शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

दोंडाईच्यात शनिवारपासून जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 12:07 IST

जनतेची होती मागणी : नगरपालिका, पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : कोरोना विषाणू रोखण्यासाठी विविध उपाययोजना करूनही दोंडाईचासह परिसरात दिवसेदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. निष्काळजीपणाने वागणाºया नागरिकामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरातील नागरिकांनी शहरात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याची मागणी होती. त्यानुसार शनिवारपासून पाच दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय गुरुवारी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला.दोंडाईचा नगरपालिकेच्या पटांगणात गुरुवारी झालेल्या अपर तहसीलदार सुदाम महाजन, पालिका प्रभारी मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, शिंदखेडा तालुका कोविड सेंटरचे प्रमुख डॉ हितेंद्र देशमुख, उप मुख्याधिकारी हर्षल भामरे, पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ संतोष लोले, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ अर्जुन नरोटे यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला.आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू असुनही दोंडाईच्यात काही नागरिक, व्यापारी, ग्राहक मास्क वापरतात नाही. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत नाही. होम क्वॉरंटाईन असताना नागरिक बिनधास्त फिरतात. नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याने कोरोना आटोक्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर दोंडाईच्या पाच दिवस जनता कर्फ्यू लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जनतेच्या मागणीनुसार शनिवार ते बुधवार हे पाच दिवस जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे.पाच दिवसाच्या जनता कर्फ्यूमध्ये कृषी केंद्र, मेडिकल, हॉस्पिटल सुरू राहणार आहेत. परंतु आता आपत्कालीन व्यवस्थापन कायदा न पाळणाºया विरोधात कडक कारवाई, आर्थिक दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.दोंडाईचासह परीघातील बाम्हणे, रामी, पथारे, मालपूर, सुराये याठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दोडाईच्यात ६ जून ते १५ जुलै दरम्यान ५४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दोंडाईचा शहरात परिसरातील बाम्हणे, मालपूर, रामी, पथारे, सुराये गावातून दररोज नागरिक बाजारात येत असतात. शहरात आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू असूनही दोंडाईचा शहराती काही नागरिक , व्यापारी, ग्राहक मास्क न वापरता वावरतांना दिसतात. तसेच शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करतांना दिसत नाही. परिणाम कोरोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढतो आहे. त्यासाठीच जनता कर्फ्यू लावण्यात आल्याचे अधिकाºयांनी यावेळी सांगितले.