शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

नवीन कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या लुटीची व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 22:53 IST

अनिल गोटे : पत्रकार परिषदेत केला आरोप

धुळे : केंद्र सरकारने नवीन कृषी कायदा आणला असून, हा शेतकऱ्यांच्या लुटीची व्यूहरचना आहे. एक वर्षांपूर्वी डिसेंबर २०१९ मध्ये या सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या २०१ अटीपैंकी २०० अटी आम्ही स्वीकारल्याचे म्हटले आहे. त्याचे दर्शन, लवलेशदेखील या आणलेल्या तीनही कायद्यांमध्ये नाही. अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान, त्यांनी विरोधकांवर आगपाखडदेखील केली.अनिल गोटे म्हणाले, सेना आणि हवाईदलातील सेवानिवृत्तीनंतर शेती करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोदी-शहांचा कायदा कळालेला नाही. देशाचे दुर्दैव आहे की सरकार विरुद्ध शेतकरी असा संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जात आहे. राजधानीच्या सीमेवर दीड कोटी शेतकरी एक लक्ष वीस हजार ट्रॅक्टर घेून रक्त गोठवणाऱ्या थंडीत जीवाची पर्वा न करता आंदोलन करीत आहेत.आज त्यांचा ३२वा दिवस आहे. रक्त गोठवणाऱ्या जीवघेण्या थंडीत कष्टाने पिकविलेल्या शेती उत्पादनास रास्त भाव मिळावा यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहे. त्यांच्यावर निदर्यतेने थंडगार पाणी फवारले जात आहे. मोदी-शहा सरकारचे शेतकऱ्यांना त्यांच्या निश्चयापासून विचलित करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहे. जगाच्या अन्नदात्या शेतकऱ्यांना पाकिस्तानी, चिनी आतंकवादी संबोधले, हे कुठल्याही सुसंस्कृत नागरिकास शोभा देणारे नाही.आंदोलक शेतकऱ्यांमागे चीन आणि पाकिस्तान असल्याचे संतापजनक वक्तव्य केल्याने राज्यात गणपत पाटलानंतर रावसाहेब दानवे यांच्याइतका विनोदी, विदुषक दुसरा कोणीच नाही. नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा हे देशाच्या सर्वोच्च पदावर बसून करतात तरी काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. केवळ आपल्या मालकांना खुश करण्याकरीता भाजपचे पाळीव पोपट हे एकाचवेळेस पोपटपंची करीत सुटले आहेत. नेमका आणलेला हा नवीन कायदा नेमका आहे तरी काय, हे सोप्या आणि सुटसुटीत भाषेत देशातल्या शेतकऱ्यांना आजवर कोणीही समजून सांगितलेला नाही.कोरडवाहू किंवा चारमाही बागायत करणाऱ्या शेतकऱ्याचे कांदा हे एकमेव मनीक्रॉप आहे. शेतकऱ्याला चार पैसे मिळू लागताच कांद्यावर निर्यातबंदी करून कांद्याचे भाव पाडले. देशातील भाजप सरकारने जगासमोर नामुष्कीची वेळ आणली आहे, अशी टीका गोटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

टॅग्स :Dhuleधुळे