शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

तब्बल १९ हजार नागरिकांची शमविली तहानभुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:35 IST

धुळे : कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदी वजा लॉकडाऊनमुळे सकाळी ११ वाजल्यानंतर सर्व काही बंद होते. या बंदच्या ...

धुळे : कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदी वजा लॉकडाऊनमुळे सकाळी ११ वाजल्यानंतर सर्व काही बंद होते. या बंदच्या कालावधीत भुकेल्यांची भूक शमविण्याच्या उद्देशाने युवासेनेच्या वतीने २७ एप्रिलपासून मासाहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्ण भोजन सेवा उपक्रम सुरू करण्यात आला. सलग १९ दिवस अव्याहतपणे गरजूंपर्यंत तयार अन्नाचे पाकीट व पाणी पोहोचविण्याचे काम युवासेनेच्या माध्यमातून करण्यात आले. दररोज वेगवेगळे मेनू तयार करून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न युवासेना टीमने केला. आज शेवटच्या दिवशी पोळी, मिक्स व्हेज व गोड बर्फी असा मेनू तयार करण्यात आलेले एक हजार पाकीट दादासो भीमराव गोरे यांच्या हस्ते वाटप करून या अभियानाची सांगता करण्यात आली.

राज्यात कोरोना संकटाच्या कालावधीत गरजूंना मदत करण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच युवकांनी स्वतः काळजी घेऊन या संकट कालावधीत लोकांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन युवासेनाप्रमुख तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. त्यानुसार ॲड. पंकज गोरे यांनी शहरात मासाहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्ण मोफत भोजन सेवा उपक्रम २७ एप्रिलपासून सुरू केला. दररोज एक हजार अन्नाचे फूड पॅकेट तयार करून सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत अन्न वाटप करण्यात आले. तसेच निराधार, रुग्णालयाच्या बाहेर थांबलेेले नातलग, २४ बाय ७ सेवा देणारे कर्मचारी, पोलीस कर्मचारी अशा अनेक घटकांना ११ वाजेनंतर साधे पाणीदेखील मिळत नव्हते. भगवा चौकातील फूड पॅकेट वाटपाचे काम संपल्यानंतर शहरात विविध ठिकाणी जाऊन गरजूंना अन्न आणि पाणी देण्यात आले. या १९ दिवसांत दररोज वेगवेगळा मेनू तयार करून जेवण वाटप करत १९ दिवसांत १९ हजार नागरिकांची भूक भागविण्याचे काम करण्यात आले. या उपक्रमासाठी कोणाचीही मदत न घेता युवासेना जिल्हाप्रमुख ॲड. पंकज गोरे यांनी स्वखर्चाने हे अभियान राबविले.

शेवटच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत अखेरच्या दिवसाचे अन्नदान करत जड अंत:करणाने या अभियानाची सांगता करण्यात येत आहे. १९ दिवसांत विभिन्न क्षेत्रात हातावर पोट भरणाऱ्यांची भूक शमविण्याचे पुण्य प्राप्त करता आले. याचे समाधान असले तरी अभियान थांबवावे लागत असल्याची खंत आहे, अशा भावना ॲड. गोरे यांनी व्यक्त केल्या.

अन्नदान मोहीम यशस्वी करण्यासाठी शहर प्रमुख संदीप मुळीक, युवती सेना सोनी सोनार, स्नेहा वाघ, दक्षता पाटील, स्वप्निल सोनवणे, जितेंद्र पाटील, अमित खंडेलवाल, भूषण पाटील, आकाश शिंदे, पवन सरग, योगेश वाघ, भावेश अहिरराव, जयवंत गोरे, नीलेश चौधरी, प्रेम सोनार, ज्ञानेश्वर देवरे, मयूर सोंजे, तुषार सातपुते, दर्शन कंबायत यांच्यासह नाथू महाराज व त्यांची टीम, विजय मंडप, खुशी केटरर्स, आदींनी परिश्रम घेतले.