शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

पॅसेंजर व खान्देश एक्सप्रेस सुरु होण्याची प्रवाशांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 11:46 IST

नेहमी गजबज असलेल्या दोंडाईचा रेल्वे स्थानकात शुकशुकाट

दोंडाईचा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दोंडाईच्यासह राज्यात २२ मार्चपासून प्रवाशी रेल्वे बंद आहेत. दोंडाईचा रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या फक्त तीनच गाड्या थांबत आहेत. इतर गाड्या व खाद्यपदार्थांचे स्टॉल बंद असल्याने स्थानकात शुकशुकाट दिसून येत आहे. प्रवाशांना पॅसेंजर, खान्देश एक्सप्रेस सुरु होण्याची प्रतीक्षा लागून आहे.सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील दोंडाईचा रेल्वे स्थानकावर आठवड्यात पॅसेंजरसह लांब पल्ल्याच्या सुमारे ४० गाड्या धावतात. सद्यस्थितीत या प्रवाशी गाड्यांपैकी फक्त हावरा-अमदाबाद, छापरा-सुरत या लांब पल्ल्याच्या गाड्या दोंडाईचा स्टेशनवर थांबतात. सुरत-भुसावळ -सुरत, अमरावती पॅसेंजर, खान्देश एक्सप्रेस आदी सर्व प्रवाशी रेल्वे बंदच आहेत. त्यामुळे स्थानकात शुकशुकाट दिसून येत आहे. या भागातील प्रवाशांना या बंद असलेल्या सर्व प्रवाशी गाड्या सोयीस्कर आहेत.पूर्वी सर्वच प्रवाशी गाड्या सुरू असल्याने दोंडाईचा रेल्वे स्टेशनवर प्रवाशाची मोठी वर्दळ असायची. स्टेशनवर विविध कॅन्टीन आहेत. रेल्वेमुळे विविध किरकोळ विक्रेत्यांना रोजगार मिळत होता. स्टेशनवरुन प्रवाशांची ने-आण करणाऱ्या रिक्षा, टेम्पो चालकांना रोजगार होता. सुमारे २०० अकुशल कारागिरांना रोजगार मिळाला होता. परंतू सद्यस्थितीत दोनच लांब पल्ल्याच्या प्रवाशी गाड्या सुरू असून लोकल सर्वच गाड्या बंद आहेत. खान्देशातून फक्त १४० रुपयात मुंबई येथे जाता येणारी खान्देश एक्सप्रेस बंद असल्याने प्रवाशांना ६०० ते ७०० रुपये खर्चून ट्रॅव्हल्सने मुंबईला जावे लागते. रेल्वेने फक्त ३० रुपयात सुरत जाता येते, तेथे आता बसने २०० रुपये मोजावे लागत आहेत. बसेस, ट्रॅव्हल्सचे उत्पन्न वाढले असले तरी दोंडाईचा रेल्वे स्टेशनवरील वर्दळ कमी झाल्याने विविध विक्रेत्यांचा रोजगार ठप्प झाला आहे.