शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ 16.86 टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 15:29 IST

धुळे जिल्ह्यातील स्थिती : लघुप्रकल्पांमध्येही जेमतेम साठा

 धुळे,दि.21- जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीला केवळ 16.86 टक्के जलसाठा शिल्लक असल्याने आगामी काळात टंचाईच्या झळा तीव्र होणार आहे. जिल्ह्यातील 12 पैकी चार प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठी संपला आहे.

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत सद्यस्थितीला 62.87 दलघमी एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक असून 16.86 एवढी त्याची टक्केवारी आहे. गतवर्षी याच कालावधीत शिल्लक असलेल्या जलसाठय़ापेक्षा तो अवघा एक टक्क्याने कमी आहे. गतवर्षी प्रकल्पांमध्ये 67.09 दलघमी (17.99 टक्के) एवढा साठा उरला होता. जिल्ह्यातील 12 मध्यम प्रकल्पांपैकी 8 प्रकल्पांमध्येच उपयुक्त साठा शिल्लक असून चार प्रकल्पांत त्याचे प्रमाण निरंक आहे. त्यामुळे पुढील महिन्यात पाणीटंचाईची झळ अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. 
जिल्ह्यात लाटीपाडा (पांझरा), मालनगाव, जामखेडी, कनोली, बुराई, करवंद, अनेर, सोनवद, अमरावती, अक्कलपाडा, वाडीशेवाडी व सुलवाडे हे 12 मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी सोनवद, अमरावती, अक्कलपाडा  व वाडीशेवाडी या प्रकल्पांमधील उपयुक्त साठा संपला असून केवळ मृतसाठा शिल्लक आहे. अक्कलपाडा व वाडीशेवाडी प्रकल्पांमधून मार्च महिन्याच्या तिस:या आठवडय़ात पांझरा व बुराई नदीपात्रालगतच्या गावांमध्ये जाणवणा:या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवर्तने सोडण्यात आली होती. पांझरा नदीलगतच्या शंभरावर तर बुराई नदीलगतच्या 20 पेक्षा जास्त गावांना त्या आवर्तनांमुळे टंचाईपासून दिलासा मिळाला आहे. परंतु मे महिन्यात आवर्तन सोडण्यासाठी या प्रकल्पांमध्ये उपयुक्त साठा शिल्लक नाही. मृतसाठय़ातूनच ती तजवीज करावी लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 
साक्री तालुक्यातील लाटीपाडा व मालनगाव या प्रकल्पांमधूनही पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आली आहेत. लाटीपाडातील आवर्तन थांबविण्यात आले असले तरी मालनगाव प्रकल्पातून विसर्ग सुरूच आहे.