शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली; प्रवाशांची गैरसोय वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:37 IST

धुळे : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर एस.टी. महामंडळाची बससेवा सुरू झालेली आहे; मात्र उत्पन्न मिळविण्यासाठी महामंडळानेही लांब पल्ल्याच्या ...

धुळे : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर एस.टी. महामंडळाची बससेवा सुरू झालेली आहे; मात्र उत्पन्न मिळविण्यासाठी महामंडळानेही लांब पल्ल्याच्या बसफेऱ्यांना प्राधान्य दिलेले आहे. ग्रामीण भागातील बसच्या फेऱ्या कमी आहेत. त्यातल्या त्यात मुक्कामी बसेसची संख्या तर प्रचंड कमी आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बससेवेचे वेळापत्रकच कोलमडलेले आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी बसेसच्या आता ग्रामीण भागातील फेऱ्याही मर्यादीतच झालेल्या आहेत.

धुळे जिल्ह्यात पाच आगार असून, या सर्व आगारांच्या बसेस कोरोनापूर्वी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जास्त होत्या; मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर ग्रामीण भागात मुक्कामी बसेसची संख्या रोडावली आहे.

नियोजन करणे सुरू

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बससेवा पूर्ववत सुरू झालेली आहे. कोरोनापूर्वी शाळा-महाविद्यालयाच्या उद्देशानेच ग्रामीण भागातील मुक्कामी बससेवा सुरू होती. आता ज्या-ज्या मार्गावरील विद्यार्थ्यांना पासेस उपलब्ध होत आहेत, त्या मार्गावर ग्रामीण भागात मुक्कामी बससेवा सुरू करण्यात येत आहे. येत्या सोमवारपासून अजून ग्रामीण भागातील फेऱ्या सुरू करण्याचा प्रयत्न आहे; मात्र बस सुरू करीत असताना डिझेलचा खर्च निघणे महत्त्वाचे आहे. प्रवाशांचा प्रतिसाद व मागणीनुसार बससेवा सुरू केली जाईल.

स्वाती पाटील, आगार प्रमुख धुळे.

आमचे गाव दुर्गम भागात आहे. या गावातील प्रवाशांना एस.टी.शिवाय प्रवासाचे साधन नाही. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोलचे दर वाढल्याने, दुचाकी वापरणे परवडत नाही; मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून आमच्या गावात मुक्कामी बस येतच नाही. आम्हाला खासगी वाहनांनेच प्रवास करावा लागत आहे. एस.टी. ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असल्याने, ग्रामीण भागात बससेवा सुरू झाली पाहिजे. यासंदर्भात विचारणा केली असता, बससेवा सुरू केली जाईल, असे सांगण्यात येते; मात्र बसेस सुरू केल्या जात नाहीत.

- रमेश पावरा.

प्रवासी

मे महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाटही ओसरलेली आहे. त्यानंतर शहरी भागासाठी एस.टी.ची सेवा जोरात सुरू आहे; मात्र उत्पन्नाचे कारण दाखवत ग्रामीण भागासाठी बससेवा सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक प्रवासी हे केवळ एस.टी.च्या सेवेवरच अवलंबून आहेत. बससेवा सुरू नसल्याने, त्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ज्या मार्गावर जास्त प्रवासी आहेत, त्या ग्रामीण मार्गावरील फेऱ्या तत्काळ सुरू करण्याची आवश्यकता आहे.

- दिनेश पाटील,

प्रवासी.