शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

आता आषाढातही शुभमंगल सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST

शिरपूर : आषाढात साधारणत: शुभ कार्ये टाळली जातात. मात्र, कोरोनामुळे यंदा आषाढातही लग्न केली जात आहेत. अनेक दिवसांपासून कोरोनाच्या ...

शिरपूर : आषाढात साधारणत: शुभ कार्ये टाळली जातात. मात्र, कोरोनामुळे यंदा आषाढातही लग्न केली जात आहेत. अनेक दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नासाठी असलेले निर्बंध बघता काहींनी लग्न समोर ढकलले होते. परंतु, आता निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्याने मिळेल त्या मुहूर्तावर लग्न उरकून घेण्यावर भर दिला जात आहे.

कोरोनामुळे मागील वर्षापासून अनेकांनी आपले लग्न पुढे ढकलल्याचे दिसून येत होते. लग्न धूमधडाक्यात करण्यासाठी निर्बंध शिथिल होण्याची वाट पाहणारे आता आषाढमध्येही लग्न करण्यास समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने विवाह उरकण्याकडे वधू-वर पित्यांचा कल वाढला आहे. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहिला जातो. हिंदू धर्मात विवाह हे एक असे कार्य आहे, जे केवळ दोन लोकांमध्येच घडत नाही, तर दोन कुटुंबांना जोडते, म्हणूनच लग्नाशी संबंधित सर्व शुभ कार्ये शुभ मुहूर्त आणि शुभ दिवस पाहून करतात. जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये म्हणून ग्रहांच्या स्थितीपासून या सर्वांचे मूल्यांकन केले जाते.

सध्या लग्नाचे मुहूर्त असल्याने दररोज लग्नसमारंभ उरकण्यात येतात. ना तिथी, ना कोरोनाची भीती अशा परिस्थितीत लग्नसमारंभ झाल्याने यातूनच कोरोनाचा उद्रेक झाला. तालुक्यातील गावांपैकी असे एकही गाव शिल्लक नाही, ज्या गावात या वर्षभरात लग्न झाले नसेल. धूमधडाक्यात लग्नसमारंभ पार पाडण्यात आले. डीजे, बँडच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करीत लग्न करण्यात आले. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक होऊ लागला. परिणामी, गत जानेवारी ते मे महिन्यापर्यंत कोरोनाने उग्र रूप धारण केले होते. मात्र, गत महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या घटल्यामुळे सध्या शिरपूर तालुका कोरोनामुक्त झाला आहे. पूर्वी आषाढात लग्न करणे शुभ समजले जात नव्हते. मात्र, आता आषाढातही लग्न लावले जात आहे. या महिन्यातही शुभ तारखा आहेत. शुभ मुहूर्त म्हणजे ग्रह आणि नक्षत्रांची अनुकूल स्थिती. विवाहामध्ये शुभ मुहूर्तावर विशेष काळजी घेतली जाते.

- जयेश जोशी,

पंडित

कोरोनामुळे यावर्षी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभ पार पडले आहेत. आता आषाढातही शुभ मुहूर्त असल्याने, अनेकांनी विवाह समारंभाचे आयोजन केले आहे. आषाढात केलेले विवाहदेखील शुभ असतात. त्यामुळे या महिन्यात प्राधान्य दिले जाते.

योगेश दीक्षित

पंडित

राज्य शासनाने कोविड-१९ च्या अनुषंगाने डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढल्यामुळे काही निर्बंध लागू करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात तिसऱ्या श्रेणीतील निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यानुसार लग्न समारंभात बँड पथक, कॅटरिंग, आदींसह पूर्व परवानगीने कोविड नियमांचे पालन करून ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. मात्र, त्या नियमांचे पालन पाहिजे तसे शिरपुरात होत नाही.

मंगल कार्यालये बुक

n आषाढातील मुहूर्तावरही लग्न समारंभासाठी मंगल कार्यालये बुक करण्यात आली आहेत.

n कोरोनामुळे मंगल कार्यालय चालकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मंगल कार्यालयांना विवाह समारंभासाठी तारखा मिळत नसल्याचे चित्र आहे.