शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत गटारींमुळे मनपासह पक्ष बदनाम, अन्यथा ठोस निर्णय घेणार : सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:36 IST

देवपूर भागात भूमिगत गटारी आणि त्यासाठी खोदून ठेवलेले रस्ते आणि त्याच्या दुरुस्तीकडे होत असलेले दुर्लक्ष या विविध संदर्भात महाराष्ट्र ...

देवपूर भागात भूमिगत गटारी आणि त्यासाठी खोदून ठेवलेले रस्ते आणि त्याच्या दुरुस्तीकडे होत असलेले दुर्लक्ष या विविध संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका यांची संयुक्त बैठक महापालिकेच्या सभागृहात दुपारी पार पडली. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती संजय जाधव, आयुक्त अजिज शेख, भाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, एमजीपीचे निकम यांच्यासह ठेकेदारांचे प्रतिनिधी तसेच देवपूर भागातील नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

बैठकीपूर्वीच भरला दम

बैठक सुरू होण्यापूर्वी प्रास्ताविकांतून स्थायी समिती सभापती संजय जाधव यांनी एमजीपीच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदाराच्या कामांवर नाराजी व्यक्त करीत सज्जड इशारा देत त्यांना चांगलाच दम भरला. गेल्या दीड वर्षापासून भूमिगत गटारीचे काम सुरू असून, ते संथपणे सुरू आहे. रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली असून, अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. काम पुढे सरकत नाही, परिणामी देवपूर भागातील नगरसेवकांना नागरिकांचा रोष पत्कारावा लागत आहे. असेच सुरू राहिले तर कठीण असून, तात्काळ उपाययोजना करावी, रस्ते दुुरुस्त करावेत. अन्यथा स्थायी समितीच्या माध्यमातून ठोस निर्णय घ्यावा लागेल, असा सज्जड दम स्थायी समिती सभापती संजय जाधव यांनी दिला.

पावसाळ्यापूर्वी काम करा

भूमिगत गटारीचे एकूण काम किती, त्यातील किती काम मार्गी लागले, किती बाकी आहे, ते का बाकी आहे, वर्क ऑर्डरप्रमाणे काम सुरू आहे, नसेल तर अडचणी काय, अवघ्या पंधरा दिवसांवर पाऊस आला असता आपल्याकडे कामांचे नियोजन काय, एमजीपी आणि ठेकेदाराचे किती अभियंते यावर देखरेख करीत आहेत. असे वेगवेगळे प्रश्न विचारून अनुप अग्रवाल यांनी एमजीपी आणि ठेकेदाराच्या प्रतिनिधीला धारेवर धरत निरुत्तर केले. मातीने गटारी बुजल्या गेल्या आहेत, महापालिकेचे रस्ते खराब झाले आहेत़ ते तात्काळ दुरुस्त झाले पाहीजे़ यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करावी़ लवकरात लवकर अभियंते नियुक्त करून त्यांचा संपर्क क्रमांक नगरसेवकांकडे देण्याचा सल्लाही अग्रवाल यांनी दिला. स्थानिक आमदाराचा हस्तक्षेप?

देवपुरातील जयहिंद कॉलनी परिसरात भूमिगत गटारीमुळे रस्त्यांची वाट लागली आहे. मोठमोठे खड्डे खोदून ठेवले असून, काम अर्धवट सोडून दिले आहे की काय, अशी स्थिती आहे. वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जाते. हे काम मार्गी लागू नये यासाठी आमदार डॉ. फारुक शहा यांच्याकडून एमजीपीच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी सभागृहात केला. त्यांनी शंका उपस्थित करीत एमजीपीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनीही प्रतिभा चौधरींच्या आरोपांचे खंडन करीत त्यात काही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

कामांसंदर्भात सर्वांचीच नाराजी

भूमिगत गटारीचे काम जवळपास थांबविण्यात आल्याची स्थिती आहे. रस्त्यावर खड्डे असून, मातीने गटारी तुंबल्या आहेत. अधिकारी येत नाही, ठेकेदाराचा कोणताही पत्ता नाही. नागरिकांच्या तक्रारी वाढत असून, त्यांचा रोष पत्कारावा लागतो. महापालिकेसह भाजप पक्ष बदनाम होत आहे. फोन लागत नाही आणि लागला तर अधिकारी घेत नाही. कोट्यवधी रुपयांच्या चांगल्या योजनेचे आता अक्षरश: तीन-तेरा वाजविले जात आहे, अशी नाराजी आणि दु:ख नगरसेवकांनी व्यक्त केले.