शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ 16.86 टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 15:29 IST

धुळे जिल्ह्यातील स्थिती : लघुप्रकल्पांमध्येही जेमतेम साठा

 धुळे,दि.21- जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीला केवळ 16.86 टक्के जलसाठा शिल्लक असल्याने आगामी काळात टंचाईच्या झळा तीव्र होणार आहे. जिल्ह्यातील 12 पैकी चार प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठी संपला आहे.

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत सद्यस्थितीला 62.87 दलघमी एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक असून 16.86 एवढी त्याची टक्केवारी आहे. गतवर्षी याच कालावधीत शिल्लक असलेल्या जलसाठय़ापेक्षा तो अवघा एक टक्क्याने कमी आहे. गतवर्षी प्रकल्पांमध्ये 67.09 दलघमी (17.99 टक्के) एवढा साठा उरला होता. जिल्ह्यातील 12 मध्यम प्रकल्पांपैकी 8 प्रकल्पांमध्येच उपयुक्त साठा शिल्लक असून चार प्रकल्पांत त्याचे प्रमाण निरंक आहे. त्यामुळे पुढील महिन्यात पाणीटंचाईची झळ अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. 
जिल्ह्यात लाटीपाडा (पांझरा), मालनगाव, जामखेडी, कनोली, बुराई, करवंद, अनेर, सोनवद, अमरावती, अक्कलपाडा, वाडीशेवाडी व सुलवाडे हे 12 मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी सोनवद, अमरावती, अक्कलपाडा  व वाडीशेवाडी या प्रकल्पांमधील उपयुक्त साठा संपला असून केवळ मृतसाठा शिल्लक आहे. अक्कलपाडा व वाडीशेवाडी प्रकल्पांमधून मार्च महिन्याच्या तिस:या आठवडय़ात पांझरा व बुराई नदीपात्रालगतच्या गावांमध्ये जाणवणा:या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवर्तने सोडण्यात आली होती. पांझरा नदीलगतच्या शंभरावर तर बुराई नदीलगतच्या 20 पेक्षा जास्त गावांना त्या आवर्तनांमुळे टंचाईपासून दिलासा मिळाला आहे. परंतु मे महिन्यात आवर्तन सोडण्यासाठी या प्रकल्पांमध्ये उपयुक्त साठा शिल्लक नाही. मृतसाठय़ातूनच ती तजवीज करावी लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 
साक्री तालुक्यातील लाटीपाडा व मालनगाव या प्रकल्पांमधूनही पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आली आहेत. लाटीपाडातील आवर्तन थांबविण्यात आले असले तरी मालनगाव प्रकल्पातून विसर्ग सुरूच आहे.