शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
8
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
9
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
10
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
11
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
12
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
13
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
14
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
15
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
16
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
17
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
18
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
19
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
20
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!

वर्षभरात एकही अपघात नाही, कारखान्यांबद्दल तकार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:08 IST

४ मार्च हा औद्योगिक सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर माधव रत्नपारखी यांनी धुळे जिल्ह्यातील औद्योगिकस्थितीविषयी सविस्तर ...

४ मार्च हा औद्योगिक सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर माधव रत्नपारखी यांनी धुळे जिल्ह्यातील औद्योगिकस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली.

नवीन कामगार कायद्यानुसार २० व त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या कारखान्यांचीच नोंद औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडे करण्यात येत असते. धुळे जिल्ह्यात अशा नोंदणीकृत कारखान्यांची संख्या २८१ एवढीच असून, त्यात काम करणाऱ्यांची संख्या १४ हजार ५०० एवढी आहे. तर धुळ्यातील अवधान एमआयडीसीत फक्त ५३ कारखाने असल्याची या विभागाकडे नोंद आहे.

कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराची सुरक्षा तेथील व्यवस्थापनाने घेणे गरजेचे आहे. या कारखान्यांमध्ये सुरक्षिततेचे उपाय आहेत की नाही या दृष्टीने केंद्रीय निरीक्षण प्रणालीनुसार कारखान्यांना भेटी दिल्या जातात. सुरक्षेच्यादृष्टीने कारखान्यांना सूचना दिल्या जातात. त्रुटी असल्यास त्या पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाते, असे त्यांचे म्हणणे आहे.

एकच धोकादायक कारखाना

जिल्ह्यात केवळ शिरूड येथील कारखानाच धोकेदायक असल्याची नोंद आहे. या ठिकाणी त्रयस्थांकडून ॲाडिट केले जाते. या कारखान्याचाही स्वत:चा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा आहे.

एकही अपघाताची नोंद नाही

जिल्ह्यात असलेल्या कारखान्यांमध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत एकही प्राणघातक अपघात झाल्याची नोंद नाही. अपघातच नसल्याने कोणालाही अपंगत्व आलेले नाही हे विशेष आहे.

अपघाताची तीन महिन्यात चौकशी

कारखान्यात अपघात झाल्यानंतर तीन महिन्यातच त्याची सविस्तर चाैकशी करण्यात येते. त्यानंतर खटला न्यायालयात दाखल करण्यात येत असतो.

कारखान्यात महिला तक्रार निवारण समिती

कारखान्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य दिले जाते. ज्या कारखान्यांमध्ये महिला कामगार आहेत, तेथे महिला तक्रार निवारण समिती असणे गरजेचे आहे. जोपर्यंत ही समिती गठीत होत नाही, तोपर्यंत कारखान्याची नोंदणी, नूतनीकरण होत नाही. जिल्ह्यात ४७ कारखान्यांमध्ये महिला काम करतात. तेथे ही समिती कार्यान्वित आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये गेल्यावर्षी एकही अपघात झालेला नाही. तसेच कारखान्यांबद्दल कामगारांची तक्रारही नाही. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची काळजी कारखाना व्यवस्थापनाकडून घेतली जाते.

- माधव रत्नपारखी,

उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग,धुळे