शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वातावरणातील बदलांमुळे पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 13:35 IST

ुजिल्हा : धुक्यामुळे पिकांची फुल गळण, उत्पादनात घट येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मध्येच ढगाळ वातावरण, अवेळी कोसळणारा पाऊस, मध्येच कडक ऊन्ह यासारख्या बदललेल्या वातावरणाचा मानवाच्या प्रकृतीवर परिणाम होतो, तसा पिकांवरही होत आहे. बदलत्या वातावरणांमुळे पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे उत्पादनात घट येते असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर दवबिंदूचा रब्बीच्या पिकांना फायदा होतो असे कृषी अधिकाऱ्यांचे मत आहे.कृषी विभागाच्या नियोजनानुसार यावर्षी सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली. सुरवातीपासूनच पावसाची पिकांना आवश्यक असल्यावेळी हजेरी लागत असल्याने, पिकांची स्थितीही उत्तम होती. मात्र आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये झालेल्या पावसामुळे खरीपाच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. आता वातावरणात बदल होवू लागला आहे. भाद्रपदात कडक उन्ह पडण्याऐवजी ढगाळ वातावरण, पाऊस होता. तर आता दिवसा ‘आॅक्टोबर हिट’ जाणवत असून, रात्री थंडावा असतो. तर पहाटेच्यावेळी धुकेही पडत आहे.या बदलत्या वातावरणाचा मानवी प्रकृतीप्रमाणेच पिकांवरही होवू लागला आहे. आर्द्रता ७०-८० टक्याच्यावर गेल्यानंतर पिकांवर कीड, विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. तर धुक्यामुळे कापसाची फुलगळ होते. पिकांच्या वाढीसाठी समप्रमाणात उष्णतेची गरज असते. मात्र बदलत्या वातावरणामुळे उत्पादन क्षमताही घटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे खरीपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यातच आता बदलत्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आहे.