शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

वातावरणातील बदलांमुळे पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 13:35 IST

ुजिल्हा : धुक्यामुळे पिकांची फुल गळण, उत्पादनात घट येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मध्येच ढगाळ वातावरण, अवेळी कोसळणारा पाऊस, मध्येच कडक ऊन्ह यासारख्या बदललेल्या वातावरणाचा मानवाच्या प्रकृतीवर परिणाम होतो, तसा पिकांवरही होत आहे. बदलत्या वातावरणांमुळे पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे उत्पादनात घट येते असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर दवबिंदूचा रब्बीच्या पिकांना फायदा होतो असे कृषी अधिकाऱ्यांचे मत आहे.कृषी विभागाच्या नियोजनानुसार यावर्षी सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली. सुरवातीपासूनच पावसाची पिकांना आवश्यक असल्यावेळी हजेरी लागत असल्याने, पिकांची स्थितीही उत्तम होती. मात्र आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये झालेल्या पावसामुळे खरीपाच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. आता वातावरणात बदल होवू लागला आहे. भाद्रपदात कडक उन्ह पडण्याऐवजी ढगाळ वातावरण, पाऊस होता. तर आता दिवसा ‘आॅक्टोबर हिट’ जाणवत असून, रात्री थंडावा असतो. तर पहाटेच्यावेळी धुकेही पडत आहे.या बदलत्या वातावरणाचा मानवी प्रकृतीप्रमाणेच पिकांवरही होवू लागला आहे. आर्द्रता ७०-८० टक्याच्यावर गेल्यानंतर पिकांवर कीड, विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. तर धुक्यामुळे कापसाची फुलगळ होते. पिकांच्या वाढीसाठी समप्रमाणात उष्णतेची गरज असते. मात्र बदलत्या वातावरणामुळे उत्पादन क्षमताही घटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे खरीपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यातच आता बदलत्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आहे.