शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

साडेतीन लाख क्विंटल कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 23:02 IST

दोंडाईचा सीसीआय केंद्र : कापसाचे १७५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नावावर जमा

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सीसीआयने यावर्षी तीन केंद्रावर ३ लाख २८ हजार २२८ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. सीसीआयने कापसाच्या रक्कमेपोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर १७५ कोटी रुपये जमा केल्याची माहिती सीसीआयचे आदित्य वामन यांनी दिली आहे.खाजगी व्यापाºयांमार्फत शेतकºयांना कापसाला जादा भाव मिळत नव्हता. शेतकºयांच्या कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून आमदार जयकुमार रावल यांनी भारतीय कपास निगमकडे तात्काळ कापूस खरेदीची मागणी केली होती. सीसीआयने २० नोव्हेंबर २०१९ ते २१ मार्च दरम्यान कापूस खरेदी केली. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने २२ मार्चपासून दोंडाईचा येथे कापूस खरेदी बंद झाली. शेतकºयांच्या मजबुरीचा गैरफायदा परिसरातील काही खाजगी व्यापाºयांनी घेतला व शेतकºयांकडून कमी दराने कापूस खरेदी केला.शेतकºयांचा घरात हजारो क्विंटल कापूस मोजणीविना पडला होता. याची दखल पुन्हा आमदार जयकुमार रावल यांनी घेऊन भारतीय कपास निगमला कापूस खरेदी करण्याची मागणी केली. त्यानुसार पुन्हा दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून ४ मे २०२० पासून सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली होती. दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी याकामी मेहनत घेऊन कापूस मोजणेकामी विशेष लक्ष दिले. दोंडाईचा येथील अभिषेक जिनिंग, बाम्हणे येथील केशरानंद जिनिंग, शिंदखेडा येथील वर्धमान जिनिंग या तिन्ही ठिकाणी कापूस खरेदी झाली आहे. सीसीआयने कापूस खरेदी करावा, यासाठी सुमारे ६ हजार ४०० शेतकºयांनी नोंदणी केली होती.१० जूनपावेतो २ लाख ६० हजार क्विंटल कापूस व ५४ हजार कापसाच्या गाठी तयार होत्या. तर १८ जूनपावेतो २ लाख ७२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली व ५६ हजार गाठी तयार होत्या. ८ जुलैपर्यंत २ लाख ९२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. तर सुमारे १५८ कोटी रुपये कापसाचे वाटप झाले होते. तर कापसाच्या गाठी सुमारे ६१ हजार होत्या. सरकीची लवकरच विक्री होणार आहे. दरम्यान, काही खरेदी केंद्रांवर छत नसल्याने कापूस व गाठी, सरकी ओली झाल्याची तक्रार आहे.आमदार जयकुमार रावल हे सीसीआयने तालुक्यातील संपूर्ण कापसाची खरेदी करावी, यासाठी प्रयत्नशील होते. ते स्वत: याकामी लक्ष ठेऊन होते. याकामी सीसीआयचे आदित्य वामन, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन नारायण पाटील, सचिव पंडित पाटील आदींनी प्रयत्न केले.यावर्षी सीसीआय मार्फत ३ लाख २८ हजार २७८ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून १७५ कोटी रुपये शेतकºयांच्या नावावर अदा करण्यात आले आहे. तर कापसाच्या गाठी ६८ हजार २८२ असल्याची माहिती सीसीआयचे आदित्य वामन यांनी दिली.