शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

प्रकल्पांमधून अद्याप विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 22:50 IST

संततधार पाऊस : पांझरा, अमरावती नदीकाठावरील गावांना नियमित सूचना

धुळे : जिल्ह्यात तसेच जिल्ह्यालगतच्या परिसरात सातत्याने होणाऱ्या पावसामुळे अक्कलपाडा प्रकल्पासह जिल्ह्यातील चार धरणांमधून पाण्याचा नियमित विसर्र्ग केला जात आहे. त्यामुळे नद्यांना पूर सुरू असून नदीकाठच्या गावांसाठी प्रशासनाला सतत सतर्कतेच्या सूचना द्याव्या लागत आहेत. अक्कलपाडा, अमरावती, वाडीशेवाडी व सुलवाडे बॅरेज या प्रकल्पांमधून विसर्ग केला जात आहे.राज्यात अन्यत्र सुरू असलेल्या पावसापेक्षा जिल्ह्यात प्रमाण कमी असले तरी सातत्याने होणाºया पावसामुळे प्रकल्प फुल्ल झाले असून शेतजमिनीचीही तहान भागल्याने आता पडणाºया पावसाचे पाणी पोहचत असल्याने नद्या-नाल्यांना पूर आले आहेत. काही नद्यांना तर कित्येक वर्षांनंतर पूर आल्याने तो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.माळमाथ्यावर संततधार पाऊससाक्री तालुक्यात शुक्रवारी दुपारपासून माळमाथा भागात संततधार पाऊस झाला. निजामपूर, जैताणे, खुडाणे, वाघापूर, उभरांडी, आखाडे आदी गावशिवारांमध्ये झालेल्या या पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. तालुक्यात होत असलेल्या या पावसामुळे सर्व लहान-मोठे प्रकल्प अद्याप ओसंडून वाहत आहेत.अक्कलपाडा प्रकल्पातून१८०० क्युसेक विसर्गअक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सातत्याने विसर्ग होत असून पांझरा नदीला पूर आला आहे. या प्रकल्पावर साक्री तालुक्यात असलेल्या पांझरा (लाटीपाडा), मालनगाव व जामखेडी या तिन्ही प्रकल्पांमधून विसर्ग सुरू असल्याने ते पाणी अक्कलपाडा प्रकल्पात येत आहे. त्यामुळे तत्पूर्वीच या प्रकल्पातून विसर्ग करावा लागत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता ए.एस. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. साक्री तालुक्यासह या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने त्या तिन्ही धरणांमधून पाण्याचा ओघ अक्कलपाडा प्रकल्पात नियमित सुरू आहे. तो थांबत नाही तोपर्यंत विसर्ग सुरूच ठेवावा लागणार असल्याचेही ते म्हणाले.अमरावती, वाडीशेवाडी प्रकल्पांमधूनही विसर्गअमरावती प्रकल्पातून सकाळी आठ वाजेच्या सुमारास दीड हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. तर वाडीशेवाडी प्रकल्पातूनही ६०० क्युसेक विसर्ग केला जात आहे. अमरावती व वाडीशेवाडी हे दोन्ही प्रकल्प अनेक वर्षांनंतर पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे या प्रकल्पांमधून नदीपात्रांमध्ये विसर्ग करण्यास विरोध करण्यात आला होता. परंतु विसर्ग करणे गरजेचे असल्याचे त्यांना समजावून सांगण्यात आले. प्रकल्पांमधून पाणी विसर्ग करण्यापूर्वी कालव्यांमध्ये सोडण्यात आले. परंतु सर्वत्र पाऊस होत असल्याने सर्व लहान-मोठे बंधारे, एम.आय. टॅँक सर्वच भरल्याने नदीपात्रात विसर्ग करण्याखेरीज पाटबंधारे विभागापुढे पर्याय नाही. त्यामुळे सध्या विसर्ग सुरूच असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे