शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
5
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
6
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
7
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...
8
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
9
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
10
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
11
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
12
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
13
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
14
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
15
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
16
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
17
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
18
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
19
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
20
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...

शाश्वत स्वच्छतेकडे लक्ष देण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:02 IST

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत केले प्रतिपादन

ठळक मुद्देआता टप्पा-२ची पडताळणी होणार आहे.ग्रामस्थांमध्ये शौचालय वापराबाबत जागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा हगणदारीमुक्त झाला असला तरी आता शाश्वत स्वच्छतेकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. शौाचालये उभी राहीली मात्र आता त्यांचा निरंतर वापर होण्यासाठी लोकांशी वर्तणूक बदलाचा संवाद साधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांनी केले.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत हगणदारीमुक्त ग्रामपंचायत पडताळणी टप्पा-२ साठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली, त्यावेळी अध्यक्षपदावरून वान्मती सी. बोलत होत्या. व्यासपीठावर पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी, गटविकास अधिकारी सुरेश शिवदे (शिंदखेडा), चंद्रकांत भावसार (साक्री), वाय.डी.शिंदे (शिरपूर), राघवेंद्र घोरपडे (धुळे) उपस्थित होत्या.वान्मती सी.म्हणाल्या, ग्रामपंचायत स्तरावर वैय्यक्तीक शौचालयांची कामे झाली.मात्र आता ग्रामस्थांमध्ये शौचालय वापराबाबत जागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे.जिल्हा हगणदारीमुक्त झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची पहिल्या टप्यातील पडताळणी पूर्ण झाली आहे. आता टप्पा-२ची पडताळणी होणार आहे.राज्यस्तरावरून प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रकांत कचरे यांची उपस्थिती होती. कचरे यांनी पडताळणी करतांना घ्यावयाची काळजी,विविध टप्पे, यंत्रणेचा समन्वय, आदींबाबत माहिती दिली.प्रास्ताविम मधुकर वाघ यांनी केले. विजय हेलिंगराव यांनी सूत्रसंचालन केले.कार्यशाळा यशस्वीतेसाठी कार्यक्रम व्यवस्थापक ई.टी.चौधरी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी महेंद्र नेरकर यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे