शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या लुटीची व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 22:53 IST

अनिल गोटे : पत्रकार परिषदेत केला आरोप

धुळे : केंद्र सरकारने नवीन कृषी कायदा आणला असून, हा शेतकऱ्यांच्या लुटीची व्यूहरचना आहे. एक वर्षांपूर्वी डिसेंबर २०१९ मध्ये या सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या २०१ अटीपैंकी २०० अटी आम्ही स्वीकारल्याचे म्हटले आहे. त्याचे दर्शन, लवलेशदेखील या आणलेल्या तीनही कायद्यांमध्ये नाही. अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान, त्यांनी विरोधकांवर आगपाखडदेखील केली.अनिल गोटे म्हणाले, सेना आणि हवाईदलातील सेवानिवृत्तीनंतर शेती करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोदी-शहांचा कायदा कळालेला नाही. देशाचे दुर्दैव आहे की सरकार विरुद्ध शेतकरी असा संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जात आहे. राजधानीच्या सीमेवर दीड कोटी शेतकरी एक लक्ष वीस हजार ट्रॅक्टर घेून रक्त गोठवणाऱ्या थंडीत जीवाची पर्वा न करता आंदोलन करीत आहेत.आज त्यांचा ३२वा दिवस आहे. रक्त गोठवणाऱ्या जीवघेण्या थंडीत कष्टाने पिकविलेल्या शेती उत्पादनास रास्त भाव मिळावा यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहे. त्यांच्यावर निदर्यतेने थंडगार पाणी फवारले जात आहे. मोदी-शहा सरकारचे शेतकऱ्यांना त्यांच्या निश्चयापासून विचलित करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहे. जगाच्या अन्नदात्या शेतकऱ्यांना पाकिस्तानी, चिनी आतंकवादी संबोधले, हे कुठल्याही सुसंस्कृत नागरिकास शोभा देणारे नाही.आंदोलक शेतकऱ्यांमागे चीन आणि पाकिस्तान असल्याचे संतापजनक वक्तव्य केल्याने राज्यात गणपत पाटलानंतर रावसाहेब दानवे यांच्याइतका विनोदी, विदुषक दुसरा कोणीच नाही. नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा हे देशाच्या सर्वोच्च पदावर बसून करतात तरी काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. केवळ आपल्या मालकांना खुश करण्याकरीता भाजपचे पाळीव पोपट हे एकाचवेळेस पोपटपंची करीत सुटले आहेत. नेमका आणलेला हा नवीन कायदा नेमका आहे तरी काय, हे सोप्या आणि सुटसुटीत भाषेत देशातल्या शेतकऱ्यांना आजवर कोणीही समजून सांगितलेला नाही.कोरडवाहू किंवा चारमाही बागायत करणाऱ्या शेतकऱ्याचे कांदा हे एकमेव मनीक्रॉप आहे. शेतकऱ्याला चार पैसे मिळू लागताच कांद्यावर निर्यातबंदी करून कांद्याचे भाव पाडले. देशातील भाजप सरकारने जगासमोर नामुष्कीची वेळ आणली आहे, अशी टीका गोटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

टॅग्स :Dhuleधुळे