शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पांमधून अद्याप विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 22:50 IST

संततधार पाऊस : पांझरा, अमरावती नदीकाठावरील गावांना नियमित सूचना

धुळे : जिल्ह्यात तसेच जिल्ह्यालगतच्या परिसरात सातत्याने होणाऱ्या पावसामुळे अक्कलपाडा प्रकल्पासह जिल्ह्यातील चार धरणांमधून पाण्याचा नियमित विसर्र्ग केला जात आहे. त्यामुळे नद्यांना पूर सुरू असून नदीकाठच्या गावांसाठी प्रशासनाला सतत सतर्कतेच्या सूचना द्याव्या लागत आहेत. अक्कलपाडा, अमरावती, वाडीशेवाडी व सुलवाडे बॅरेज या प्रकल्पांमधून विसर्ग केला जात आहे.राज्यात अन्यत्र सुरू असलेल्या पावसापेक्षा जिल्ह्यात प्रमाण कमी असले तरी सातत्याने होणाºया पावसामुळे प्रकल्प फुल्ल झाले असून शेतजमिनीचीही तहान भागल्याने आता पडणाºया पावसाचे पाणी पोहचत असल्याने नद्या-नाल्यांना पूर आले आहेत. काही नद्यांना तर कित्येक वर्षांनंतर पूर आल्याने तो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.माळमाथ्यावर संततधार पाऊससाक्री तालुक्यात शुक्रवारी दुपारपासून माळमाथा भागात संततधार पाऊस झाला. निजामपूर, जैताणे, खुडाणे, वाघापूर, उभरांडी, आखाडे आदी गावशिवारांमध्ये झालेल्या या पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. तालुक्यात होत असलेल्या या पावसामुळे सर्व लहान-मोठे प्रकल्प अद्याप ओसंडून वाहत आहेत.अक्कलपाडा प्रकल्पातून१८०० क्युसेक विसर्गअक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सातत्याने विसर्ग होत असून पांझरा नदीला पूर आला आहे. या प्रकल्पावर साक्री तालुक्यात असलेल्या पांझरा (लाटीपाडा), मालनगाव व जामखेडी या तिन्ही प्रकल्पांमधून विसर्ग सुरू असल्याने ते पाणी अक्कलपाडा प्रकल्पात येत आहे. त्यामुळे तत्पूर्वीच या प्रकल्पातून विसर्ग करावा लागत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता ए.एस. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. साक्री तालुक्यासह या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने त्या तिन्ही धरणांमधून पाण्याचा ओघ अक्कलपाडा प्रकल्पात नियमित सुरू आहे. तो थांबत नाही तोपर्यंत विसर्ग सुरूच ठेवावा लागणार असल्याचेही ते म्हणाले.अमरावती, वाडीशेवाडी प्रकल्पांमधूनही विसर्गअमरावती प्रकल्पातून सकाळी आठ वाजेच्या सुमारास दीड हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. तर वाडीशेवाडी प्रकल्पातूनही ६०० क्युसेक विसर्ग केला जात आहे. अमरावती व वाडीशेवाडी हे दोन्ही प्रकल्प अनेक वर्षांनंतर पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे या प्रकल्पांमधून नदीपात्रांमध्ये विसर्ग करण्यास विरोध करण्यात आला होता. परंतु विसर्ग करणे गरजेचे असल्याचे त्यांना समजावून सांगण्यात आले. प्रकल्पांमधून पाणी विसर्ग करण्यापूर्वी कालव्यांमध्ये सोडण्यात आले. परंतु सर्वत्र पाऊस होत असल्याने सर्व लहान-मोठे बंधारे, एम.आय. टॅँक सर्वच भरल्याने नदीपात्रात विसर्ग करण्याखेरीज पाटबंधारे विभागापुढे पर्याय नाही. त्यामुळे सध्या विसर्ग सुरूच असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे