शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

शेतकऱ्यांसाठी आमदार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 12:10 IST

धुळ्यात मोर्चा : शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : पंतप्रधान पिक विमा योजनेचे शिरपूर तालुक्यातील १२ हजार ५४१ विमाधारक शेतकरी लाभार्थी आणि ४१० फळ पिक विमाधारक लाभार्थी शेतकºयांना तातडीने पिक विम्याची रक्कम मिळावी यासाठी तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष के़डी़पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, उपसभापती इशेंद्र कोळी, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, भरत पाटील, जगन्नाथ महाजन, दर्यावसिंग जाधव, सुनील जैन, बोराडी येथील राजेंद्र पाटील, जगन पावरा, रमण पावरा, बाजार समिती संचालक अविनाश पाटील, भुपेंद्रसिंह राजपूत, जयसिंग राजपूत, विजय पारधी, लाला गिरासे, आकाश मराठे, दीपक पावरा आदी उपस्थित होते.शिरपूर तालुक्यातील पिकनिहाय बाधित शेतकरी संख्या १२ हजार ५४१ आहे. कापूस ६ हजार ८०१ शेतकरी, मूग २ हजार ३०५, मका१ हजार १२९, उडीद ८९७, ज्वारी ६३४, बाजरी २९१, सोयाबीन ४०४, भुईमूग ३१, तूर ३३, तीळ ३, कांदा १६ असे एकूण १२ हजार ५४१ शेतकरी बांधवांना तसेच फळ पिक बाधित शेतकरी बांधव ४१० आहेत. सर्व शेतकरी बांधवांना शासनाकडून तातडीने त्यांची पिक विमा रक्कम मिळावी यासाठी आमदार काशिराम पावरा यांच्या वतीने यापूर्वी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते़ दहा दिवसांच्या आत शेतकºयांना दिलासा न मिळाल्यास मोर्चा काढण्यात येईल असे देखील सूचित करण्यात आले होते़शेतकºयांना कोणत्याही प्रकारचा दिलासा न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेवून तातडीने पिक विमा मिळावा यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करण्यात आला. इतर जिल्हा प्रमाणे धुळे जिल्ह्यातील व शिरपूर तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकºयांना न्याय मिळावा, तातडीने नुकसान भरपाई, पिक विमा योजना लाभ तात्काळ द्यावा, कृषी विभाग व पिक विमा कंपनी यांची देखील चौकशी या निमित्ताने करावी अशी जिल्हाधिकारी यांच्याकडे आमदार काशिराम पावरा यांनी केली. योग्य ती मदत करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी डी.गंगाधरन यांनी दिले.गेल्या वर्षी ८ कोटी ६ लाख रुपयांचा फळ पिक विमा महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झाला होता. यातील पहिल्या हप्ताचे ४़०३ कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा झाले होते.पंतप्रधान फळ पिक विमा योजना अंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामान आधारित पिक विमा योजना २०१८-१९ मध्ये आंबिया बहारसाठी लागू करण्यात येवून महाराष्ट्र शासनाच्यावतीने व अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया लि. मार्फत गेल्या दीड महिन्यांपूर्वी फळ पिक विमा मंजूर करण्यात आला होता. या विक विमा योजनेतून केळी पिकाचे ४०३ लाभार्थी शेतकरी, पेरु पिकाचे १ व डाळींब पिकाचे ६ लाभार्थी असे एकूण ४१० लाभार्थी शेतकºयांना प्रत्येकी प्रति हेक्टर ६६ हजार रूपये प्रमाणे पिक विमा रकमेचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झाल्याने त्यांना दिलासा मिळाला होता. ४ कोटी ३ लाख रुपये एवढी रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा झाली असून उर्वरीत दुसरा हप्ता ६६ हजाराचा मिळणे बाकी आहे. उर्वरीत रक्कम लवकर मिळावी अशी अपेक्षा शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे.गेल्या वर्षी देखील आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने ९ कोटी रुपये पिक विमा मिळाला होता़ यावर्षी मात्र पिक विमा मिळण्यात होणारी दिरंगाई शेतकºयांसाठी खूपच मारक ठरली आहे, असे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे