शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात एकही अपघात नाही, कारखान्यांबद्दल तकार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:08 IST

४ मार्च हा औद्योगिक सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर माधव रत्नपारखी यांनी धुळे जिल्ह्यातील औद्योगिकस्थितीविषयी सविस्तर ...

४ मार्च हा औद्योगिक सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर माधव रत्नपारखी यांनी धुळे जिल्ह्यातील औद्योगिकस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली.

नवीन कामगार कायद्यानुसार २० व त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या कारखान्यांचीच नोंद औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडे करण्यात येत असते. धुळे जिल्ह्यात अशा नोंदणीकृत कारखान्यांची संख्या २८१ एवढीच असून, त्यात काम करणाऱ्यांची संख्या १४ हजार ५०० एवढी आहे. तर धुळ्यातील अवधान एमआयडीसीत फक्त ५३ कारखाने असल्याची या विभागाकडे नोंद आहे.

कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराची सुरक्षा तेथील व्यवस्थापनाने घेणे गरजेचे आहे. या कारखान्यांमध्ये सुरक्षिततेचे उपाय आहेत की नाही या दृष्टीने केंद्रीय निरीक्षण प्रणालीनुसार कारखान्यांना भेटी दिल्या जातात. सुरक्षेच्यादृष्टीने कारखान्यांना सूचना दिल्या जातात. त्रुटी असल्यास त्या पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाते, असे त्यांचे म्हणणे आहे.

एकच धोकादायक कारखाना

जिल्ह्यात केवळ शिरूड येथील कारखानाच धोकेदायक असल्याची नोंद आहे. या ठिकाणी त्रयस्थांकडून ॲाडिट केले जाते. या कारखान्याचाही स्वत:चा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा आहे.

एकही अपघाताची नोंद नाही

जिल्ह्यात असलेल्या कारखान्यांमध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत एकही प्राणघातक अपघात झाल्याची नोंद नाही. अपघातच नसल्याने कोणालाही अपंगत्व आलेले नाही हे विशेष आहे.

अपघाताची तीन महिन्यात चौकशी

कारखान्यात अपघात झाल्यानंतर तीन महिन्यातच त्याची सविस्तर चाैकशी करण्यात येते. त्यानंतर खटला न्यायालयात दाखल करण्यात येत असतो.

कारखान्यात महिला तक्रार निवारण समिती

कारखान्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य दिले जाते. ज्या कारखान्यांमध्ये महिला कामगार आहेत, तेथे महिला तक्रार निवारण समिती असणे गरजेचे आहे. जोपर्यंत ही समिती गठीत होत नाही, तोपर्यंत कारखान्याची नोंदणी, नूतनीकरण होत नाही. जिल्ह्यात ४७ कारखान्यांमध्ये महिला काम करतात. तेथे ही समिती कार्यान्वित आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये गेल्यावर्षी एकही अपघात झालेला नाही. तसेच कारखान्यांबद्दल कामगारांची तक्रारही नाही. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची काळजी कारखाना व्यवस्थापनाकडून घेतली जाते.

- माधव रत्नपारखी,

उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग,धुळे