शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

१९ व्या वर्षीच स्वातंत्र्य संग्रामात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 22:47 IST

स्वातंत्र्य सैनिक भिलाभाऊ कुंवर  : कापडणे येथे शेतकºयांना संघटीत करून केला सत्याग्रह

सुनील साळुंखे । शिरपूर : देशाला परकीयांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेकांनी स्वातंत्र्य संग्रमात उडी घेतली. त्यापैकी एक असलेले शिरपूर तालुक्यातील विखरण येथील  स्वातंत्र्य सैनिक असलेले भिलाभाऊ लकडू कुंवर यांनी वयाच्या १९ व्या वर्षी १९४२च्या स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधींसमवेत सहभाग घेतला. स्वातंत्र्यासाठी त्यांनी तुरूंगवासही भोगला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमिवर ९९ वर्षीय स्वातंत्र्य सैनिक भिलाभाऊ कुंवर यांनी स्वातंत्र्य संग्रमातील आठवणींना उजाळा दिला. भिलाभाऊ कुंवर यांचा जन्म २५ मे १९२२ रोजी विखरण  येथे झाला़  १९३३ मध्ये कापडणे येथे शिक्षणासाठी गेले. कापडणे येथील ४२ शेतमजुरांना संघटीत करून त्यांच्यासह धुळे येथे सत्याग्रह केल्याने,  त्यांना एक दिवस व रात्रभर उपाशी ठेवून सोडून देण्यात आले़ पुन्हा अटक व्हावी म्हणून त्यांनी धुळे-देवभाने दरम्यान टेलिफोन खांबाची मोडतोड केली़ तारा तोडल्या, रस्त्यावर झाडांच्या फांद्या टाकून       रहदारीस अडथळा निर्माण केला़ एवढे करूनही त्यांना अटक झाली नाही़कापडणे येथे २ आॅक्टोंबर १९४२ला त्यांना अटक करण्यात आली़ सोनगीरच्या पोलिस कस्टडीत एक महिना ठेवले.  १४ नोंव्हेंबर १९४२ रोजी शिंदखेडा न्यायालयाने  आठ महिन्याची शिक्षा ठोठावली.  त्यांनतर त्यांना नाशिकच्या जेलमध्ये रवाना केले. या आठ महिन्याच्या तुरूंगवासाच्या काळात त्यांची धर्मपत्नी केशरबाई कुंवर यांनी आटापाटी व औंध संस्थानच्या राजीधानीच्या गावी धुळे जिल्ह्यातील व सातारा-सांगली जिल्ह्यातील क्रांतीसिंह नाना पाटील व त्यांच्या भूमिगत सहकाºयांची जेवणाची काळजी घेतली़ दिवसा भाकरीच्या पाटीत शस्त्रास्त्रे सांभाळून ठेवण्याची जबाबदारी पार पाडली़हैद्राबाद संस्थान विलीनीकरणावेळी सुलतान बाजारातील रघुनाथबाग चौकात जयप्रकाश नारायण आले असतांना सभा उधळून लावण्यासाठी निजाम सरकारने काशिम रजवी यांच्या आदेशान्वये पोलिसांनी लाठीमार केला़ त्या लाठीमारात ते गंभीर जखमी झाले. सन १९५६ ते १९७७ अशी तब्बल २१ वर्षे किसान विद्या प्रसारक संस्थेचे ते व्यवस्थापक होते़ १९७४ मध्ये स्व़इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना स्वातंत्र्य सैनिकांना ताम्रपत्र व मानपत्र धुळे येथील जि़प़च्या सभागृहात तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते कुंवर यांना सुर्पूद करण्यात आले आहे़ सेवानिवृत्तीनंतर ते अध्यात्मिक वर्गाकडे वळलेत़ 

टॅग्स :Dhuleधुळे