शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

साडेतीन लाख क्विंटल कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 23:02 IST

दोंडाईचा सीसीआय केंद्र : कापसाचे १७५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नावावर जमा

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सीसीआयने यावर्षी तीन केंद्रावर ३ लाख २८ हजार २२८ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. सीसीआयने कापसाच्या रक्कमेपोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर १७५ कोटी रुपये जमा केल्याची माहिती सीसीआयचे आदित्य वामन यांनी दिली आहे.खाजगी व्यापाºयांमार्फत शेतकºयांना कापसाला जादा भाव मिळत नव्हता. शेतकºयांच्या कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून आमदार जयकुमार रावल यांनी भारतीय कपास निगमकडे तात्काळ कापूस खरेदीची मागणी केली होती. सीसीआयने २० नोव्हेंबर २०१९ ते २१ मार्च दरम्यान कापूस खरेदी केली. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने २२ मार्चपासून दोंडाईचा येथे कापूस खरेदी बंद झाली. शेतकºयांच्या मजबुरीचा गैरफायदा परिसरातील काही खाजगी व्यापाºयांनी घेतला व शेतकºयांकडून कमी दराने कापूस खरेदी केला.शेतकºयांचा घरात हजारो क्विंटल कापूस मोजणीविना पडला होता. याची दखल पुन्हा आमदार जयकुमार रावल यांनी घेऊन भारतीय कपास निगमला कापूस खरेदी करण्याची मागणी केली. त्यानुसार पुन्हा दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून ४ मे २०२० पासून सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली होती. दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी याकामी मेहनत घेऊन कापूस मोजणेकामी विशेष लक्ष दिले. दोंडाईचा येथील अभिषेक जिनिंग, बाम्हणे येथील केशरानंद जिनिंग, शिंदखेडा येथील वर्धमान जिनिंग या तिन्ही ठिकाणी कापूस खरेदी झाली आहे. सीसीआयने कापूस खरेदी करावा, यासाठी सुमारे ६ हजार ४०० शेतकºयांनी नोंदणी केली होती.१० जूनपावेतो २ लाख ६० हजार क्विंटल कापूस व ५४ हजार कापसाच्या गाठी तयार होत्या. तर १८ जूनपावेतो २ लाख ७२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली व ५६ हजार गाठी तयार होत्या. ८ जुलैपर्यंत २ लाख ९२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. तर सुमारे १५८ कोटी रुपये कापसाचे वाटप झाले होते. तर कापसाच्या गाठी सुमारे ६१ हजार होत्या. सरकीची लवकरच विक्री होणार आहे. दरम्यान, काही खरेदी केंद्रांवर छत नसल्याने कापूस व गाठी, सरकी ओली झाल्याची तक्रार आहे.आमदार जयकुमार रावल हे सीसीआयने तालुक्यातील संपूर्ण कापसाची खरेदी करावी, यासाठी प्रयत्नशील होते. ते स्वत: याकामी लक्ष ठेऊन होते. याकामी सीसीआयचे आदित्य वामन, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन नारायण पाटील, सचिव पंडित पाटील आदींनी प्रयत्न केले.यावर्षी सीसीआय मार्फत ३ लाख २८ हजार २७८ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून १७५ कोटी रुपये शेतकºयांच्या नावावर अदा करण्यात आले आहे. तर कापसाच्या गाठी ६८ हजार २८२ असल्याची माहिती सीसीआयचे आदित्य वामन यांनी दिली.