शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

भाव नसल्याने शेतातील डाळिंब काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:38 IST

स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुबार तालुक्यातील वरुळ, बामडोर, शिंदे, समशेरपूर आदी शेतशिवारात डाळिंबाचे भाव घसरल्याने शेतकºयांकडून ही झाडे काढण्यात येत आहेत़ उत्पन्नापेक्षा त्यांना खर्चच अधिक येत असल्याचे संबंधित सुमारे २५ शेतकºयांकडून ही कार्यवाही करण्यात आली आाहे़ डाळिंबाला भावही नगन्य असल्याने शेतकºयांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़जाणकार शेतºयांच्या म्हणण्यानुसार डाळींबची शेती करण्यासाठी एकरी ९० हजार रुपयांचा खर्च होत असल्याचे सांगण्यात आले़ तसेच याचे उत्पन्न लागवडीपासून सुमारे दोन वर्षांनंतर मिळत असते़ त्याच प्रमाणे ज्या वेळी डाळिंबाच्या झाडाला बहर येतो तेव्हाही बºयापैकी पैसा खर्च करावा लागत असतो़ त्या मानाने स्थानिक तसेच इतर लगतच्या बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकºयांना उत्पादनाचा खर्च काढणेही शक्य होत नसल्याची व्यथा शेतकºयांकडून मांडण्यात आली आहे़ सध्या सुरत, नाशिक, मालेगाव आदी बाजारपेठेच्या ठिकाणी १५० ते ६०० रुपये प्रति कॅरेट डाळींबाला भाव उपलब्ध आहेत़ एका कॅरेटमध्ये सुमारे २२ किलो डाळिंब असल्याचे सांगण्यात आले़संबंधित परिसरात बहुसंख्य शेतकºयांनी डाळिंबाची झाडे लावली होती़ काही कालावधीने का होईना परंतु डाळिंबाला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकºयांना होती़ परंतु बाजारपेठेत डाळिंबाला भाव नसल्याने शतकºयांची आर्थिक हानी होत   होती़ त्यातच स्थानिक बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकºयांना आपल्या मालाची इतर ठिकाणी निर्यात करावी लागत असल्याने त्यातही मोठ्या  प्रमाणात पैसा खर्च होत असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकºयांनी डाळींबाची झाडे काढून त्या ठिकाणी इतर पीक घेण्याला आता पसंती दिली असल्याचे चित्र दिसून येत आहे़ परिसरातील सुमारे २५ शेतकºयांनी टॅक्टरच्या साहाय्याने आपल्या शेतातील डाळिंबाची झाडे काढणीला सुरुवात केली आहे़ दरम्यान, इतका खर्च होऊनही त्याचा योग्य मोबदला मिळाला नसल्याने शेतकºयांची यात मोठी आर्थिक हानी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे़ तसेच यामुळे अनेक शेतकºयांचे आर्थिक गणितदेखील कोलमडले आहे़ डाळिंबावर हवामानाचाही परिणाम - कृषी साहाय्यकडाळिंबासाठी येथील हवामान योग्य नसल्याचे कृषी साहाय्यक सुधीर वाघमारे यांनी सांगितले डाळिंबाच्या लागवडीसाठी निचरा होणारी मुरमाळ जमिन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले़ काळ्या जमिनीत पाण्याचा लवकर निचरा होत नसल्याने याचा परिणाम पिकावर होत असतो़  त्याच बरोबर माती-पाणी परिक्षणाबाबतही शेतकरी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करीत असल्याने याचा विपरित परिणाम डाळिंबावर झाला आहे़ शिवाय काही भागात डाळिंबावर तेल्या रोग येत असतो़त्यामुळे झाडे वाळतात़ या सर्वांमुळे डाळिंबाचा दर्जा खालावतो व भाव मिळण्यास अडचणी येतात़