कोरोना संकटाला सुरूवातीपासून दुर्दैवाने राज्यात रूग्णांची अन् मृतांची संख्या अधिक राहिली आहे. आताही पुन्हा राज्यात कोरोनाचे मोठे संकट उदभवले आहेत देशभरात राेज आढळणाऱ्या कोरोना रूग्णांपैकी निम्मे रूग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. अन्य राज्यांत काेरोना रूग्णांची संख्या तुलनेत खूपच कमी आहे. महाविकास आघाडीच्या ढिसाळ कारभारामुळेच राज्यात कोरोना बाधितांची संख्येत वाढ होत आहे. रूग्णांना वेळीच आणि पुरेसे उपचार व्यवस्था करण्यास सरकार कमी पडले आहे.
कोरोनाच्या उपचारांच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार सुरू असून सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्याची किंमत जनतेला मोजावी लागत आहे. त्याच प्रमाणे राज्यात महिलांवर अत्याचारांची संख्या वाढत आहे. विशेषत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. पुजा चव्हाण या निरपराध व निष्पाप तरूणीचा बळी हा त्यावरील कळस ठरला आहे. तिच्या मृत्यूबाबत अनेक पुरावे समोर येवूनही राज्यातील मंत्र्याला अभय देण्याचा प्रयत्न झाला. मात्र जनतेच्या रेट्यापुढे सरकारला झुकावे लागल्याने मंत्र्याचा राजीनामा द्यावा लागला. तसेच एका मंत्र्याने विवाहबाह्य संबंधाची कबुली दिली असतांना सत्ताधारी पक्षाकडून पाठीशी घातले जात आहे. या सर्व घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी पक्ष कार्यालयाबाहेर पुतळा दहन करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापाैर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, हिरामन गवळी, जयश्री आहिरराव, संजय जाधव, प्रतिभा चाैधरी, हर्षकुमार रेलन, चंद्रकांत गुजराथी, यशवंत येवलेकर, चेतन मंडारे, संजय पाटील, राजू पवार, अर्जुन पवार, युवराज पाटील, नरेंद्र चाैधरी, सागर चाैधरी आदी उपस्थित होते.