शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

१९ व्या वर्षीच स्वातंत्र्य संग्रामात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 22:47 IST

स्वातंत्र्य सैनिक भिलाभाऊ कुंवर  : कापडणे येथे शेतकºयांना संघटीत करून केला सत्याग्रह

सुनील साळुंखे । शिरपूर : देशाला परकीयांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेकांनी स्वातंत्र्य संग्रमात उडी घेतली. त्यापैकी एक असलेले शिरपूर तालुक्यातील विखरण येथील  स्वातंत्र्य सैनिक असलेले भिलाभाऊ लकडू कुंवर यांनी वयाच्या १९ व्या वर्षी १९४२च्या स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधींसमवेत सहभाग घेतला. स्वातंत्र्यासाठी त्यांनी तुरूंगवासही भोगला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमिवर ९९ वर्षीय स्वातंत्र्य सैनिक भिलाभाऊ कुंवर यांनी स्वातंत्र्य संग्रमातील आठवणींना उजाळा दिला. भिलाभाऊ कुंवर यांचा जन्म २५ मे १९२२ रोजी विखरण  येथे झाला़  १९३३ मध्ये कापडणे येथे शिक्षणासाठी गेले. कापडणे येथील ४२ शेतमजुरांना संघटीत करून त्यांच्यासह धुळे येथे सत्याग्रह केल्याने,  त्यांना एक दिवस व रात्रभर उपाशी ठेवून सोडून देण्यात आले़ पुन्हा अटक व्हावी म्हणून त्यांनी धुळे-देवभाने दरम्यान टेलिफोन खांबाची मोडतोड केली़ तारा तोडल्या, रस्त्यावर झाडांच्या फांद्या टाकून       रहदारीस अडथळा निर्माण केला़ एवढे करूनही त्यांना अटक झाली नाही़कापडणे येथे २ आॅक्टोंबर १९४२ला त्यांना अटक करण्यात आली़ सोनगीरच्या पोलिस कस्टडीत एक महिना ठेवले.  १४ नोंव्हेंबर १९४२ रोजी शिंदखेडा न्यायालयाने  आठ महिन्याची शिक्षा ठोठावली.  त्यांनतर त्यांना नाशिकच्या जेलमध्ये रवाना केले. या आठ महिन्याच्या तुरूंगवासाच्या काळात त्यांची धर्मपत्नी केशरबाई कुंवर यांनी आटापाटी व औंध संस्थानच्या राजीधानीच्या गावी धुळे जिल्ह्यातील व सातारा-सांगली जिल्ह्यातील क्रांतीसिंह नाना पाटील व त्यांच्या भूमिगत सहकाºयांची जेवणाची काळजी घेतली़ दिवसा भाकरीच्या पाटीत शस्त्रास्त्रे सांभाळून ठेवण्याची जबाबदारी पार पाडली़हैद्राबाद संस्थान विलीनीकरणावेळी सुलतान बाजारातील रघुनाथबाग चौकात जयप्रकाश नारायण आले असतांना सभा उधळून लावण्यासाठी निजाम सरकारने काशिम रजवी यांच्या आदेशान्वये पोलिसांनी लाठीमार केला़ त्या लाठीमारात ते गंभीर जखमी झाले. सन १९५६ ते १९७७ अशी तब्बल २१ वर्षे किसान विद्या प्रसारक संस्थेचे ते व्यवस्थापक होते़ १९७४ मध्ये स्व़इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना स्वातंत्र्य सैनिकांना ताम्रपत्र व मानपत्र धुळे येथील जि़प़च्या सभागृहात तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते कुंवर यांना सुर्पूद करण्यात आले आहे़ सेवानिवृत्तीनंतर ते अध्यात्मिक वर्गाकडे वळलेत़ 

टॅग्स :Dhuleधुळे