शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

‘एकच पर्व, बहुजन सर्व’!

By admin | Updated: January 18, 2017 23:40 IST

वामन मेश्राम : बहुजन क्रांती मोर्चाप्रसंगी परिवर्तनाचा नारा, जिल्हाधिका:यांना निवेदन

धुळे : केवळ मोर्चे काढून काहीच साध्य होत नाही तर मोर्चातून परिवर्तन व्हायला हव़े राज्यभरात निघालेल्या बहुजन मुक्ती मोर्चामुळे मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र ओबीसी मंत्रालय उभारण्याची घोषणा करावी लागली हे बहुजन मुक्ती मोर्चाचे यश असल्याची स्पष्टोक्ती भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दिली़ यावेळी उपस्थित समर्थक कार्यकत्र्यानी ‘एकच पर्व, बहुजन सर्व’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.  येथील बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीतर्फे बुधवारी सकाळी 10 वाजता बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होत़े त्या वेळी जाहीर सभेत मेश्राम बोलत होत़ेमान्यवरांचे मार्गदर्शनधुळे जिल्हा कारागृहासमोर झालेल्या या सभेला क्रांती मोर्चाचे राज्य संयोजक मनोज महाले, जिल्हा संयोजक महादेव जमदाडे, ज्येष्ठ नेते एम़जी़ धिवरे, जुबेर शेख, हारुण अन्सारी, भाऊसाहेब सोनवणे, वसंत गुंजाळ (राष्ट्रीय उपाध्यक्ष, वडार समाज), संजय कुसळकर, तानाजी तडवी (आदिवासी कार्यकर्ते), नामदेव येळवे (कोळी समाज), रावसाहेब पाटील (माजी सरपंच, बेटावद), अॅड़ संतोष जाधव, विजय सोनवणे, आनंद शिंदे (राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ), गोपाल माने, अजहर हुसैन (जमात-ए-इस्लामी), राजेंद्र पाटील, साहेबराव गोसावी (भटके विमुक्त समाज) यांच्यासह विविध मान्यवरांनी मोर्चाला उपस्थित नागरिकांना संबोधित करीत समाज जनजागृतीसाठी बहुजन क्रांती मोर्चाचे उद्देश व ध्येयधोरणांविषयी माहिती दिली, तसेच सरकारच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडल़े ङोंडे, घोषणांचे फलकमोर्चात सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना आयोजकांकडून टोप्या, ङोंडे व मागण्यांचे फलक वितरित करण्यात आल़े पिवळे, लाल, हिरवे व निळे ङोंडे  होत़े फलकांवर ‘महिलांवरील अत्याचार थांबवा’, ‘उठ बहुजना जागा हो, संघर्षाचा धागा हो’, ‘एकच पर्व, बहुजन सर्व’ या घोषणा होत्या.राज्य सरकारचे हे षड्यंत्रवामन मेश्राम या वेळी म्हणाले की, राज्य सरकारने मराठा व दलित समाजात फूट पाडण्यासाठी त्यांच्या मोर्चाना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला़ संघ परिवाराने यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली़ त्यामुळेच बहुजनांचा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला़ हा मोर्चा मराठय़ांविरुद्ध नसून परिवर्तनासाठी आह़े 108 वर्षाच्या संघर्षानंतर बहुजन समाजाला बोलण्याचे स्वातंत्र्य मिळालेले असताना मूकमोर्चे काढून आपण आपल्याच महापुरुषांचा अवमान करीत आहोत, असे मेश्राम म्हणाल़े मराठा व ओबीसींमध्येदेखील फूट पाडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला़ इंग्रजांनी दोन धर्मात फूट पाडली, मात्र मुख्यमंत्री प्रत्येक जातीत फूट पाडत असल्याची टीका मेश्राम यांनी केली़जिल्हाधिका:यांना निवेदनदरम्यान, सभा सुरू असताना शिष्टमंडळाने जिल्हाधिका:यांना निवेदन सादर केल़े शिष्टमंडळात प्रा़महादेव जमदाडे, कस्तुराबाई भिल, ईश्वर निहाळे, निर्मला निहाळे, छाया पाटील, गुरफान शेख, कैलास माळी, अण्णा बोरकर व जगदीशराजे शिंदे यांचा समावेश होता़ त्यातील काही नागरिक विविध घटनांतील पीडितांचे नातेवाईक होत़े दरम्यान, जाहीर सभेत एका महिलेनेही व्यासपीठावर येऊन भूमिका मांडली़