शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

दोन ग्रामसेवकांना निलंबित करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:32 IST

शनिवारी येथील पंचायत समितीच्या हॉलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी उपमुख्य कार्यकारी ...

शनिवारी येथील पंचायत समितीच्या हॉलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी, ग्रामीण विकास यंत्रणेचे मोहाने, प्रदीप पवार, कार्यकारी अभियंता एस.बी. पढ्यार, सुवर्णा पवार, गटशिक्षणाधिकारी पवार, उपअभियंता अमर पाटील, पाणीपुरवठाचे येवले, हितेश भटूरकर आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री घरकूल योजनेचे महाआवास योजनेच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी लक्षांकाप्रमाणे शंभर टक्के पहिला हप्ता घरकूल लाभार्थ्यांना न दिल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचे आदेश त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले.

जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यात ७२ हजार ८४२ कुटुंब आहेत. आतापर्यंत ४५ हजार ३०५ नळकनेक्शन दिलेले आहेत. हे प्रमाण ६२ टक्के आहे. शिल्लक २७ हजार ५४४ कनेक्शन २८ फेब्रुवारीपर्यंत १०० टक्के पूर्ण न केल्यास संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. यासंदर्भात काही ठिकाणी कामे सुरू असून काही ग्रामसेवकांनी अद्याप नळ जोडणीचे कामात सुरुवात केलेली नाही. फक्त निविदा २७ ग्रामसेवकांनी केल्याचे आढळून आल्यामुळे संबंधितांवर कारवाई प्रस्तावित करण्याचे त्यांनी सूचित केले आहे.

२०१७-२०१८ च्या लेखापरीक्षण १०४ ग्रामपंचायतीनी अद्याप पूर्तता करून निकाली न काढल्यामुळे आठ दिवसांच्या आत कार्यवाही न केल्यास प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करा, असे आदेशही त्यांनी दिले. तसेच एसबीएम सर्वेक्षण अंतर्गत ज्या लोकांकडे २०१२ मध्ये झालेल्या पायाभूत सर्वेक्षणामध्ये असलेल्या कुटुंबांना पडताळणी करून यस करण्यात आलेले आहे. त्यांना यापूर्वी ५००, ६००, १२०० तसेच २२०० चा हप्ता दिलेला आहे. परंतु आज त्यांच्याकडे स्वच्छतालय नाही अशा कुटुंबांची यादी ग्रामसेवकांना १५ फेब्रुवारीपर्यंत एसडीएम कक्षात सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

१४ वा वित्त आयोगाचा अखर्चित निधी हा ३१ मार्चपर्यंत १०० टक्के खर्च न केल्यास संबंधित ग्रामसेवकांवर कारवाईचे आदेश त्यांनी दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून कोणकोणती कामे घेतली व अंदाजपत्रकाप्रमाणे कार्यारंभ आदेश दिले का? याबाबत विचारणा केली. यावेळी पीएमएवाय घरकुलांचे समाधानकारक काम न केल्याचे तालुक्यातील काही ग्रामसेवकांचे आढळले. यानुसार तालुक्यातील १३ ग्रामसेवकांचे काम पीएमएवाय घरकूल यासंदर्भात समाधानकारक आढळून आले नाही. त्यामुळे या १३ ग्रामसेवकांचे तात्पुरते एक वेतनवाढ बंद करण्याचे आदेश दिले.