शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या लुटीची व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 22:53 IST

अनिल गोटे : पत्रकार परिषदेत केला आरोप

धुळे : केंद्र सरकारने नवीन कृषी कायदा आणला असून, हा शेतकऱ्यांच्या लुटीची व्यूहरचना आहे. एक वर्षांपूर्वी डिसेंबर २०१९ मध्ये या सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या २०१ अटीपैंकी २०० अटी आम्ही स्वीकारल्याचे म्हटले आहे. त्याचे दर्शन, लवलेशदेखील या आणलेल्या तीनही कायद्यांमध्ये नाही. अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान, त्यांनी विरोधकांवर आगपाखडदेखील केली.अनिल गोटे म्हणाले, सेना आणि हवाईदलातील सेवानिवृत्तीनंतर शेती करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोदी-शहांचा कायदा कळालेला नाही. देशाचे दुर्दैव आहे की सरकार विरुद्ध शेतकरी असा संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जात आहे. राजधानीच्या सीमेवर दीड कोटी शेतकरी एक लक्ष वीस हजार ट्रॅक्टर घेून रक्त गोठवणाऱ्या थंडीत जीवाची पर्वा न करता आंदोलन करीत आहेत.आज त्यांचा ३२वा दिवस आहे. रक्त गोठवणाऱ्या जीवघेण्या थंडीत कष्टाने पिकविलेल्या शेती उत्पादनास रास्त भाव मिळावा यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहे. त्यांच्यावर निदर्यतेने थंडगार पाणी फवारले जात आहे. मोदी-शहा सरकारचे शेतकऱ्यांना त्यांच्या निश्चयापासून विचलित करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहे. जगाच्या अन्नदात्या शेतकऱ्यांना पाकिस्तानी, चिनी आतंकवादी संबोधले, हे कुठल्याही सुसंस्कृत नागरिकास शोभा देणारे नाही.आंदोलक शेतकऱ्यांमागे चीन आणि पाकिस्तान असल्याचे संतापजनक वक्तव्य केल्याने राज्यात गणपत पाटलानंतर रावसाहेब दानवे यांच्याइतका विनोदी, विदुषक दुसरा कोणीच नाही. नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा हे देशाच्या सर्वोच्च पदावर बसून करतात तरी काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. केवळ आपल्या मालकांना खुश करण्याकरीता भाजपचे पाळीव पोपट हे एकाचवेळेस पोपटपंची करीत सुटले आहेत. नेमका आणलेला हा नवीन कायदा नेमका आहे तरी काय, हे सोप्या आणि सुटसुटीत भाषेत देशातल्या शेतकऱ्यांना आजवर कोणीही समजून सांगितलेला नाही.कोरडवाहू किंवा चारमाही बागायत करणाऱ्या शेतकऱ्याचे कांदा हे एकमेव मनीक्रॉप आहे. शेतकऱ्याला चार पैसे मिळू लागताच कांद्यावर निर्यातबंदी करून कांद्याचे भाव पाडले. देशातील भाजप सरकारने जगासमोर नामुष्कीची वेळ आणली आहे, अशी टीका गोटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

टॅग्स :Dhuleधुळे