शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

पेपर न तपासता बोर्डाला पाठविणार!

By admin | Updated: March 15, 2017 00:11 IST

धुळे : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे.

धुळे : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे. शासनाने तत्काळ निर्णय घेतला नाही तर १६ तारखेपासून उत्तरपत्रिका न तपासता बोर्डाकडे पाठवण्याचा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने दिला आहे.चार वर्षांपासून पाठपुरावासंघटनेचा गेल्या चार वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तरी देखील अद्याप शासनाने शिक्षकांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. शासनाने मान्य केलेल्या मागण्यांबाबत एकही शासन आदेश पारित केला नाही. म्हणून शिक्षकांचे इयत्ता बारावीची रोज एकच उत्तरपत्रिका तपासणीचे आंदोलन सुरू आहे. मात्र, १६ तारखेपर्यंत शासनाने काहीच निर्णय घेतला नाही तर पूर्णत: असहकार आंदोलन पुकारून एकही उत्तरपत्रिका न तपासता सर्व उत्तरपत्रिका मंडळाकडे परत पाठविण्याचा विचार महासंघाच्या आदेशाने संघटना पातळीवर होणार आहे.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत महासंघाच्या आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला आहे. तरी मंत्र्यांनी आदेशित केलेले असतानाही शासन आदेश काढला जात नाही. यामुळे संघटनेचा शासनावरील विश्वास उडालेला आहे. म्हणून आदेश पारित होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शिक्षकांच्या मागण्याकनिष्ठ महाविद्यालयीन मान्यता दिलेल्या शिक्षकांचे वेतन सुरू करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी. उपप्राचार्यांना वेतन मंजूर करावे. स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयांना यापुढे परवानगी देऊ नये इत्यादी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी व पुढील दिशा ठरवण्यासाठी धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यायीन संघटनेचे पदाधिकारी, परीक्षक, नियामक आदींसह शिक्षकांची बैठक झाली. यावेळी अध्यक्ष प्रा.बी.ए.पाटील, सचिव प्रा.डी.पी. पाटील, प्रा.एन.टी. ठाकरे, प्रा. एस. एन. पाटील, अतुल पाटील, प्रा. आर. जे. पवार, भागवत पाटील, नवनीत पाटील, एस.व्ही. टिळेकर, सुनील चौधरी, एन.व्ही. अहिरराव, भूषण पाटील, प्रा.संजय कुलकर्णी, प्रा.एम.एम. बुवा, जी.जी. वाणी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्षकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे स्वतंत्र प्रशासन असावे. सरसकट सर्वांना निवडश्रेणी देण्यात यावी. विद्यार्थी पटसंख्या शिथिल करण्यात यावी. एम्.फील, पीएच्.डीधारकांना अतिरिक्त वेतनवाढ देण्यात यावी. बारावी विज्ञान भाग १ व भाग २ पेपर पूर्वीप्रमाणे घेण्यात यावेत. कायम विनाअनुदानित शब्द काढून मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांना २० टक्के अनुदान देण्यात यावे. २ मे २०१२ नंतर नियुक्त शिक्षकांना मान्यता देण्यात याव्यात. सन २०११ पासून पायाभूत पदांना मान्यता देण्यात यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. बारावीच्या निकालाला होणार विलंबबारावीची परीक्षा २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांचे २१ पेपर झाले आहेत. शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू न केल्यामुळेच बारावीचा निकाल लागण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची विविध प्रवेश परीक्षांसाठी फॉर्म भरताना अडचण होणार आहे. एकाच शिक्षकाकडे एकापेक्षा जास्त विषय शिकवण्यासाठी असतात. त्यामुळे हा प्रश्न लवकर नाही मिटला तर शिक्षकांवर पेपर तपासणीचा ताण येणार आहे. गेल्या वर्षीही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला होता.