शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

रब्बीतील गहू, हरबरा पेरणी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 21:59 IST

मालपूर परिसरातील चित्र

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरात रब्बी हंगामातील गहु, हरभरा पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पाणी भरण्यासाठी एकच धडपड सध्या शेतशिवारात दिसुन येत आहे. गायब झालेल्या थंडीचे देखील पुनरागमन हळूहळू होत आहे़ यामुळे शेतकऱ्यांच्या आशा देखील पल्लवित झाल्या आहेत.थंडी व रब्बी हंगाम यांचे अतुट नाते आहे. थंडीच्या जोरावरच या हंगामातील गहु, हरभरा ही पिके बहरत असतात. जेवढी जास्त थंडी तेवढे जास्त जोमाने ही पिके वाढीस लागतात असे येथील जाणकार शेतकरी सांगतात मात्र मागील आठवडात थंडी अचानक गायब झाल्याने येथील शेतकरी हिरमुसले झाले होते. दिवाळी आधीच यावर्षी मालपूर सह परिसरात थंडीने दस्तक दिली. यामुळे रब्बी हंगामातील कामांना शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती. लागवडी योग्य क्षेत्र तयार करुन त्यावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने आधुनिक यंत्राच्या मदतीने पेरणी केली. हे काम येथे अंतिम टप्प्यात आहे. यानंतर उन्हाळ्यातील भुईमूग पेरणी कडे येथील शेतकरी वळत असतात त्यासाठी क्षेत्रफळ तयार करण्याच्या हालचाली काही ठिकाणी दिसुन येत असल्याचे चित्र आहे. येथील अमरावती मध्यम प्रकल्पातील पाण्याचा साठा तसेच विहिरी व कुपनलिकांची वाढलेली पाण्याची पातळी लक्षात घेता रब्बीतील क्षेत्रफळात यावर्षी वाढ होणार असल्याचे चित्र दिसुन येत आहे. या हंगामाला पाण्याची गरज असते व मुबलक पाणी साठा उपलब्ध असल्यामुळे रब्बी हंगामातील क्षेत्रफळात वाढ होणार यावरुन स्पष्ट होत आहे. गहू हरभरा या पिकांसह रांगडी कांदा मका या पिकांचा देखील काही क्षेत्रफळावर समावेश आहे. यासाठी देखील शेत मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. तर काही क्षेत्रफळावर ओलण्याचे काम दिसुन येत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे