शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत टक्केवारी चालू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:15 IST

मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती : पाणी, रस्ते, वाहतूक व्यवस्था, दळणवळणाव्दारे विकासाची भूक भागविण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेवर १५ वर्षांपासून राज्य करत असलेल्यांना विकासाशी घेणेदेणे नाही़ त्यामुळे आतापर्यंत विकासासाठी प्रयत्नच झाले नाही़ केवळ टक्केवारीसाठी मनपात अनेक लोक नागासारखे बसत होते़ परंतु भाजपची सत्ता आल्यास महापालिकेत टक्केवारी चालू देणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला़ शहराच्या विकासाची भूक भागविणार असल्याचेही ते म्हणाले़महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे शिवाजी रोडवरील कालिका माता मंदिराजवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा गुरूवारी सायंकाळी झाली़ यावेळी व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, महानगरप्रमुख अनुप अग्रवाल, जळगावचे खासदार ए़टी़ पाटील, आमदार सुरेश भोळे, अमळनेरचे आमदार शिरीश चौधरी, आमदार स्मिता वाघ यांच्यासह रवी बेलपाठक, मदनलाल मिश्रा, लखन भतवाल, विनोद मोराणकर, प्रवक्ते संजय शर्मा, हिरामण गवळी यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते़ सभेत बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, शहराच्या विकासासाठी मनपाने कधीच प्रयत्न झाले नाही़ ही परिस्थिती बदलण्याची आवश्यकता़ ज्यांना विकासाचे व्हिजन आहे, ज्यांचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ चांगला आहे, त्यांच्याकडे महापालिका सोपविणे गरजेचे आहे़ धुळयाचे डॉ़ भामरे, रावल यांच्यासोबत गिरीश महाजनांना पाठवले़ ही त्रिमुर्ती धुळयाची दशा व दिशा बदलण्याचे काम करेल़  आमचा एकही नगरसेवक टक्केवारीची कामे करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले़ राज्यात ५० टक्क्यांपर्यंत नागरीकरण झाले, मात्र नियोजन नसल्याने शहरे बकाल झाली़आमचे सरकार आल्यावर आम्ही नागरीकरणाला संधी मानले व मुलभूत सुविधा पुरविण्यावर भर दिला़ पिण्याच्या पाण्याची सुविधा, भुयारी गटार योजना मार्गी लावल्या़ पण धुळयाला निधी देतांना त्याचा दुरूपयोग तर होणार नाही ना? अशी भीती कायम वाटत होती़ मनपात जर भाजपची सत्ता आली तर ही भीती राहणार नाही व विकासाने शहराचा कायापालट होईल़ शहर हद्दवाढीतील गावांसाठी पाठविण्यात आलेल्या आराखड्याला आम्ही मंजूरी देऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले़ धुळे महापालिका काहीच सोयी सुविधा पुरवित नसतांना येथे नाशिक पेक्षा अधिक कर आकारणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे़ मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर करांमध्ये तर्कसंगतता आणली जाईल़  अभय योजनेव्दारे शास्तीचा बोजा कमी करू असे मुख्यमंत्री फडणवीस  म्हणाले़ कोल्हेकुईकडे दुर्लक्ष करा-डॉ़ भामरेधुळयात तीन आठवड्यांपासून काही लोक कोल्हेकुई करीत आहेत़ पण त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे़ मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग, अक्कलपाडा योजना, हद्दवाढीतील गावांसाठी ३५० कोटींचा निधी, सुलवाडे-जामफळ कनोली योजना, दिल्ली-मुंबई कॉरिडॉर या प्रकल्पांमुळे धुळयाचा सर्वांगिण विकास होणार असून रोजगार उपलब्ध होणार असल्याचे डॉ़ भामरे म्हणाले़ रडीचा डाव चालणार नाही-गिरीश महाजनराज्यात विकास खुंटलेले शहर म्हणजे धुळे आहे़ केवळ भ्रष्टाचार व भानगडींमध्येच हे शहर अडकले आहे़ त्यामुळे आता विकासाचे परिवर्तन घडवायचे असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले़ आधी हरायचं मग मतदान यंत्रांच्या नावाने ओरडायचे हे विरोधकांचे सुत्र झाले आहे़ लोक तुम्हाला स्विकारत नाही म्हणून मतदान यंत्रांच्या नावाने ओरड केली जाते़ पण आता ‘रडीचा डाव’ चालणार नाही़ आम्ही गुंडांना पक्षात घेतले असा आरोप करणाºयांनी आधी आरशात बघावे, असेही महाजन म्हणाले़चांगल्या लोकांची बदनामी- जयकुमार रावलशहर विकासात मागे आहे, पण येथे चांगले काम करणाºयांना अश्लील पत्रके काढून बदनाम केले जाते़ पण भाजपची सत्ता आल्यानंतर हे खपवून घेतले जाणार नसून शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करेल, असेही रावल यांनी स्पष्ट केले़ नाशिक व जळगावच्या तुलनेत मागे असलेल्या या शहराला आता परिवर्तनाची संधी असल्याचे ते म्हणाले़ कालिका मातेचे घेतले दर्शऩ़़आमदार अनिल गोटे यांनी कालिका माता मंदिर व पंचमुखी हनुमान मंदिर हटविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते़ दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभास्थळी आगमन झाल्यावर त्यांनी प्रथम कालिका माता मंदिर व पंचमुखी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले़ शिवाय सभेतही त्यांनी देवांचे दर्शन घेतल्याचे सांगितले़ मतदारच आमच्यासाठी देव असल्याचे ते म्हणाले़ 

टॅग्स :Dhuleधुळे