शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

साक्रीसाठी सोडले मालनगाव धरणाचे आरक्षित पाणी !

By admin | Updated: March 18, 2017 00:15 IST

संतप्त प्रतिक्रिया : नदीकाठावरील शेतकºयांसह पाणी योजनांचे वीज कनेक्शन तोडले

दहीवेल : साक्री शहरासाठी मालनगाव धरणाचे आरक्षित पिण्याचे पाणी पाटबंधारे विभागाने १२ रोजी कान नदीतून सोडले. पाणी साक्रीला पोहचावे म्हणून नदीकाठावरील खरडबारी, मालनगाव, बोडकीखडी, सातारपाडा, दहीवेल, भोनगाव, बोदगाव, किरवाडे, घोडदे, सुरपान अशा दहा गावांतील नदीकाठावरील शेतकºयांच्या शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. उर्वरित  छडवेल प., आष्टाणे, कावठे येथील नदीकाठावरील वीज कनेक्शन तोडण्यात येणार आहे. दरम्यान, सातारपाडा येथील नदीकाठावरील नळ पाणीपुरवठा योजनेचेही वीज कनेक्शन तोडण्यात आले. यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.वीज कनेक्शन अचानक तोडण्यात आल्यामुळे शेतकºयांच्या रब्बी हंगामातील गहू, कांदे, भाजीपाल्याचे एका पाण्यामुळे उत्पन्नात घट होऊन आर्थिक नुकसान होणार असल्याने शेतकरी अडचणीत सापडले असून पाटबंधारे विभाग, विद्युत वितरण कंपनीच्या या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील आरक्षित पाणी जिल्हाधिकाºयांच्या लेखी आदेशाशिवाय सोडता येत नाही. मात्र, सदर आरक्षित पाणी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या आदेशाने सोडण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी स्थानिक शेतकरी, परिसरातील नागरिकांना विश्वासात घेऊन समन्वयातून आरक्षित पाण्याचे नियोजन करून सोडावे, अशी मागणी होत आहे. अजून पंधरा दिवसानंतर पाणी सोडले असते तर रब्बी पिकांचे नुकसान झाले नसते, अशी प्रतिक्रिया शेतकºयांनी व्यक्त केली.मालनगाव धरणाचे पाणी खरीप व रब्बी पिकांना दिले जाते. या धरणाच्या पाण्यावर मालनगाव, खरडबारी, बर्डीपाडा, बोडकीखडी, दहीवेल, भोनगाव, कालदर, किरवाडे, घोडदे, सुरपान, छडवेल, आष्टाणे, कावठे आदी गावांतील शेतकºयांची शेती अवलंबून आहे. पंधरा दिवस ही कारवाई थांबवली असती अथवा शेतकºयांना पूर्वसूचना दिली असती तर शेतकºयांना रब्बी पिकाचा पाणी भरणा करता आला असता, शेतकºयांनी पर्यायी व्यवस्था केली असती. मात्र, पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेतकºयांना भेटत नाहीत, व्यवस्थित माहिती देत नाही. उलट वीज कनेक्शन जोडले, पाणी चोरले तर खबरदार, शेतकºयावर गुन्हे दाखल करू, असा दम पाटबंधारे विभाग शेतकºयांना देत  आहे.आरक्षित पाणी जिल्हाधिकाºयांच्या आदेशाशिवाय सोडले जात नाही.  तसेच तालुकास्तरीय प्रशासनाकडून अहवाल मागवून सर्व कायदेशीर अहवाल देऊन पूर्तता होऊन आरक्षित पाण्याची रक्कम संबंधितांकडून वसूल करून मगच पाणी सोडले जाते. तथापि, मिळालेल्या माहितीनुसार, पाटबंधारे विभागानेच हे पाणी सोडले. वास्तविक स्थानिक गावातील शेतकºयांचे नुकसान होऊ नये म्हणून समन्वयाच्या भूमिकेतून आरक्षित पाणी सोडले पाहिजे, स्थानिक गावांचे पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन तोडू नये, स्थानिक लोकांवर अन्याय होऊ नये, म्हणून प्रशासन व लोकप्रतिनिधींनी काळजी घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.मालनगाव, बोडकीखडी, दहीवेल येथील शेतकºयांच्या रब्बीतील गव्हाचे पाण्याच्या एका आवर्तनाअभावी नुकसान होणार आहे. पाटबंधारे विभागाकडे शेतकरी एक आवर्तनाची पाणीपट्टी भरण्याला तयार आहेत; परंतु पाटबंधारे विभागाच्या दहीवेलच्या स्थानिक कर्मचाºयांनी नकार दिला आहे. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी गांभीर्याने याबाबत दखल घ्यावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.खरे-खोटे कुणाचे?कार्यकारी अभियंता यांनी सांगितले की, आरक्षित पाण्याची ५० टक्के रक्कम भरून घेण्यात आली. परंतु कनिष्ठ अभियंत्यांनी सांगितले की, आरक्षित पाण्याचे पैसे अद्याप भरलेले नाहीत. यामुळे खरे-खोटे कुणाचे? असा सवाल उपस्थित होत आहे.  सातारपाडा गावाचा नळ पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद आहे. सातारपाडा गावाचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशा सूचना केल्याचे आमदार डी.एस. अहिरे यांनी मुंबई येथून दूरध्वनीवर सांगितले.दहीवेल येथील कान नदीकाठावरील फडबागायत क्षेत्रातील रब्बी पिकांचे नुकसान होत आहे. कान नदीवरील बंधाºयाचे पाणी बंद केल्याने फडबागायतचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. एका आवर्तनाअभावी पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.साक्री शहरासाठी जिल्हाधिकाºयांनी पाणी आरक्षित केले आहे. ५० टक्के रक्कम भरूनच त्यांच्या मागणीनुसार, मालनगाव धरणाचे पाणी साक्री शहराला सोडले आहे. तथापि, नदीकाठच्या गावातील नळ पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन तोडायला नको, सातारपाडा आदी गावाचे तात्पुरते कनेक्शन तोडले असल्यास संबंधितांकडून माहिती घेऊन पाणी सोडले असता नळ पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन तोडू नये, अशा सूचना देतो.- के.टी. सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग