शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पोल्ट्री फार्म व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:38 IST

कोरोना व्हायरसचा धसका : सोशल मिडियावर आधारहीन पोस्ट, मागणीत मोठी घटलोकमत न्यूज नेटवर्क

कापडणे : चीनसह अन्य देशात कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्यानंतर सोशल मिडियावर शास्त्रीय आधार नसलेल्या पोस्ट फिरत आहेत. यामुळे मांसाहारी नागरिकांनी ‘कोरोना व्हायरस’चा धसका घेत कोंबडी व अंड्यांपासून दूर राहणे पसंत केले आहे. यामुळे कुक्कुट पालन व अंडी उत्पादन व्यवसाय धोक्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी चीनसह अन्य देशातील लोकांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याने मोठी खळबळ उडाली. त्यात कोरोना व्हायरस हे कच्चे मांसापासून प्रसारित होत असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यात भारतासह महाराष्ट्रातही बॉयलर कोंबड्या व अंड्यामुळे कोरोना व्हायरस प्रसारित होत असल्याची चुकीची माहिती सोशल मीडियाद्वारे व्हायरल होत असल्याने कोंबडी व अंड्यांच्या मागणीत मोठी घट आली आहे.यामुळे कापडणे गावातील कुक्कुट पालन व बॉयलर अंडी उत्पादन व्यवसाय धोक्यात आलेला आहे. पोल्ट्री फार्मवर दररोज अंडी पडून राहत असल्याने खराब होत आहे. यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.कापडणे गावात नानाभाऊ देवराम माळी, योगेश नानाभाऊ माळी यांचा अंडी उत्पादनाचा पोल्ट्रीफार्म असून सुरेश दयाराम बोरसे, शुभम सुरेश बोरसे, मनोहर भास्कर पाटील, गेंदीलाल पाटील, दिलीप पाटील, नरेंद्र रमेश पाटील, प्रफुल्ल रंगराव पाटील, नितीन पाटील, विजय धनगर पाटील आदी १५ ते २० शेतकऱ्यांचे बॉयलर कोंबड्यांचे उत्पादन घेणारे पोल्ट्री फार्म आहेत.मात्र, सोशल मिडियावर कोरोना व्हायरसबाबतच्या खोडसाळ पोस्ट प्रसिद्ध होत असल्याने पोल्ट्री व्यवसायाला कमालीची मंदी येऊन व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आलेले आहेत.बॉयलर कोंबड्या व अंड्यांना होलसेल व्यापारी खरेदी करायला तयार नाहीत. मालाला मागणी नसल्याने पोल्ट्री व्यवसाय बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यासाठी शासनाने ताबडतोब दखल घेऊन जनजागृती करून पोल्ट्री व्यवसायाला प्रोत्साहन द्यायला हवे, अशी मागणी येथील शेतीपूरक व्यवसाय करणाºया शेतकऱ्यांनी केली आहे.सध्या कोंबडीच्या एक अंड्याचे उत्पादन घेण्यासाठी ३ रुपये ९० पैसे खर्च येत आहे. मात्र, अंड्याची विक्री केवळ ३ रुपयापर्यंत होत आहे. दररोज प्रत्येक अंडा उत्पादनामागे ९० पैसे नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे दररोज हजारो रुपयांचा तोटा होत आहे. कोरोना व्हायरसबाबत सोशल मिडियावर चुकीच्या पोस्ट फिरत असल्याने मोठे नुकसान होत आहे. थोड्याच दिवसात कोंबडी, अंडी उत्पादन व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शेती बँकेला तारण देऊन लाखो रुपयांचे कर्ज पोल्ट्री व्यवसायासाठी काढलेले आहे तेसुद्धा फेडले जाणार नाही. पोल्ट्री व्यवसाय बंद झाल्यामुळे बेरोजगारीत वाढ होणार आहे व शेतीपूरक व्यवसाय अडचणीत येऊन सर्वत्र शेतकरी कर्जबाजारी होण्याची चिन्हे दिसत आहेत. यासाठी शासनाने जनजागृती करून कोंबडी व अंडी उत्पादन व्यवसायाला चालना देण्याची गरज आहे.-योगेश नानाभाऊ माळी, अंडी उत्पादक सुशिक्षित बेरोजगार शेतकरी, कापडणेकोरोना व्हायरस हा वेगळा विषय आहे आणि अंडी व मांस हा एक वेगळा विषय आहे. दोघांचा एकमेकांशी काहीएक संबंध नाही. यासंदर्भात भारत व महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय कुक्कुटपालन खात्यामार्फत जनजागृती करणे गरजेचे आहे. चुकीच्या अफवेमुळे कुक्कुट पालन व्यवसाय ब्रॉयलर व अंडी उत्पादनाचा व्यवसाय अडचणीत येऊन बंद पडत आहेत. कालांतराने व्यवसायिक कर्जबाजारी होतील व सुशिक्षित बेरोजगार अधिक निर्माण होतील. यासाठी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.-विशाल भिमसिंग ठाकूर, अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र अंडी उत्पादक संघटना

टॅग्स :Dhuleधुळे