शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

परिचारिकांच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांच्या उपचारात दिरंगाईची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:36 IST

धुळे : परिचारिकांच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांच्या उपचारात दुर्लक्ष, दिरंगाई होण्याची शक्यता असून, एखाद्या रुग्णाचे बरेवाईट झाल्यास परिचर्या वर्गाला जबाबदार ...

धुळे : परिचारिकांच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांच्या उपचारात दुर्लक्ष, दिरंगाई होण्याची शक्यता असून, एखाद्या रुग्णाचे बरेवाईट झाल्यास परिचर्या वर्गाला जबाबदार धरु नये, असा गंभीर इशारा हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या परिचारिकांनी दिला आहे. दरम्यान, १५० अधिपरिचारिका उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी हिरे महाविद्यालयाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे पुरेसे बेड आणि पुरेसे मनुष्यबळ असल्याचा प्रशासनाचा दावा खोटा असल्याचे सिध्द झाले आहे. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे कोरोना नोडल अधिकारी डाॅ. दीपक शेजवळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात १५० अधिपरिचारिकांची कोविड कक्षासाठी त्वरित उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांना उत्तम रुग्णसेवा देणे सोयीचे होईल, असे या पत्रात नमूद केले आहे.

तत्पूर्वी, ३० मार्चला महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिसेविका यांना निवेदन दिले होते. त्यानंतर अधिसेविका कार्यालयाने सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना निवेदन देऊन हा गंभीर प्रश्न सोडविण्याची मागणी केली.

अधिसेविकांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या कोविड आणि नाॅन कोविड विभागात प्रत्येकी दोन अधिपरिचारिका व इतर कोविड आयसीयुमध्ये २ असे प्रत्येक कक्षात ११ अधिपरिचारिका वर्ग नियुक्त आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या पाहता जास्तीच्या परिचर्या वर्गाची कोविड व नाॅन कोविड या कक्षात आवश्यकता आहे. परिचर्या वर्गाच्या तीन शिप्टमध्ये ड्युटी लावल्या आहेत. बरेच कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह येतात. त्यांचे कुटुंबदेखील पाॅझिटिव्ह येत असल्याने आधीच कर्मचाऱ्यांची कमतरता व त्यात वैद्यकीय रजा देणेदेखील अनिवार्य झाले आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे इच्छा असूनही रुग्णांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्मचारी कमतरतेमुळे रुग्णसेवेवर परिणाम झाल्यास अथवा रुग्णाच्या जीवितास धोका उद्भवल्यास अधिसेविका या नात्याने जबाबदार धरु नये, असा इशारा अधिसेविका अरुणा भराडे यांनी दिला आहे. तसेच इतर संस्थांमधून उसनवारीने किंवा कंत्राटी तत्त्वावर १५० अधिपरिचारिकांची भरती करावी, अशी मागणी आहे.