शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सावळदे पुलावरून उडी मारून एकाची तापीत आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 23:54 IST

शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरखर्दे येथील सुनील पटेल हे सकाळी मुलीला शाळेत सोडण्यासाठी शिरपुरात आले होते.

- सुनील साळुंखे

शिरपूर (जि.धुळे) : तालुक्यातील सावळदे येथील तापीच्या पुलावरून नदीपात्रात उडी घेत एकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. सुनील मोहन पटेल (वय ३७, रा. गुजरखर्दे, ता. शिरपूर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरखर्दे येथील सुनील पटेल हे सकाळी मुलीला शाळेत सोडण्यासाठी शिरपुरात आले होते. तेथून ते गावी गेले. गावी गेल्यानंतर स्वत:च्या मेडिकल दुकानावर जाऊन येतो असे त्यांनी घरच्यांना सांगितले. मात्र, ते मेडिकल दुकानावर न जाता दुचाकीने सावळदे पुलावर आले. तेथून त्यांनी तापी पात्रात उडी घेतली. त्यांच्या दुचाकीचा फोटो काहींनी सोशल मीडियावर टाकला. त्यामुळे नातेवाइकांसह ग्रामस्थांनी तापीच्या पुलावर धाव घेतली.

येथे पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिरपूर कॉटेल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे