शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

दोंडाईच्यात शनिवारपासून जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 12:07 IST

जनतेची होती मागणी : नगरपालिका, पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : कोरोना विषाणू रोखण्यासाठी विविध उपाययोजना करूनही दोंडाईचासह परिसरात दिवसेदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. निष्काळजीपणाने वागणाºया नागरिकामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरातील नागरिकांनी शहरात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याची मागणी होती. त्यानुसार शनिवारपासून पाच दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय गुरुवारी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला.दोंडाईचा नगरपालिकेच्या पटांगणात गुरुवारी झालेल्या अपर तहसीलदार सुदाम महाजन, पालिका प्रभारी मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, शिंदखेडा तालुका कोविड सेंटरचे प्रमुख डॉ हितेंद्र देशमुख, उप मुख्याधिकारी हर्षल भामरे, पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ संतोष लोले, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ अर्जुन नरोटे यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला.आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू असुनही दोंडाईच्यात काही नागरिक, व्यापारी, ग्राहक मास्क वापरतात नाही. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत नाही. होम क्वॉरंटाईन असताना नागरिक बिनधास्त फिरतात. नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याने कोरोना आटोक्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर दोंडाईच्या पाच दिवस जनता कर्फ्यू लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जनतेच्या मागणीनुसार शनिवार ते बुधवार हे पाच दिवस जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे.पाच दिवसाच्या जनता कर्फ्यूमध्ये कृषी केंद्र, मेडिकल, हॉस्पिटल सुरू राहणार आहेत. परंतु आता आपत्कालीन व्यवस्थापन कायदा न पाळणाºया विरोधात कडक कारवाई, आर्थिक दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.दोंडाईचासह परीघातील बाम्हणे, रामी, पथारे, मालपूर, सुराये याठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दोडाईच्यात ६ जून ते १५ जुलै दरम्यान ५४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दोंडाईचा शहरात परिसरातील बाम्हणे, मालपूर, रामी, पथारे, सुराये गावातून दररोज नागरिक बाजारात येत असतात. शहरात आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू असूनही दोंडाईचा शहराती काही नागरिक , व्यापारी, ग्राहक मास्क न वापरता वावरतांना दिसतात. तसेच शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करतांना दिसत नाही. परिणाम कोरोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढतो आहे. त्यासाठीच जनता कर्फ्यू लावण्यात आल्याचे अधिकाºयांनी यावेळी सांगितले.