शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

पालिकेने नागरी सुविधा पुरवाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:36 IST

प्रभाग क्रमांक सहामधील गोपाळनगर, दत्त कॉलनी, पांजरा कान कॉलनी, सुशीलानगर, महावीरनगर येथे पूर्ण क्षमतेने वेळेवर पाणीपुरवठा होत नाही, सध्या ...

प्रभाग क्रमांक सहामधील गोपाळनगर, दत्त कॉलनी, पांजरा कान कॉलनी, सुशीलानगर, महावीरनगर येथे पूर्ण क्षमतेने वेळेवर पाणीपुरवठा होत नाही, सध्या उन्हाळा सुरू झाल्याने नागरिकांना पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. अनेक दिवस नळांना पाणी येत नाही. आले तर अतिशय कमी क्षमतेने येते. याचे व्यवस्थित नियोजन करावे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॉलनीमध्ये अनेक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे स्वच्छता व फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक खांबांवरचे दिवे बंद अवस्थेमध्ये आहेत. तेथे त्वरित नवीन लाइट बसवण्यात यावेत या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी देवेंद्र सिंग परदेशी यांना देण्यात आले. या वेळेस त्यांनी पाणीपुरवठा करणारे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांना बोलावून त्वरित या समस्या निकालात काढाव्यात अन्यथा कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. यामुळे प्रभागातील नागरिकांचे समाधान झाले आहे. कॉलनीमध्ये फक्त घंटागाडी येते. या गाडीत फक्त घरातीलच घाण व कचरा घेतला जातो. परंतु रस्त्याच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी पडलेला कचरा उचलला जात नाही. तेथे अनेक दिवस तो कचरा पडून राहिल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. हा कचरा उचलण्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु यापुढे ट्रॅक्टरवरचे स्वच्छता कर्मचारी कॉलनीमध्ये येतील, असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले आहे. याप्रसंगी दिनेश नेरकर, आबा सोनवणे, सतीश पगार, भय्या देवरे, अंकित पाटील, महेंद्र देसले, स्वप्निल भावसार आदी उपस्थित होते.