शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
3
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
4
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
5
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
6
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
7
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
8
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
9
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
10
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
11
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
12
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
13
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
14
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
15
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
16
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
17
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
18
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
19
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
20
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या खर्चाची लाखोंची उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST

धुळे जिल्ह्यात एकूण २१८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या, त्यापैकी माघारीअंति ३६ बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित १८२ ग्रामपंचायतींमध्ये मतदान घेण्यात आले़ ...

धुळे जिल्ह्यात एकूण २१८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या, त्यापैकी माघारीअंति ३६ बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित १८२ ग्रामपंचायतींमध्ये मतदान घेण्यात आले़ शिरपूर तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींपैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित २८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली़ यात राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सदस्य संख्येनुसार १५ ते ७५ हजार रुपये खर्च करण्यास मान्यता दिली होती. परंतु, आयोगाने दिलेल्या खर्चाच्या मर्यादा जिल्ह्यातील बहुतेक सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ओलांडल्या आहेत. या तालुक्यातील दहिवद, सावळदे, विखरण, मांडळ, भाटपुरा, होळ आदी मोठ्या ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा निवडणूक खर्च लाखोंच्या घरात गेला आहे़

दहिवद येथे एका पॅनलतर्फे मतदानाच्या पूर्वसंध्येला काही मतदारांना प्रत्येकी ३ हजार रुपये देण्यात आल्यानंतर पुन्हा मतदानाच्या भल्या पहाटे २ हजार रुपये देऊन ज्वारी हातात घेऊन शपथ घ्यायला सांगून मतदान करण्यास प्रवृत्त केले़ बहुतांश मतदारांना १ ते ३ हजारांपर्यंत पॅनलप्रमुखांनी पैशाचे वाटप केले़

सावळदे येथे प्रति मतदार ३०० रूपयांसह साडी व ड्रेसचे वाटप करण्यात आले. एका उमेदवाराने तर चक्क १५०० रुपये दिले तर नवीनच राजकारणात शिरकाव केलेल्या एकाने १ हजार रुपये मतदारांना दिलेत़ अधिकाधिक मतदारांना आमिषे देऊन या ठिकाणी मते पदरात पाडण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत दिसून आला़

मांडळ येथेही १ हजारापासून २ हजारांपर्यंत मतदारांना रोकड देऊन खुश करण्यात आले़ याशिवाय भाटपुरा, विखरण, होळ, शिंगावे, जुने भामपूर, बलकुवे आदी मोठ्या गावांमध्ये पैशांचा महापूर वाहिला़ संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर साड्या, ड्रेस, विविध प्रकारच्या वाणांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले़ निवडणुका जाहीर झाल्यापासून उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात मिष्टान्न व मांसाहार जेवणाच्या रोज पंगती उठवल्या जात होत्या़ मतदानाच्या बहुतेक सर्व मोठ्या व चुरशीच्या ग्रामपंचायतीत अनेक सदस्यांनी थेट मतदारांना पैसे वाटप करण्यात आले़ एका मतासाठी ३०० रुपयांपासून ५००, १०००, १५००, २००० तर काहींना ३ हजार रुपयांचे देखील वाटप करण्यात आल्याची चर्चा जोरात सुरू आहे. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, इंदोर, सुरत येथे नोकरीनिमित्त गेलेल्या मतदारांना गावाला घेऊन येणे व पुन्हा सोडण्यासाठी देखील विशेष सोयी करण्यात आल्या होत्या़

दहिवद येथे एका ग्रामपंचायत उमेदवाराने तब्बल एका मतदानाला ५ हजारांपर्यंत वाटप केल्याची जोरदार चर्चा गावाच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे़ सावळदे येथे कपड्यांसह रोख रक्कम दिल्याची चर्चिले जात आहे.