शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी जागा पडतेय अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST

मालपूर येथील अमरावती नदी काठावरील, रामी, खोक्राडे रस्त्यावरील फाट्यावर अमरधाम आहे. मालपूर गाव मोठे असून एकाच वेळी ...

मालपूर येथील अमरावती नदी काठावरील, रामी, खोक्राडे रस्त्यावरील फाट्यावर अमरधाम आहे. मालपूर गाव मोठे असून एकाच वेळी दोन घटना झाल्या तर मृतावर शेवटचा संस्कार करण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून सुमारे ९ लाख १८ हजार खर्चून वाढीव नवीन अमरधामचे नवनिर्माण केले. यात नवीन दहन ओट्याचादेखील समावेश आहे. मात्र हे अमरधाम सध्या अपुरे पडत असून दिवसाला चार ते पाच व्यक्तींवर अंतिम संस्कार करण्याची दुर्दैवी वेळ मालपूरकरांवर आली आहे. अंतिम संस्कार कुठे करावेत, अशी तेथील विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.

मालपूरसह ग्रामीण भागात मृतांवर अंतिम संस्कार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या जागेवर जाऊन पाणी शिंपडून शांत केले जाते व अस्थी गोळा केल्या जातात. विधीवत पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी मंगळवार व रविवार येत असेल तर तिसऱ्या दिवशी हा कार्यक्रम होत असतो. तो पर्यंत त्या जागेवर दुसऱ्याचा अंतिमसंस्कार करत नाही. यामुळे जागा अपुरी पडत असून यासाठी आता येथील अमरधामच्या पुढे, पाठीमागील जागेवर जेसीबी यंत्राच्या साहाय्याने ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी जागा तयार करावी.

मालपूर येथील अमरधाममधील आतील भागात सामाजिक संघटनांनी वृक्षारोपण करून संगोपनदेखील केले आहे; मात्र जागाच पुरेशी उरत नसल्यामुळे अंतिमसंस्काराच्या वेळी या वृक्षांना आगीच्या ज्वाळांची झळ पोहचून ही झाडे सुकून जात असल्याचेदेखील दिसून येत असल्यामुळे पर्यायी जागा करणे गरजेचे आहे.

११ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास एकाच वेळी तेथे दोन मृतदेह दाखल झाल्यामुळे शासनाने घालून दिलेले २० लोकांचे निर्बंध तसेच या अमरधामला वाल कंपाऊंड असल्यामुळे सोशल डिसटन्सिंगचे पालन करणे जिकिरीचे झाले होते.

तसेच येथे हायमास्ट लाईट गाडून तयार आहे. लाख रुपये खर्चून येथे तो पोल उभा केला आहे; मात्र अजून वर्षभरापासून त्या पोलवर वायरअभावी दिवा, लाईट चमकू शकला नसल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता तरी सध्या ची परिस्थिती बघता ग्रामपंचायत प्रशासनाने येथे त्वरित विजेची सोय करावी. कारण मृतावर रात्री-अपरात्री अंतिम संस्कार करावे लागत असल्यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या कामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी बॅनर, पाॅम्प्लेटवर फोटो असणाऱ्या पॅनल प्रमुखांनी लक्ष घालावे, अशीदेखील मालपूरकर ग्रामस्थांची मागणी आहे.

प्रतिक्रिया.......

अमरधाम येथे हायमास्ट उभा आहे; मात्र वर्षभरापासून चमकू शकला नाही ही ग्रामपंचायत प्रशासनाची शोकांतिका म्हणावी लागेल. अमरधाम येथे मृतावर अंत्यसंस्कार करायला जागा अपुरी पडत असून युवा नेते, प्रेरणास्थान, पॅनल प्रमुख कुठे गायब झाले आहेत, दिसत नाही. सध्या तुमची गावाला गरज असून रस्त्यावर उतरून गावकऱ्यांना मदत करा.

प्रफुल्ल खंडेराव

मालपूर ग्रामस्थ