शहरं
Join us  
Trending Stories
1
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
2
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
3
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
4
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
5
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
7
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
8
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
9
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
10
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
11
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
12
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
13
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
14
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
15
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
16
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
17
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
18
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
19
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
20
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
Daily Top 2Weekly Top 5

दोंडाईच्यात शनिवारपासून जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 12:07 IST

जनतेची होती मागणी : नगरपालिका, पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : कोरोना विषाणू रोखण्यासाठी विविध उपाययोजना करूनही दोंडाईचासह परिसरात दिवसेदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. निष्काळजीपणाने वागणाºया नागरिकामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरातील नागरिकांनी शहरात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याची मागणी होती. त्यानुसार शनिवारपासून पाच दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय गुरुवारी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला.दोंडाईचा नगरपालिकेच्या पटांगणात गुरुवारी झालेल्या अपर तहसीलदार सुदाम महाजन, पालिका प्रभारी मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, शिंदखेडा तालुका कोविड सेंटरचे प्रमुख डॉ हितेंद्र देशमुख, उप मुख्याधिकारी हर्षल भामरे, पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ संतोष लोले, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ अर्जुन नरोटे यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला.आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू असुनही दोंडाईच्यात काही नागरिक, व्यापारी, ग्राहक मास्क वापरतात नाही. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत नाही. होम क्वॉरंटाईन असताना नागरिक बिनधास्त फिरतात. नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याने कोरोना आटोक्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर दोंडाईच्या पाच दिवस जनता कर्फ्यू लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जनतेच्या मागणीनुसार शनिवार ते बुधवार हे पाच दिवस जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे.पाच दिवसाच्या जनता कर्फ्यूमध्ये कृषी केंद्र, मेडिकल, हॉस्पिटल सुरू राहणार आहेत. परंतु आता आपत्कालीन व्यवस्थापन कायदा न पाळणाºया विरोधात कडक कारवाई, आर्थिक दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.दोंडाईचासह परीघातील बाम्हणे, रामी, पथारे, मालपूर, सुराये याठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दोडाईच्यात ६ जून ते १५ जुलै दरम्यान ५४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दोंडाईचा शहरात परिसरातील बाम्हणे, मालपूर, रामी, पथारे, सुराये गावातून दररोज नागरिक बाजारात येत असतात. शहरात आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू असूनही दोंडाईचा शहराती काही नागरिक , व्यापारी, ग्राहक मास्क न वापरता वावरतांना दिसतात. तसेच शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करतांना दिसत नाही. परिणाम कोरोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढतो आहे. त्यासाठीच जनता कर्फ्यू लावण्यात आल्याचे अधिकाºयांनी यावेळी सांगितले.