शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

पोल्ट्री फार्म व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:38 IST

कोरोना व्हायरसचा धसका : सोशल मिडियावर आधारहीन पोस्ट, मागणीत मोठी घटलोकमत न्यूज नेटवर्क

कापडणे : चीनसह अन्य देशात कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्यानंतर सोशल मिडियावर शास्त्रीय आधार नसलेल्या पोस्ट फिरत आहेत. यामुळे मांसाहारी नागरिकांनी ‘कोरोना व्हायरस’चा धसका घेत कोंबडी व अंड्यांपासून दूर राहणे पसंत केले आहे. यामुळे कुक्कुट पालन व अंडी उत्पादन व्यवसाय धोक्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी चीनसह अन्य देशातील लोकांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याने मोठी खळबळ उडाली. त्यात कोरोना व्हायरस हे कच्चे मांसापासून प्रसारित होत असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यात भारतासह महाराष्ट्रातही बॉयलर कोंबड्या व अंड्यामुळे कोरोना व्हायरस प्रसारित होत असल्याची चुकीची माहिती सोशल मीडियाद्वारे व्हायरल होत असल्याने कोंबडी व अंड्यांच्या मागणीत मोठी घट आली आहे.यामुळे कापडणे गावातील कुक्कुट पालन व बॉयलर अंडी उत्पादन व्यवसाय धोक्यात आलेला आहे. पोल्ट्री फार्मवर दररोज अंडी पडून राहत असल्याने खराब होत आहे. यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.कापडणे गावात नानाभाऊ देवराम माळी, योगेश नानाभाऊ माळी यांचा अंडी उत्पादनाचा पोल्ट्रीफार्म असून सुरेश दयाराम बोरसे, शुभम सुरेश बोरसे, मनोहर भास्कर पाटील, गेंदीलाल पाटील, दिलीप पाटील, नरेंद्र रमेश पाटील, प्रफुल्ल रंगराव पाटील, नितीन पाटील, विजय धनगर पाटील आदी १५ ते २० शेतकऱ्यांचे बॉयलर कोंबड्यांचे उत्पादन घेणारे पोल्ट्री फार्म आहेत.मात्र, सोशल मिडियावर कोरोना व्हायरसबाबतच्या खोडसाळ पोस्ट प्रसिद्ध होत असल्याने पोल्ट्री व्यवसायाला कमालीची मंदी येऊन व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आलेले आहेत.बॉयलर कोंबड्या व अंड्यांना होलसेल व्यापारी खरेदी करायला तयार नाहीत. मालाला मागणी नसल्याने पोल्ट्री व्यवसाय बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यासाठी शासनाने ताबडतोब दखल घेऊन जनजागृती करून पोल्ट्री व्यवसायाला प्रोत्साहन द्यायला हवे, अशी मागणी येथील शेतीपूरक व्यवसाय करणाºया शेतकऱ्यांनी केली आहे.सध्या कोंबडीच्या एक अंड्याचे उत्पादन घेण्यासाठी ३ रुपये ९० पैसे खर्च येत आहे. मात्र, अंड्याची विक्री केवळ ३ रुपयापर्यंत होत आहे. दररोज प्रत्येक अंडा उत्पादनामागे ९० पैसे नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे दररोज हजारो रुपयांचा तोटा होत आहे. कोरोना व्हायरसबाबत सोशल मिडियावर चुकीच्या पोस्ट फिरत असल्याने मोठे नुकसान होत आहे. थोड्याच दिवसात कोंबडी, अंडी उत्पादन व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शेती बँकेला तारण देऊन लाखो रुपयांचे कर्ज पोल्ट्री व्यवसायासाठी काढलेले आहे तेसुद्धा फेडले जाणार नाही. पोल्ट्री व्यवसाय बंद झाल्यामुळे बेरोजगारीत वाढ होणार आहे व शेतीपूरक व्यवसाय अडचणीत येऊन सर्वत्र शेतकरी कर्जबाजारी होण्याची चिन्हे दिसत आहेत. यासाठी शासनाने जनजागृती करून कोंबडी व अंडी उत्पादन व्यवसायाला चालना देण्याची गरज आहे.-योगेश नानाभाऊ माळी, अंडी उत्पादक सुशिक्षित बेरोजगार शेतकरी, कापडणेकोरोना व्हायरस हा वेगळा विषय आहे आणि अंडी व मांस हा एक वेगळा विषय आहे. दोघांचा एकमेकांशी काहीएक संबंध नाही. यासंदर्भात भारत व महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय कुक्कुटपालन खात्यामार्फत जनजागृती करणे गरजेचे आहे. चुकीच्या अफवेमुळे कुक्कुट पालन व्यवसाय ब्रॉयलर व अंडी उत्पादनाचा व्यवसाय अडचणीत येऊन बंद पडत आहेत. कालांतराने व्यवसायिक कर्जबाजारी होतील व सुशिक्षित बेरोजगार अधिक निर्माण होतील. यासाठी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.-विशाल भिमसिंग ठाकूर, अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र अंडी उत्पादक संघटना

टॅग्स :Dhuleधुळे