शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ 16.86 टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 15:29 IST

धुळे जिल्ह्यातील स्थिती : लघुप्रकल्पांमध्येही जेमतेम साठा

 धुळे,दि.21- जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीला केवळ 16.86 टक्के जलसाठा शिल्लक असल्याने आगामी काळात टंचाईच्या झळा तीव्र होणार आहे. जिल्ह्यातील 12 पैकी चार प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठी संपला आहे.

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत सद्यस्थितीला 62.87 दलघमी एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक असून 16.86 एवढी त्याची टक्केवारी आहे. गतवर्षी याच कालावधीत शिल्लक असलेल्या जलसाठय़ापेक्षा तो अवघा एक टक्क्याने कमी आहे. गतवर्षी प्रकल्पांमध्ये 67.09 दलघमी (17.99 टक्के) एवढा साठा उरला होता. जिल्ह्यातील 12 मध्यम प्रकल्पांपैकी 8 प्रकल्पांमध्येच उपयुक्त साठा शिल्लक असून चार प्रकल्पांत त्याचे प्रमाण निरंक आहे. त्यामुळे पुढील महिन्यात पाणीटंचाईची झळ अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. 
जिल्ह्यात लाटीपाडा (पांझरा), मालनगाव, जामखेडी, कनोली, बुराई, करवंद, अनेर, सोनवद, अमरावती, अक्कलपाडा, वाडीशेवाडी व सुलवाडे हे 12 मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी सोनवद, अमरावती, अक्कलपाडा  व वाडीशेवाडी या प्रकल्पांमधील उपयुक्त साठा संपला असून केवळ मृतसाठा शिल्लक आहे. अक्कलपाडा व वाडीशेवाडी प्रकल्पांमधून मार्च महिन्याच्या तिस:या आठवडय़ात पांझरा व बुराई नदीपात्रालगतच्या गावांमध्ये जाणवणा:या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवर्तने सोडण्यात आली होती. पांझरा नदीलगतच्या शंभरावर तर बुराई नदीलगतच्या 20 पेक्षा जास्त गावांना त्या आवर्तनांमुळे टंचाईपासून दिलासा मिळाला आहे. परंतु मे महिन्यात आवर्तन सोडण्यासाठी या प्रकल्पांमध्ये उपयुक्त साठा शिल्लक नाही. मृतसाठय़ातूनच ती तजवीज करावी लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 
साक्री तालुक्यातील लाटीपाडा व मालनगाव या प्रकल्पांमधूनही पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आली आहेत. लाटीपाडातील आवर्तन थांबविण्यात आले असले तरी मालनगाव प्रकल्पातून विसर्ग सुरूच आहे.