे घरकुल मिळाले आहे़    राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सुरु करण्यात आलेली रमाई आवास योजना राबविण्यात येत आहे़ या योजनेसाठी जिल्ह्यास ३ हजार ४९ घरकुलाचे उद्दिष्टे प्रशासनाकडून देण्यात आले होते़  त्यापैकी ३ हजार ३० घरकुलांना प्रत्येक्ष मंजुरी मिळाली होती़ लाभार्थ्यांना  पहिल्या हफ्त्यात धनादेश वितरित करण्यात आल्यानंतर कामांना सुरवात झाली होती़रमाई आवास योजनेच्या स्थिती अशीधुळे तालुक्यासाठी १ हजार ५५ उदिष्ठे देण्यात आले होते़ त्यापैकी १ हजार २४७ घरकुलांना मंजुरी, ३७८ घरकुल पूर्ण झाली आहेत़ त्यापैकी अद्यापक ८६९ घरकुल अपुर्ण आहेत़ साक्री ५४४ घरकुल मंजुरी, १३३ पुर्ण, ४११ अपुर्ण घरकुल, शिंदखेडा तालुका ६६३ मंजुरी १७६ पुर्ण, ४८४ अपुर्ण, शिरपूर तालुक्यात ५७६ मंजुरी, १९२ पुुर्ण, ३८४ अपुर्ण घरकुल आहेत़ दरम्यान जिल्ह्यात ३ हजार ४९ घरकुलापैकी प्रत्येक्षात ८७९ घरकुलांचे काम पुर्ण आहेत़ तर अद्याप २ हजार १५१ घरकुलांचे काम रखडले आहे़ यापूर्वी योजनेचे उद्दिष्टच कमी असल्याने अनुसूचित जातीचे लोक लाभापासून वंचित राहायचे. हक्काचे घर मिळावे, यासाठी जिल्ह्यात बहुतांश नागरिक शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते़ मात्र सध्या दलित वस्त्यामधील अनुसूचित जातीच्या लोकांना हक्कांचे घर मिळण्याचा मार्ग सुलभ झाला असतांना देखील हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने ही योजना कासव गतीने दिसून येत आहे़ योजनेसाठी  लागणारी कागदपत्रेरमाई घरकूल योजनेसाठी ११ प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. यात महापालिका बीपीएल प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, टॅक्स पावती, असिसमेंट पावती, १०० रुपयांचे मुद्रांक, मतदान कार्ड, बॅकेचे पासबूक, महापालिका रहिवासी दाखला, नगरसेवकाचा दाखला, शिधापत्रिका यांचा समावेश आहे. लाभार्थ्याना लाभ घेण्यासाठी आता सरकारी उबंरठे फिरण्याची जास्त गरज भासत नाही़अनुदान वाढविण्याची गरज....केंद्र व राज्य सरकार कडून घरकुल योजनेसाठी दिली जाणारी मदतीत लाभार्थ्यांला  घरकुल पुर्ण करण्यासाठी बारकाई करावी लागते़ घरकुल पुर्ण झाली़ परिणामी आजही अनेक घरे प्लास्टर विना आहेत. बहुतांश घरे फरशी, रंग न देताच वापरात आहेत. कित्येक घरकुलांमध्ये अद्यापही विजजोडणी नाही. अनेक घरात गॅस कनेक्शन अभावी चूलीचा धूरच दिसतो आहे. या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून आवास योजनेत अनुदानित रक्कम वाढवून नव्याने बदल करण्याची गरज सरकारला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे